India vs Bangladesh: भारतासमोर आज बांगलादेशचे आव्हान

पुणे: विश्वचषक स्पर्धा २०२३मध्ये(world cup 2023) आज भारतीय संघ विजयी चौकार लगावण्यासाठी पुण्याच्या मैदानात उतरणार आहे. हा सामना बांगलादेशविरुद्ध होत आहे. पुण्यात हा सामना दुपारी २ वाजता सुरू होईल.


या विश्वचषकात आतापर्यंत दोन धक्कादायक निकालांची नोंद झाली आहे. सोबतच भारताविरुद्ध गेल्या चार सामन्यात बांगलादेशचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. या दोन्ही गोष्टी लक्षात घेता रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ या सामन्यात कोणतीच जोखीम उचलणार नाही.



गेल्याच सामन्यात बांगलादेशने भारताला हरवले होते


बांगलादेशने गेल्या चार वनडेपैकी तीन सामन्यात भारताला पराभवाचा धक्का दिला आहे. यातील ताजा सामना म्हणजे आशिया चषकातील. यात बांगलादेशने भारतीय संघाला सहा धावांनी हरवले होते. इंग्लंड आणि द. आफ्रिकेविरुद्ध अनुक्रमे अफगाणिस्तान आणि नेदरलँड् यांच्या विजयानंतर भारतही सावध झाला आहे.


फलंदाजीमध्ये कर्णधार रोहित शर्मा आपला शानदार फॉर्म कायम राखण्याचा प्रयत्न करेल. तर शुभमन गिल आणि विराट कोहली मोठा स्कोर करण्यास उत्सुक असतील. रोहितने गेल्या दोन सामन्यात पाकिस्तानविरुद्ध ८६ आणि अफगाणिस्तानविरुद्ध १३१ धावांची खेळी करत आपला दबदबा ठेवला आहे.



विश्वचषकात भारत-बांगलादेश टक्कर


भारत आणि बांगलादेश हे विश्वचषकात आतापर्यंत चार वेळा आमनेसामने आले आहेत. टीम इंडियाला केवळ २००७मध्ये बांगलादेशविरुद्ध पराभव सहन करावा लागला होता. त्यानंतर २०११, २०१५ आणि २०१९च्या विश्वचषकात भारताने सामने जिंकले होते.



विश्वचषकासाठी संघ


भारतीय टीम: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन ,सूर्यकुमार यादव.

बांगलादेश टीम: शाकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तंजीद हसन तमीम, नजमुल हसन शंटो, तौहीद हृदय, मुश्फिकुर रहीम, महमूदुल्लाह रियाद, मेहदी हसन मिराज, नासुम अहमद, महेदी हसन, तस्कीन अहमद, मुस्ताफिजुर रहमान, हसन महमूद, शरीफुल इस्लाम आणि तंजीम हसन साकिब.
Comments
Add Comment

T20 World Cup 2026: भारतीय संघाला मोठा झटका; 'हा' खेळाडू स्पर्धेतून बाहेर

मुंबई: आयसीसी पुरुष T२० विश्वचषक २०२६ ची आजपासून (शनिवार, ७ फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरु

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि