Weather Update: कुठे बर्फवृष्टी तर कुठे पाऊस! चक्रवाती वादळाने बदलले हवामान

  168

नवी दिल्ली : हवामान विभागाने चक्रवाती वादळामुळे केरळमध्ये जोरदार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. येथे पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच वेगवान वारे आणि वीज कडाडण्याचीही शक्यता व्यक्त केली आहे. सोबतच चेन्नई आणि तामिळनाडूच्या किनारी भागातही हवामान बदलण्याची शक्यता आहे.


दुसरीकडे देशाच्या इतर भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात थंडीचा परिणाम दिसू लागला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार दिल्ली आणि लखनऊमध्ये पुढील पाच दिवस धुके वाढण्याची शक्यता आहे.


पंजाब, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार मणिपूर, मिझोरम, नागालँड आणि त्रिपुरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.


आयएमडीच्या माहितीनुसार पुढील काही दिवसांमध्ये डोंगराळ भागांमध्ये बर्फवृष्टी होऊ शकते. हवामान विभागाने हिमाचल प्रदेशातील काही भागांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे. चक्रवाती वादळाबाबत बोलायचे झाल्यास आयएमडीने सांगितले की चक्रवाती वादळ २५ ऑक्टोबरच्या संध्याकाळी खेपुपारा आणि चटगाव यांच्यात बांगलादेशचा किनारा पार करण्याची शक्यता आहे.


आजच्या हवामानाबाबत बोलायचे झाल्यास स्कायमेट वेदरच्या रिपोर्टनुसार आज ओडिशाच्या उत्तरी किनारी, गंगीय पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.


Comments
Add Comment

निवडणूक आयोगाकडून उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी वेळापत्रक घोषित

आवश्यकता भासल्यास ९ सप्टेंबर रोजी मतदान नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख २१ ऑगस्ट नवी दिल्ली :

डोनाल्ड ट्रम्प यांना मोदी वठणीवर आणणार! चीन दौऱ्याआधी दिल्लीत पुतिन-मोदी भेट होणार?

मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा भारत दौरा यावर्षी होणार असून, त्या दौऱ्याच्या तारखा सध्या अंतिम

पोस्टात मोठा बदल! १ सप्टेंबरपासून पोस्टाची 'ही' सेवा बंद होणार, नवीन नियमांचे फायदे-तोटे काय?

मुंबई : तुम्ही कधी विचार केलाय का, एका पत्रात किती भावना दडलेल्या असतात? एका क्षणाचा निरोप, आनंदाचे क्षण आणि

अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर संतापले शशी थरुर, मोदींना सुचवला रामबाण उपाय

नवी दिल्ली : अमेरिकेने भारतावर एकूण ५० टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत प्रतिक्रिया

Gurugram Crime : रस्त्यावर तरुणाचं हस्तमैथून! "कॅबची वाट पाहत असताना मॉडेलवर 'तो' घुटमळत होता… पुढे काय घडलं, वाचून हादराल!"

गुरुग्राम : गुरुग्राममधील राजीव चौक परिसरात अत्यंत वर्दळीच्या एक लाजीरवाणा प्रकार समोर आला आहे. एका मॉडेल

Devendra Fadanvis : "ओबीसीसाठी लढलो म्हणून टार्गेट झालो, पण लढा थांबणार नाही!" देवेंद्र फडणवीसांचा ठाम निर्धार

गोवा : गोव्यात सुरू असलेल्या ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी