Fire: तामिळनाडूत फटाक्यांच्या दोन कंपनीत भीषण आग, ११ जणांचा मृत्यू

  92

चेन्नई: तामिळनाडूमध्ये मंगळवारी १७ ऑक्टोबरला दोन फटाका कंपनीत झालेल्या स्फोटानंतर लागलेल्या आगीत होरपळून तब्बल ११ लोकांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत. हे अपघात रंगपालयम आणि किचनायकनपट्टी गावात झाले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना ३-३ लाखांची मदत केली. तसेच जखमींना एक-एक लाख रूपये मदतीची घोषणा करण्यात आली.


पोलिसांच्या माहितीनुसार रंगपायमच्या फटाका कंपनीत स्फोटानंतर आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस, फायर ब्रिगेडचे कर्मचारी तसेच बचाव पथक दाखल झाले. येथील मलब्यातून ७ जळालेले मृतदेह हाती घेण्यात आले. यांची ओळख अद्याप झालेली नाही.


दरम्यान, या आगीनंतर तीन जण गंभीर जखमी झाले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरा अपघात किचनायकनपट्टी गावातील फटाका कंपनीत झाला. येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर दोन महिला कामगारांना वाचवण्यात यश आले. त्यांना उपचारासाठी श्रीविल्लीपुत्तूर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


याआधी ९ ऑक्टोबरला सोमवारी तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यातील विरागलूरमध्ये फटाका कंपनीत आग लागली होती. या दुर्घटनेत ९ लोकांचा मृत्यू झाला होता तर ५ जण जखमी झाले होते.

Comments
Add Comment

भारतातील २७ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर

जागतिक बँकेच्या नव्या अहवालातील माहिती मोदींच्या विविध योजनांचे यश, महाराष्ट्राचा मोठा वाटा नवी दिल्ली :

सोनिया गांधी सिमल्याच्या रुग्णालयात

सिमला : काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना सिमला येथील इंदिरा गांधी

Kedarnath Helicopter Video : केदारनाथकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरची महामार्गावर आपत्कालीन लँडिंग; व्हिडिओ पाहा

रुद्रप्रयाग : केदारनाथ धामकडे जाणाऱ्या खाजगी हेलिकॉप्टरने गुप्तकाशी जि. रुद्रप्रयाग येथे तांत्रिक बिघाडामुळे

Mahua Moitra Ties The Knot : दोन नेते जर्मनीत भेटले अन् गुपचूप विवाहबंधनात अडकले

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिवांगी वर्मा आणि ७० वर्षीय अभिनेता गोविंद नामदेव यांचा विवाह जोरदार चर्चेत

Gangatok : उत्तर सिक्किममधील हवाई बचाव मोहीम पूर्ण; ७६ सैनिकांना वाचवण्यात यश

गंगटोक : उत्तर सिक्किममधील छातेन येथून सुरु असलेली हवाई बचाव मोहीम आज शनिवारी सकाळी एमआय-१७ हेलिकॉप्टरच्या

काँग्रेस काळजी नक्षलवाद्यांची, भाजपाकडे केली शस्त्रसंधीची मागणी

नवी दिल्ली : भारताला नक्षलवादमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या नेतृत्वात देशव्यापी मोहीम सुरू आहे. सर्व