Rahul Narwekar : महाराष्ट्राला न्याय देण्याची बुद्धी मला प्राप्त होवो

आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर यांची देवीचरणी प्रार्थना


चंद्रपूर : शिवसेना व ठाकरे गटातील (Shivsena Vs Thackeray Group) संघर्ष सुरु झाल्यापासून आमदार अपात्रतेचा (MLA Disqualification) प्रश्न प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) या प्रकरणाचा निकाल लावण्याचे काम विधानसभा अध्यक्षांच्या हाती सोपवले आहे. मात्र, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी सुनावणीसाठी तयार केलेले वेळापत्रक कोर्टाने काही त्रुटींमुळे मान्य केले नाही आणि सुधारित वेळापत्रक तयार करण्यासाठी ३० ऑक्टोबर ही अंतिम तारीख दिली आहे. दरम्यान, आज राहुल नार्वेकर देवीच्या दर्शनासाठी गेले असता 'महाराष्ट्राला न्याय देण्याची बुद्धी मला प्राप्त होवो', असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.


चंद्रपुरातील महाकाली महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाला राहुल नार्वेकर उपस्थित होते. यावेळी आमदार अपात्रता प्रकरणी कोर्टामधील सुनावणीबाबत त्यांनी भाष्य केलं. आमदार अपात्रतेचा विषय न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे त्यावर चर्चा करणं योग्य होणार नाही, योग्य वेळी निर्णय घेऊ, असं राहुल नार्वेकर म्हणाले.


राहुल नार्वेकर पुढे म्हणाले, 'चंद्रपुरातील जनतेने आणि सर्व प्रतिनिधींनी जो सुंदर महोत्सव आयेजित केला आहे, त्या ठिकाणी देवीचं दर्शन घेण्याकरता आम्ही आलो आहोत. मी देवीचरणी प्रार्थना करुन सद्बुद्धीची मागणी करेन. महाराष्ट्राला न्याय देण्याची बुद्धी मला प्राप्त होवो, अशी मागणी मी करणार आहे'.


राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाकडून आमदार अपात्रतेच्या प्रकरणात ३० ऑक्टोबर ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे तोपर्यंत तरी या निकालासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. या सुनावणीत नेमकं काय होणार, अध्यक्ष नवं वेळापत्रक सादर करणार का, याकडे संपूर्ण राज्याचे डोळे लागून राहिले आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन