जे ऑफिसला येणार नाहीत त्यांना नोकरीवरून काढून टाका, अॅमेझॉनने काढले फर्मान

मुंबई: कोरोनाचा काळ संपला आहे. मात्र त्यानंतरही कर्मचारी मात्र ऑफिसला जाण्यास तयार नाही. मात्र आता अॅमेझॉनने(amazon) ऑफिसला न येणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात कडक पावले उचलली आहेत. अॅमेझॉनने म्हटले की जे कर्मचारी ऑफिसला येणार नाही त्यांचा जॉब जाऊ शकतो. कंपनीने मेपासून कर्मचाऱ्यांना कमीत कमी तीन दिवस ऑफिसला येण्यास सांगितले आहे. मात्र अद्यापही कर्मचारी या नियमाचे नीट पालन करत नाही आहेत. हे पाहता अॅमेझॉनने आता आपला नियम अधिक कडक केला आहे.


अॅमेझॉनकडून रिटर्न टू ऑफिस पॉलिसी जारी करण्यात आली आहे जे कर्मचारी ही पॉलिसी फॉलो करणार नाहीत त्यांना नोकरीवरून काढून टाकले जाऊ शकते.



जगभरात जारी केला नियम


इनसाईडरच्या रिपोर्टनुसार कंपनीने मॅनेजर्सला त्यांच्या कर्मचाऱ्यांना काढण्याबाबतही सूट दिली आहे. कंपनीच्या गाईडलाईननुसार जे कर्मचारी आठवड्यातून तीन दिवस ऑफिसला येण्याचा नियम पाळणार नाहीत त्यांच्याविरोधात हे पाऊल उचलले जाईल. कंपनीने जागतिक स्तरावर हा नियम जारी केला आहे.



पहिल्या स्टेपमध्ये कर्मचाऱ्यांशी करणार बोलणी


ऑफिसला न येणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगेचच कामावरून काढले जाणार नाही. कंपनीने मॅनेजर्सला ३ स्टेप प्रोसेस फॉलो करण्यास सांगितले आहे. पहिल्या स्टेपमध्ये मॅनेजरला आपल्या कर्मचाऱ्यांशी खाजगीत बातचीत करावे
लागेल.



दुसऱ्या स्टेपमध्ये फिक्स करावी लागेल मीटिंग


याशिवाय दुसऱ्या स्टेपमध्ये मॅनेजरला कर्मचाऱ्यासोबत एक अथवा दोन आठवड्याच्या आत मीटिंग फिक्स करावी लागेल. या मीटिंगनंतर कर्मचाऱ्याला ऑफिसला परतण्याबाबत इशारा दिला जाईल.



तिसऱ्या स्टेपमध्ये मॅनेजर करू शकतात टर्मिनेट


जर या दोन स्टेपनंतरही कर्मचारी ऑफिसला येत नसेल तसेच त्याचे ऑफिसला न येण्याबाबतचे खरे कारण समोर येत नसेल तर मॅनेजरला तिसरी स्टेप फॉलो करावी लागेल.

Comments
Add Comment

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर