MSP increased : सणासुदीच्या काळात मोदी सरकारची शेतकर्‍यांसाठी खुशखबर!

यंदाची दिवाळी असणार खास...


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिवाळीच्या (Diwali) पार्श्वभूमीवर अनेक निर्णय घेतले आहेत. सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक तसेच केंद्रीय निमलष्करी दल आणि सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. यासोबतच शेतकर्‍यांसाठी (Farmers) देखील दिवाळीकरता केंद्र सरकार (Central Government) एक खुशखबर घेऊन आलं आहे.


दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने एमएसपी (MSP) म्हणजेच किमान आधारभूत किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ६ रब्बी पिकांचा एमएसपी वाढवण्यात आला आहे. मंत्रिमंडळाने एमएसपी २% वरून ७% पर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली. या निर्णयाला सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली.



या ६ रब्बी पिकांसाठी एमएसपी वाढवला आहे :-


१. मसूरच्या एमएसपीमध्ये ४२५ रुपये प्रति क्विंटल वाढ


२. गव्हाच्या एमएसपीमध्ये १५०रुपये प्रति क्विंटल वाढ


३. हरभऱ्यासाठी एमएसपी १०५ रुपये प्रति क्विंटलने वाढला आहे


४. करडई पिकाच्या एमएसपीमध्ये १५० रुपये प्रति क्विंटल वाढ


५. बार्लीच्या एमएसपीमध्ये ११५ रुपये प्रति क्विंटलने वाढ


६. तेलबिया आणि मोहरीच्या एमएसपीमध्ये २०० रुपये प्रति क्विंटल वाढ



एमएसपीमुळे काय फायदा होतो?


केंद्र सरकार पिकांची किमान किंमत ठरवते, त्याला एमएसपी म्हणतात. त्यामुळे पिकांचे बाजारभाव जरी घसरले तरी केंद्र सरकार या एमएसपीवर शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी करते. एमएसपीचा उद्देश शेतकऱ्यांना नुकसानीपासून वाचवणे हा आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Delhi Earthquake : ‘दिल्ली-एनसीआर’सह उत्तर भारतात ५.९ तीव्रतेचा भूकंप

- भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान - तजाकिस्तान सीमेवर दिल्ली-एनसीआर आणि संपूर्ण उत्तर भारतात शुक्रवारी (३ एप्रिल)

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न