Fire: तामिळनाडूत फटाक्यांच्या दोन कंपनीत भीषण आग, ११ जणांचा मृत्यू

Share

चेन्नई: तामिळनाडूमध्ये मंगळवारी १७ ऑक्टोबरला दोन फटाका कंपनीत झालेल्या स्फोटानंतर लागलेल्या आगीत होरपळून तब्बल ११ लोकांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत. हे अपघात रंगपालयम आणि किचनायकनपट्टी गावात झाले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना ३-३ लाखांची मदत केली. तसेच जखमींना एक-एक लाख रूपये मदतीची घोषणा करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार रंगपायमच्या फटाका कंपनीत स्फोटानंतर आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस, फायर ब्रिगेडचे कर्मचारी तसेच बचाव पथक दाखल झाले. येथील मलब्यातून ७ जळालेले मृतदेह हाती घेण्यात आले. यांची ओळख अद्याप झालेली नाही.

दरम्यान, या आगीनंतर तीन जण गंभीर जखमी झाले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरा अपघात किचनायकनपट्टी गावातील फटाका कंपनीत झाला. येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर दोन महिला कामगारांना वाचवण्यात यश आले. त्यांना उपचारासाठी श्रीविल्लीपुत्तूर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याआधी ९ ऑक्टोबरला सोमवारी तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यातील विरागलूरमध्ये फटाका कंपनीत आग लागली होती. या दुर्घटनेत ९ लोकांचा मृत्यू झाला होता तर ५ जण जखमी झाले होते.

Recent Posts

पंतप्रधान मोदी २२-२३ एप्रिलला सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…

14 minutes ago

बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर

ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…

46 minutes ago

अनधिकृत इमारतींची संख्या ही ११० ने वाढली

पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…

1 hour ago

जलवाहिनी फुटल्याने २४ तास ‘पाणीबाणीचे’ मुंबईकरांसमोर संकट

काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…

2 hours ago

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…

3 hours ago

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

5 hours ago