Mumbai airport news : मुंबई विमानतळ उद्या सहा तासांसाठी बंद; काय आहे कारण?

मुंबई : मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) १७ ऑक्टोबरला ६ तासांसाठी बंद (Mumbai Airport Shut) ठेवण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजल्यापासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विमानतळ बंद असणार आहे. या सहा तासांदरम्यान मुंबई विमानतळावरून कोणतंही उड्डाण होणार नाही.


छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (CSMIA) वार्षिक प्रतिबंधात्मक देखभालीसाठी हे विमानतळ उद्या सहा तासांसाठी तात्पुरतं बंद करण्यात येणार आहे. या ठिकाणच्या दोन्ही धावपट्टीवर देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.


अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावरील या नियोजित तात्पुरत्या बंदचा प्राथमिक उद्देश विमानतळाच्या पायाभूत सुविधा सुधारून त्यांचा सर्वोत्तम दर्जा राखणे आहे. या काळात आवश्यक असलेली दुरुस्ती आणि देखभाल कामे करण्यात येतील. यासंबंधी एअरमेन, एअरलाइन्स आणि इतर संबंधितांना सहा महिने अगोदर नोटीस जारी करण्यात आली आहे.



निवेदनात काय म्हटले आहे?


विमानतळ ऑपरेटरच्या निवेदनानुसार सांगण्यात आलं आहे की, 'सीएसएमआयएच्‍या (CSMIA) पावसाळ्यानंतरच्या सर्वसमावेशक धावपट्टी देखभाल योजनेचा एक भाग म्हणून, दोन्ही रनवे RWY 09/27 आणि RWY 14/32 हे १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:०० ते १७:०० वाजेपर्यंत तात्पुरते नॉन-ऑपरेशनल राहतील.' निवेदनात पुढे म्हटलं आहे की, 'सीएसएमआयए (CSMIA) ने सर्व महत्त्वाच्या विभागांच्या सहकार्याने देखभालीचं काम सुरळीतपणे पूर्ण करण्यासाठी प्रभावीपणे उड्डाणे निर्धारित केली आहेत. सीएसएमआयएला प्रवाशांकडून सहकार्य आणि पाठिंबा अपेक्षित आहे."



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

कुलाबा सांडपाणी प्रकल्पातील प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या खरेदीसाठी संस्थांच्या उड्या; प्रति हजार लिटरसाठी १५ रुपयांचा दर आकारला जाणार

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने समुद्रात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मलजल प्रक्रिया

अनाया बांगरचा शस्त्रक्रिया करत मोठा निर्णय, देशातील पहिलंच प्रकरण नेमकं काय?

मुंबई: माजी भारतीय क्रिकेटर संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर हिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनायाचा

अविवाहित, विधवा आणि घटस्फोटित मुलींना मोठा दिलासा

लातूर : राज्य सरकारने सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, आता राज्य सरकारी

सिद्धिविनायक मंदिरात चोरी झाली उघड; कर्मचारीच....

मुंबई : प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात चोरीची घटना समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे.

राज्यातील हॉटेल, उपहारगृहांसाठी आता २० टक्के अतिरिक्त गॅस पुरवठा होणार- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

राज्यातील हॉटेल, ढाबे,उपहारगृहे, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया-दुग्धव्यवसाय, राज्य शासन किंवा स्थानिक

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाविषयी महत्वाची अपडेट

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकल्पातील