Weather Update: कुठे बर्फवृष्टी तर कुठे पाऊस! चक्रवाती वादळाने बदलले हवामान

नवी दिल्ली : हवामान विभागाने चक्रवाती वादळामुळे केरळमध्ये जोरदार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. येथे पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच वेगवान वारे आणि वीज कडाडण्याचीही शक्यता व्यक्त केली आहे. सोबतच चेन्नई आणि तामिळनाडूच्या किनारी भागातही हवामान बदलण्याची शक्यता आहे.


दुसरीकडे देशाच्या इतर भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात थंडीचा परिणाम दिसू लागला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार दिल्ली आणि लखनऊमध्ये पुढील पाच दिवस धुके वाढण्याची शक्यता आहे.


पंजाब, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार मणिपूर, मिझोरम, नागालँड आणि त्रिपुरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.


आयएमडीच्या माहितीनुसार पुढील काही दिवसांमध्ये डोंगराळ भागांमध्ये बर्फवृष्टी होऊ शकते. हवामान विभागाने हिमाचल प्रदेशातील काही भागांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे. चक्रवाती वादळाबाबत बोलायचे झाल्यास आयएमडीने सांगितले की चक्रवाती वादळ २५ ऑक्टोबरच्या संध्याकाळी खेपुपारा आणि चटगाव यांच्यात बांगलादेशचा किनारा पार करण्याची शक्यता आहे.


आजच्या हवामानाबाबत बोलायचे झाल्यास स्कायमेट वेदरच्या रिपोर्टनुसार आज ओडिशाच्या उत्तरी किनारी, गंगीय पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.


Comments
Add Comment

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने

Rain Alert: दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात पाऊस आणि गारपिटीची शक्यता

नवी दिल्ली: दिल्ली एनसीआरमध्ये शुक्रवारी सकाळी जोरदार वाऱ्यांमुळे हवामान बदलले. हवामान विभागाने संपूर्ण उत्तर