World cup 2023: भारताने रोखला न्यूझीलंडचा विजयरथ, मिळवला सलग पाचवा विजय

  122

धरमशाला: भारतीय संघाला न्यूझीलंडचा विजयरथ रोखण्यात अखेर यश मिळाले आहे. भारताने विश्वचषकातील सलग पाचव्या सामन्यात विजय मिळवला आहे. भारताने न्यूझीलंडला ४ विकेट राखत पराभूत केले.

न्यूझीलंड आणि भारत हे दोन संघ होते ज्यांनी या विश्वचषकात आतापर्यंत पराभव पत्करला नव्हता. मात्र अखेर भारताला न्यूझीलंडचा विजयीरथ रोखण्यात यश मिळाले आहे. यात विराट कोहीलच्या खेळीचा वाटा मोठा आहे.


न्यूझीलंडने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना २७३ धावा केल्या होत्या. डॅरेल मिचेलने सर्वाधिक १३० धावांची खेळी केली होती. तर रचिन रवींद्रने ७५ धावांची खेळी केली होती. न्यूझीलंडचे सलामीवीर साफ अपयशी ठरल्याने रचिन रवींद्र आणि डॅरेल मिचेल यांनी संयमी खेळी करताना न्यूझीलंडला अडीचशे पार धावसंख्या रचण्यात मोठा वाटा रचला होता.


भारताकडून मोहम्मद शमीने ५ गडी बाद न्यूझीलंडच्या संघाला मोठी खेळी करू दिली नाही. त्याचा हा विश्वचषकातील पहिलाच सामना होता.



कोहलीचे शतक हुकले


त्यानंतर भारतीय संघाने सावध सुरूवात केली. भारताचा कर्णधार रोहित शर्माने ४६ धावा केल्या तर शुभमन गिल २६ धावा करून बाद झाला. गेल्या सामन्यात शतकी खेळी कऱणाऱ्या विराट कोहलीचे या सामन्यात शतक अवघ्या ५ धावांनी हुकले. त्याने १०४ बॉलमध्ये ९५ धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरही या सामन्यात तितकीशी चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याने ३३ धावा फटकावल्या. यासाठी २९ बॉल घेतले. के एल राहुलने २७ धावा केल्या. रवींद्र जडेजा या सामन्यात ३९ धावांवर नाबाद राहिला. यासोबतच भारताने हा सामना ४ विकेट राखत जिंकला.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार