Dassehra: 'आम्ही श्रीरामाची मर्यादाही जाणतो आणि आपल्या सीमांचे रक्षण करणेही' - पीएम मोदी

द्वारका: देशाच्या विविध भागांमध्ये दसऱ्याच्या निमित्ताने रावणदहन केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीच्या द्वारका येथे रावण दहनाच्या कार्यक्रमावेळी उपस्थित होते. यावेळी तेथील लोकांना त्यांनी संबोधित केले.


दिल्लीच्या द्वारकामध्ये दसरा कार्यक्रमात बोलताना पीएम मोदी म्हणाले, हे संकल्पांचे पर्व आहे. विजयादशमी म्हणजे आवेशावर धैर्याचा विजय, अत्याचारी रावणावर भगवान श्रीरामाच्या विजयाचा पर्व आहे. आम्ही या भावनेसह दरवर्षी रावणदहन करतो., मात्र केवळच इतकेच नाही तर हे पर्व संकल्पांचे पर्व आहे. आपल्या संकल्पांची पुनरावृत्ती करण्याचे पर्व आहे. चंद्रावरील विजयाला दोन महिने पूर्ण झाले आहेत त्यावेळेस आपण विजयादशमी साजरी करत आहोत. या दिवशी शस्त्राची पुजा केली जाते.


पंतप्रधान पुढे म्हणाले, आम्ही श्रीरामाची मर्यादाही जाणतो आणि आपल्या सीमांचे रक्षण करणेही जाणतो. आम्ही शक्ती पुजेचा संकल्प जाणतो. आज भारताने चंद्रावर विजय मिळवला आहे. तसेच त्यांनी यावेळी दावाही केला की भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनत आहे. रावणाचे दहन म्हणजे केवळ रावणाचे दहन नसते तर हे दहन त्या शक्तींचे असते जे जातीयवाद आणि क्षेत्रवादाच्या नावावर धरती मातेचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत आहेत.



यावेळी पंतप्रधान मोदींनी १० संकल्प करण्यास सांगितले


येणारी पिढी लक्षात घेता पाण्याची बचत करणे
डिजीटल देवाण-घेवाणीसाठी लोकांना प्रेरणा देणे
गाव आणि शहर स्वच्छतेमध्ये सगळ्यात पुढे
जास्तीत जास्त वोकल फॉर लोकलला फॉलो करणे
क्वालिटी काम करणे
आधी संपूर्ण देश बघणार. नंतर वेळ मिळाल्यास परदेशी फिरणार.
नैसर्गिक शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार.
धान्यांचा समावेश रोजच्या जेवणात करणार.
योगा, स्पोर्ट्सला प्राथमिकता देणार.
कमीत एका गरीब कुटुंबाचे सदस्य बनून त्यांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर वाढवणे.
Comments
Add Comment

भारत-पाक सीमेवर 'प्रचंड' हेलिकॉप्टरमध्ये सह-वैमानिक म्हणून राष्ट्रपती मुर्मू यांनी रचला इतिहास

जयपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी राजस्थान मधील जैसलमेर येथे स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर

RTO Rules Upadate : चालकांसाठी आरटीओचे 'हे' नवीन नियम; नितीन गडकरी यांची घोषणा

नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. गाड्यांच्या धडकेत निष्पाप नागरिक प्राण गमावत

Amit Shah : सीमांचलमधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

सीमांचल भागातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम सुरू केली जाईल, असे विधान करत केंद्रीय

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर

राष्ट्रपतींनी हेलिकॉप्टर 'प्रचंड'मधून केले उड्डाण

जैसलमेर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजस्थानमधील जैसलमेर येथून स्वदेशी विकसित लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर

WhatsApp लॉगिन फेल, मेसेज मिळेनात! मेसेजिंग अॅपमध्ये तांत्रिक बिघाडामुळे कामं ठप्प

WhatsApp वेब वापरकर्त्यांना त्यांच्या खात्यात लॉग-इन करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. Downdetector या संकेतस्थळावर या