मुंबई : पुण्याच्या ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) उपचारादरम्यान पोलिसांच्या नजरकैदेत असलेला ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit patil) मोठ्या शिताफीने फरार झाला. मात्र, तब्बल १५ दिवसांनी मुंबई साकीनाका पोलिसांना (Mumbai Police) सापळा रचून त्याला पकडण्यात यश आले आहे. चेन्नईच्या एका हॉटेलमधून ललितला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या अटकेने ड्रग्स प्रकरणात (Drugs Case) अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ललित पाटील चौकशीत काय माहिती देतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यापूर्वीच ललितच्या आईने माध्यमांसमोर हात जोडून एक विनंती केली आहे.
पुण्यातील ससून रुग्णालयातून ललित फरार झाला यासंदर्भात एक खुलासा करत त्याची आई म्हणाली, त्याचं हार्नियाचं ऑपरेशन होणार होतं. त्याला चेकअपला नेलं असताना डॉक्टर म्हणाले, तुझ्यावर आज ऑपरेशन केलं आणि उद्या तुरुंगात नेलं तर तू जगू शकणार नाही. त्यामुळे तो घाबरून तिथून पळाला.
पुढे आणखी एक खुलासा करत ती म्हणाली, ललितने त्याला जी शिक्षा मिळेल ती भोगावी. पण त्याला फसवलं गेलंय हे सांगावं. तोही घाबरला असेल. मुंबई पोलिसांनी त्याला पकडलंय. त्याने पोलिसांना सहकार्य करावं. मला फसवलं गेलंय. त्यामुळे मी या मार्गाला लागलो. पैशासाठी टॉर्चर केलं जात होतं, त्यामुळे मी पलायन केलं, हे त्यानं सांगावं, असं ती म्हणाली.
ललितची आई म्हणाली, ललितचा एन्काऊंटर होण्याची आम्हाला भीती वाटते. पोलीस दोनदा आमच्या घरी आले. त्यांनी तपासणी केली. पहिल्यावेळी भूषणला घेऊन गेले होते. नंतर पुन्हा भूषणला घेऊन आले आणि घराची तपासणी केली. तेव्हाही भीती वाटत होती. त्याचा एन्काऊंटर करतात की काय? अशी भीती वाटत होती. पोलीस आम्हाला तसं बोलूनही गेले होते. तो सापडला तर एन्काऊंटर करू असं पोलीस म्हणाले. नेते लोकही तेच म्हणत आहेत. असं करू नका. एवढीच पाया पडून विनंती आहे, असं त्या म्हणाल्या.
पुढे ती म्हणाली, पोलिसांनी ललितला अटक केली आहे. आता पोलीस जो निर्णय घेतील, तोच योग्य. पण ललितने असा काय मोठा गुन्हा केला आहे? त्याच्या एन्काऊंटरची गरज काय? जे लोक मोठमोठे गुन्हे करतात ते सुटतात आणि फिरतात. ललितने असं काय केलंय की त्याचा एन्काऊंटर करावा? आमचं मत आहे की, त्याचं एन्काऊंटर करू नये. त्याच्या मागे दोन मुलं आहेत. आई वडील आहेत, असं ललितच्या आईने सांगितलं.
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…
मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…
मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…
मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…
मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…