Narayan Rane : शरद पवारांनी मुख्यमंत्री असताना खोट्या बातम्या देऊन दहशतवाद्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा गौप्यस्फोट


मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Narendra Modi) काल इस्राइली दहशतवाद्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेचं समर्थन केलं आणि त्यावर शरद पवार (Sharad pawar) यांनी टीका केली. यासंबंधी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane ) यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.


नारायण राणे म्हणाले, आदरणीय शरद पवार यांनी इस्राइल व हमासबद्दल केलेली टीका मी दुर्दैवी म्हणेन. दहशतवाद कुणा एका व्यक्ती किंवा देशाविरोधात नसून तो माणुसकीविरोधात असतो अशी भूमिका आदरणीय पंतप्रधानांनी घेतली होती. जी-२० आणि संयुक्त राष्ट्र यांसारख्या व्यासपीठांवर देखील त्यांनी आपली ही भूमिका मांडली आहे. पॅलेस्टाईनच्या विरोधात नव्हे तर दहशतवाद्यांविरोधात त्यांनी भूमिका घेतली. मग दहशतवादाविरोधी भूमिका घेणं चुकीचं आहे, असं पवार साहेबांना म्हणायचं आहे का? पॅलेस्टाईन आणि दहशतवाद एकच आहे असं पवार साहेबांना म्हणायचं आहे का? असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला.


शरद पवार साहेबांनी आतापर्यंत आपल्या देशात बरीच मंत्रीपदं भूषवली. मुख्यत्वे संरक्षण मंत्री, कृषीमंत्री आणि महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री होते. मला त्यांना आठवण करुन द्यायची आहे की, १९९३ दंगलीच्या काळात जेव्हा साखळी बॉम्बब्लास्ट झाले त्यात ५४ मृत्यूमुखी पडले तर १४०० जण जखमी झाले. त्या वेळी ते मुख्यमंत्री होते आणि त्यांनी १३ बॉम्बब्लास्ट मस्जिदीमध्ये झाल्याची खोटी बातमी देऊन दहशतवाद्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नव्हता का? असा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी केला.


तुष्टीकरणाच्या धोरणामुळे आजवर देशावर अनेक संकटे आली. आज तरी पवार साहेब तुष्टीकरण सोडून देश प्रथम ही भूमिका घेणार आहेत का? दहशतवादाने होरपळलेल्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर आता ते कोणता खुलासा करणार आहेत? असे सवाल उपस्थित करत नारायण राणे यांनी शरद पवारांना खडसावले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.