Weather Update: कुठे बर्फवृष्टी तर कुठे पाऊस! चक्रवाती वादळाने बदलले हवामान

नवी दिल्ली : हवामान विभागाने चक्रवाती वादळामुळे केरळमध्ये जोरदार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. येथे पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच वेगवान वारे आणि वीज कडाडण्याचीही शक्यता व्यक्त केली आहे. सोबतच चेन्नई आणि तामिळनाडूच्या किनारी भागातही हवामान बदलण्याची शक्यता आहे.


दुसरीकडे देशाच्या इतर भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात थंडीचा परिणाम दिसू लागला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार दिल्ली आणि लखनऊमध्ये पुढील पाच दिवस धुके वाढण्याची शक्यता आहे.


पंजाब, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार मणिपूर, मिझोरम, नागालँड आणि त्रिपुरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.


आयएमडीच्या माहितीनुसार पुढील काही दिवसांमध्ये डोंगराळ भागांमध्ये बर्फवृष्टी होऊ शकते. हवामान विभागाने हिमाचल प्रदेशातील काही भागांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे. चक्रवाती वादळाबाबत बोलायचे झाल्यास आयएमडीने सांगितले की चक्रवाती वादळ २५ ऑक्टोबरच्या संध्याकाळी खेपुपारा आणि चटगाव यांच्यात बांगलादेशचा किनारा पार करण्याची शक्यता आहे.


आजच्या हवामानाबाबत बोलायचे झाल्यास स्कायमेट वेदरच्या रिपोर्टनुसार आज ओडिशाच्या उत्तरी किनारी, गंगीय पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.


Comments
Add Comment

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

'पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही'

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडून घटस्फोटाचा निर्णय कायम जबलपूर : "कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे