Rahul Narwekar : महाराष्ट्राला न्याय देण्याची बुद्धी मला प्राप्त होवो

  108

आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर यांची देवीचरणी प्रार्थना


चंद्रपूर : शिवसेना व ठाकरे गटातील (Shivsena Vs Thackeray Group) संघर्ष सुरु झाल्यापासून आमदार अपात्रतेचा (MLA Disqualification) प्रश्न प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) या प्रकरणाचा निकाल लावण्याचे काम विधानसभा अध्यक्षांच्या हाती सोपवले आहे. मात्र, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी सुनावणीसाठी तयार केलेले वेळापत्रक कोर्टाने काही त्रुटींमुळे मान्य केले नाही आणि सुधारित वेळापत्रक तयार करण्यासाठी ३० ऑक्टोबर ही अंतिम तारीख दिली आहे. दरम्यान, आज राहुल नार्वेकर देवीच्या दर्शनासाठी गेले असता 'महाराष्ट्राला न्याय देण्याची बुद्धी मला प्राप्त होवो', असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.


चंद्रपुरातील महाकाली महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाला राहुल नार्वेकर उपस्थित होते. यावेळी आमदार अपात्रता प्रकरणी कोर्टामधील सुनावणीबाबत त्यांनी भाष्य केलं. आमदार अपात्रतेचा विषय न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे त्यावर चर्चा करणं योग्य होणार नाही, योग्य वेळी निर्णय घेऊ, असं राहुल नार्वेकर म्हणाले.


राहुल नार्वेकर पुढे म्हणाले, 'चंद्रपुरातील जनतेने आणि सर्व प्रतिनिधींनी जो सुंदर महोत्सव आयेजित केला आहे, त्या ठिकाणी देवीचं दर्शन घेण्याकरता आम्ही आलो आहोत. मी देवीचरणी प्रार्थना करुन सद्बुद्धीची मागणी करेन. महाराष्ट्राला न्याय देण्याची बुद्धी मला प्राप्त होवो, अशी मागणी मी करणार आहे'.


राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाकडून आमदार अपात्रतेच्या प्रकरणात ३० ऑक्टोबर ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे तोपर्यंत तरी या निकालासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. या सुनावणीत नेमकं काय होणार, अध्यक्ष नवं वेळापत्रक सादर करणार का, याकडे संपूर्ण राज्याचे डोळे लागून राहिले आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या