जे ऑफिसला येणार नाहीत त्यांना नोकरीवरून काढून टाका, अॅमेझॉनने काढले फर्मान

Share

मुंबई: कोरोनाचा काळ संपला आहे. मात्र त्यानंतरही कर्मचारी मात्र ऑफिसला जाण्यास तयार नाही. मात्र आता अॅमेझॉनने(amazon) ऑफिसला न येणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात कडक पावले उचलली आहेत. अॅमेझॉनने म्हटले की जे कर्मचारी ऑफिसला येणार नाही त्यांचा जॉब जाऊ शकतो. कंपनीने मेपासून कर्मचाऱ्यांना कमीत कमी तीन दिवस ऑफिसला येण्यास सांगितले आहे. मात्र अद्यापही कर्मचारी या नियमाचे नीट पालन करत नाही आहेत. हे पाहता अॅमेझॉनने आता आपला नियम अधिक कडक केला आहे.

अॅमेझॉनकडून रिटर्न टू ऑफिस पॉलिसी जारी करण्यात आली आहे जे कर्मचारी ही पॉलिसी फॉलो करणार नाहीत त्यांना नोकरीवरून काढून टाकले जाऊ शकते.

जगभरात जारी केला नियम

इनसाईडरच्या रिपोर्टनुसार कंपनीने मॅनेजर्सला त्यांच्या कर्मचाऱ्यांना काढण्याबाबतही सूट दिली आहे. कंपनीच्या गाईडलाईननुसार जे कर्मचारी आठवड्यातून तीन दिवस ऑफिसला येण्याचा नियम पाळणार नाहीत त्यांच्याविरोधात हे पाऊल उचलले जाईल. कंपनीने जागतिक स्तरावर हा नियम जारी केला आहे.

पहिल्या स्टेपमध्ये कर्मचाऱ्यांशी करणार बोलणी

ऑफिसला न येणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगेचच कामावरून काढले जाणार नाही. कंपनीने मॅनेजर्सला ३ स्टेप प्रोसेस फॉलो करण्यास सांगितले आहे. पहिल्या स्टेपमध्ये मॅनेजरला आपल्या कर्मचाऱ्यांशी खाजगीत बातचीत करावे
लागेल.

दुसऱ्या स्टेपमध्ये फिक्स करावी लागेल मीटिंग

याशिवाय दुसऱ्या स्टेपमध्ये मॅनेजरला कर्मचाऱ्यासोबत एक अथवा दोन आठवड्याच्या आत मीटिंग फिक्स करावी लागेल. या मीटिंगनंतर कर्मचाऱ्याला ऑफिसला परतण्याबाबत इशारा दिला जाईल.

तिसऱ्या स्टेपमध्ये मॅनेजर करू शकतात टर्मिनेट

जर या दोन स्टेपनंतरही कर्मचारी ऑफिसला येत नसेल तसेच त्याचे ऑफिसला न येण्याबाबतचे खरे कारण समोर येत नसेल तर मॅनेजरला तिसरी स्टेप फॉलो करावी लागेल.

Recent Posts

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

38 seconds ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

21 minutes ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

53 minutes ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

1 hour ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago