Rahul Narwekar : महाराष्ट्राला न्याय देण्याची बुद्धी मला प्राप्त होवो

आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर यांची देवीचरणी प्रार्थना


चंद्रपूर : शिवसेना व ठाकरे गटातील (Shivsena Vs Thackeray Group) संघर्ष सुरु झाल्यापासून आमदार अपात्रतेचा (MLA Disqualification) प्रश्न प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) या प्रकरणाचा निकाल लावण्याचे काम विधानसभा अध्यक्षांच्या हाती सोपवले आहे. मात्र, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी सुनावणीसाठी तयार केलेले वेळापत्रक कोर्टाने काही त्रुटींमुळे मान्य केले नाही आणि सुधारित वेळापत्रक तयार करण्यासाठी ३० ऑक्टोबर ही अंतिम तारीख दिली आहे. दरम्यान, आज राहुल नार्वेकर देवीच्या दर्शनासाठी गेले असता 'महाराष्ट्राला न्याय देण्याची बुद्धी मला प्राप्त होवो', असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.


चंद्रपुरातील महाकाली महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाला राहुल नार्वेकर उपस्थित होते. यावेळी आमदार अपात्रता प्रकरणी कोर्टामधील सुनावणीबाबत त्यांनी भाष्य केलं. आमदार अपात्रतेचा विषय न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे त्यावर चर्चा करणं योग्य होणार नाही, योग्य वेळी निर्णय घेऊ, असं राहुल नार्वेकर म्हणाले.


राहुल नार्वेकर पुढे म्हणाले, 'चंद्रपुरातील जनतेने आणि सर्व प्रतिनिधींनी जो सुंदर महोत्सव आयेजित केला आहे, त्या ठिकाणी देवीचं दर्शन घेण्याकरता आम्ही आलो आहोत. मी देवीचरणी प्रार्थना करुन सद्बुद्धीची मागणी करेन. महाराष्ट्राला न्याय देण्याची बुद्धी मला प्राप्त होवो, अशी मागणी मी करणार आहे'.


राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाकडून आमदार अपात्रतेच्या प्रकरणात ३० ऑक्टोबर ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे तोपर्यंत तरी या निकालासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. या सुनावणीत नेमकं काय होणार, अध्यक्ष नवं वेळापत्रक सादर करणार का, याकडे संपूर्ण राज्याचे डोळे लागून राहिले आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

पाणी समजून प्यायलं थिनर; चार वर्षांच्या चिमुकल्याच्या तोंडापासून ते पोटापर्यंत...

ठाणे : ठाण्याच्या इंदिरानगरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षाच्या चिमुकल्याने चुकून पाणी समजून