India Vs Bangladesh : भारताच्या कर्णधाराला नवव्या षटकातच वापरावे लागले सहा गोलंदाज

हार्दिक पांड्याला दुखापत तर बांगलादेशची तुफान फलंदाजी


पुणे : क्रिकेट वर्ल्डकप (Cricket World Cup) मधील भारत विरुद्ध बांगलादेशचा (India Vs Bangladesh) सामना आज पुण्यामध्ये सुरु आहे. यात बांगलादेशने टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या दृष्टीने हा निर्णय हितकारकच आहे. पण भारतालाही आता सावढगिरीने खेळण्याची गरज दिसत आहे. कारण बांगलादेशने तुफान फलंदाजी करत पहिल्या नऊ षटकांतच अर्धशतक ठोकले आहे. तर भारताचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) या फलंदाजांना रोखण्यासाठी सहा गोलंदाज वापरावे लागले आहेत.


दुखापतीमुळे बांगलादेशचा नियमित कर्णधार शाकीब अल हसन आजच्या सामन्यासाठी उपलब्ध नाही. नजमुल हुसैन शान्तो सध्या कर्णधाराची भूमिका निभावत आहे. त्यामुळे तगड्या शाकीबच्या अनुपस्थितीत बांगलादेशला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. असं असलं तरी बांगलादेशने दमदार खेळायला सुरुवात केली आहे.


याउलट भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya ) मात्र दुखापतीमुळे नवव्या षटकाच्या अर्ध्यात मैदानाबाहेर पडला. फलंदाजाने मारलेला चेंडू पायाने अडवण्याच्या प्रयत्नात हा प्रकार घडला. त्यामुळे ते षटक विराट कोहलीने (Virat Kohli ) पूर्ण केले. विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये शेवटची गोलंदाजी २०१७ मध्ये केली होती. त्याने श्रीलंकेविरूद्धच्या कोलंबो येथील सामन्यात त्याने गोलंदाजी केली होती. त्यानंतर आता तो थेट बांगलादेशविरूद्ध वर्ल्डकपमध्ये पुण्यात गोलंदाजी करत आहे. तर पांड्याच्या जागी सूर्यकुमार यादव बदली खेळाडू म्हणून आला आहे. मात्र, आपला हुकुमी एक्का पांड्या मैदानाबाहेर बसल्याने भारतीयांची धाकधूक वाढली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

न्यूझीलंडविरुद्धच्या रायपूर टी २० मध्ये भारताचा विजय, मालिकेत २-० अशी आघाडी

रायपूर : भारताने न्यूझीलंडविरुद्धची रायपूरमधील टी २० मॅच सात विकेट राखून जिंकली. या विजयासह भारताने पाच मॅचच्या

ग्रँड स्लॅम ४०० व्या विजयाच्या उंबरठ्यावर नोव्हाक जोकोविच!

ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश मेलबर्न : टेनिस जगतातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या नोव्हाक

भारताचे विजयी आघाडीकडे लक्ष्य

रायपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध आज दुसरी टी-२० लढत रायपूर : नागपूरमध्ये मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर, भारतीय

T20 World Cup मध्ये नव्या संघाची एन्ट्री होणार, बांगलादेशच्या बहिष्कारानंतर ICC लवकरच घोषणा करणार

ढाका : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आगामी T20 वर्ल्ड कप २०२६ वर बहिष्कार घालत असल्याची

नागपुरात किवींचा धुव्वा उडवत भारताचा दमदार विजय

अभिषेक शर्मा, रिंकू सिंगच्या वादळी खेळीने मालिकेत १-० ने आघाडी नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही

ICC ODI Rankings: कोहलीचा अव्वल सिंहासनावरून पायउतार, डॅरिल मिशेल नंबर-वन

ICC ODI Rankings : आयसीसी वनडे क्रमवारीत मोठा आणि मनाला वेदना देणारा बदल पाहायला मिळाला असून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी