India Vs Bangladesh : भारताच्या कर्णधाराला नवव्या षटकातच वापरावे लागले सहा गोलंदाज

हार्दिक पांड्याला दुखापत तर बांगलादेशची तुफान फलंदाजी


पुणे : क्रिकेट वर्ल्डकप (Cricket World Cup) मधील भारत विरुद्ध बांगलादेशचा (India Vs Bangladesh) सामना आज पुण्यामध्ये सुरु आहे. यात बांगलादेशने टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या दृष्टीने हा निर्णय हितकारकच आहे. पण भारतालाही आता सावढगिरीने खेळण्याची गरज दिसत आहे. कारण बांगलादेशने तुफान फलंदाजी करत पहिल्या नऊ षटकांतच अर्धशतक ठोकले आहे. तर भारताचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) या फलंदाजांना रोखण्यासाठी सहा गोलंदाज वापरावे लागले आहेत.


दुखापतीमुळे बांगलादेशचा नियमित कर्णधार शाकीब अल हसन आजच्या सामन्यासाठी उपलब्ध नाही. नजमुल हुसैन शान्तो सध्या कर्णधाराची भूमिका निभावत आहे. त्यामुळे तगड्या शाकीबच्या अनुपस्थितीत बांगलादेशला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. असं असलं तरी बांगलादेशने दमदार खेळायला सुरुवात केली आहे.


याउलट भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya ) मात्र दुखापतीमुळे नवव्या षटकाच्या अर्ध्यात मैदानाबाहेर पडला. फलंदाजाने मारलेला चेंडू पायाने अडवण्याच्या प्रयत्नात हा प्रकार घडला. त्यामुळे ते षटक विराट कोहलीने (Virat Kohli ) पूर्ण केले. विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये शेवटची गोलंदाजी २०१७ मध्ये केली होती. त्याने श्रीलंकेविरूद्धच्या कोलंबो येथील सामन्यात त्याने गोलंदाजी केली होती. त्यानंतर आता तो थेट बांगलादेशविरूद्ध वर्ल्डकपमध्ये पुण्यात गोलंदाजी करत आहे. तर पांड्याच्या जागी सूर्यकुमार यादव बदली खेळाडू म्हणून आला आहे. मात्र, आपला हुकुमी एक्का पांड्या मैदानाबाहेर बसल्याने भारतीयांची धाकधूक वाढली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

वैभव सूर्यवंशी देणार १० वीची परीक्षा देणार ?

मुंबई : भारतीय क्रिकेटमधील उदयोन्मुख खेळाडू आणि अवघ्या १४ व्या वर्षी चर्चेत आलेला वैभव सूर्यवंशी याच्याबाबत एक

IND vs PAK Match : सामन्यापूर्वी मोठी बातमी; ICC Men's T20 World Cup मधून नेपाळच पॅकअप

मुंबई : टी-२० वर्ल्ड कपमध्ये सुपर ८ च्या शर्यतीला वेग आला असतानाच एक संघ स्पर्धेबाहेर झाला आहे. ग्रुप C मधील

हाय व्होल्टेज भारत - पाकिस्तान सामन्यात कोण कोण खेळणार ?

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये आज म्हणजेच रविवार १५ फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार

T20 World Cup 2026 IND vs PAK: सूर्यकुमार यादवने केली उस्मान तारिकची नक्कल; व्हिडीओ वायरल

कोलंबो: आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये रविवार १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबोच्या प्रेमदासा

T20 World Cup 2026 IND vs PAK: बीसीबी अध्यक्ष भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला उपस्थित राहणार नाहीत

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (बीसीबी) अध्यक्ष अमिनुल इस्लाम यांनी शेवटच्या क्षणी आपला निर्णय बदलला आहे आणि ते

कोलंबोत आज आर-पारची लढाई, विजयाची हॅटट्रिक कोण मारणार?

कोलंबो  : क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी आणि बहुप्रतिक्षित लढत रविवारी श्रीलंकेच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर