Fire: तामिळनाडूत फटाक्यांच्या दोन कंपनीत भीषण आग, ११ जणांचा मृत्यू

चेन्नई: तामिळनाडूमध्ये मंगळवारी १७ ऑक्टोबरला दोन फटाका कंपनीत झालेल्या स्फोटानंतर लागलेल्या आगीत होरपळून तब्बल ११ लोकांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत. हे अपघात रंगपालयम आणि किचनायकनपट्टी गावात झाले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना ३-३ लाखांची मदत केली. तसेच जखमींना एक-एक लाख रूपये मदतीची घोषणा करण्यात आली.


पोलिसांच्या माहितीनुसार रंगपायमच्या फटाका कंपनीत स्फोटानंतर आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस, फायर ब्रिगेडचे कर्मचारी तसेच बचाव पथक दाखल झाले. येथील मलब्यातून ७ जळालेले मृतदेह हाती घेण्यात आले. यांची ओळख अद्याप झालेली नाही.


दरम्यान, या आगीनंतर तीन जण गंभीर जखमी झाले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरा अपघात किचनायकनपट्टी गावातील फटाका कंपनीत झाला. येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर दोन महिला कामगारांना वाचवण्यात यश आले. त्यांना उपचारासाठी श्रीविल्लीपुत्तूर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


याआधी ९ ऑक्टोबरला सोमवारी तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यातील विरागलूरमध्ये फटाका कंपनीत आग लागली होती. या दुर्घटनेत ९ लोकांचा मृत्यू झाला होता तर ५ जण जखमी झाले होते.

Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च