पुणे: भारताचा दिग्गज क्रिकेटर विराट कोहलीने(virat kohli) एकदिवसीय करिअरमधील आपले ४८वे शतक झळकावताना भारतीय संघाला शानदार विजय मिळवून दिला. एकदिवसीय विश्वचषक २०२३मधील आपल्या चौथ्या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशला ७ विकेटनी हरवले. पुण्यात खेळवण्यात आलेल्या या सामन्यात २५७ धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने जबरदस्त शतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला.
भारतीय संघाचा विश्वचषकातील हा सलग चौथा विजय आहे. कोहलीने या सामन्यात नाबाद १०३ धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने ४ षटकार आणि ६ चौकार ठोकले. त्याचा स्ट्राईक रेट १०६.१८ इतका होता. मात्र सामना रोमांचक तेव्हा झाला जेव्हा विजयासाठी ६६ बॉलमध्ये १९ धावांची गरज होती. तेव्हा कोहली ८१ धावांवर नाबाद खेळत होता.
याचाच अर्थ विजयासाठी आणि कोहलीच्या शतकासाठी एकूण १९ धावांची गरज होती. तेव्हा नॉन स्ट्राईकला केएल राहुल उभा होता. यानंतर भारतीय संघाला विजय मिळवेपर्यंत म्हणजेच पुढील १५ बॉल कोहलीकडे स्ट्राईक राहिला. मध्येच कोहलीने अनेकदा एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला मात्र राहुलने नकार दिला. मात्र ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर राहुलने एकेरी धाव घेतली. ज्यामुळे पुढील ओव्हरमध्ये कोहलीकडे पुन्हा स्ट्राईक येईल. यादरम्यान कोहलीला प्रत्येकवेळी धाव घ्यायची होती मात्र राहुल नकार देत होता कारण त्यामुळे कोहलीचे शतक पूर्ण होईल.
याचा खुलासा राहुलने सामन्यानंतर केला. राहुलने सांगितले की, कोहलीला असे वाटत होते की त्याच्यावर कोणीही शतक पूर्ण करणय्याबाबत आरोप करू नये. मात्र राहुलने त्याला समजावले की आता बॉल खूप आहेत आणि टीम आरामात जिंकू शकते. अशातच तुम्ही शतक पूर्ण करू शकता. मी एकेरी धाव घेण्यास नकार देत होते. विराटने सांगितले होते की जर तु एकेरी धाव घेतली नाही तर ते वाईट असेल. लोक हाच विचार करतील की हा व्यक्तिगत स्कोरसाठी खेळत आहे. मात्र मी सांगितले की आपण आरामात सामना जिंकत आहोत तुम्ही तुमचे शतक पूर्ण करू शकता.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…