मुंबई : मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) १७ ऑक्टोबरला ६ तासांसाठी बंद (Mumbai Airport Shut) ठेवण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजल्यापासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विमानतळ बंद असणार आहे. या सहा तासांदरम्यान मुंबई विमानतळावरून कोणतंही उड्डाण होणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (CSMIA) वार्षिक प्रतिबंधात्मक देखभालीसाठी हे विमानतळ उद्या सहा तासांसाठी तात्पुरतं बंद करण्यात येणार आहे. या ठिकाणच्या दोन्ही धावपट्टीवर देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.
अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावरील या नियोजित तात्पुरत्या बंदचा प्राथमिक उद्देश विमानतळाच्या पायाभूत सुविधा सुधारून त्यांचा सर्वोत्तम दर्जा राखणे आहे. या काळात आवश्यक असलेली दुरुस्ती आणि देखभाल कामे करण्यात येतील. यासंबंधी एअरमेन, एअरलाइन्स आणि इतर संबंधितांना सहा महिने अगोदर नोटीस जारी करण्यात आली आहे.
विमानतळ ऑपरेटरच्या निवेदनानुसार सांगण्यात आलं आहे की, ‘सीएसएमआयएच्या (CSMIA) पावसाळ्यानंतरच्या सर्वसमावेशक धावपट्टी देखभाल योजनेचा एक भाग म्हणून, दोन्ही रनवे RWY 09/27 आणि RWY 14/32 हे १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:०० ते १७:०० वाजेपर्यंत तात्पुरते नॉन-ऑपरेशनल राहतील.’ निवेदनात पुढे म्हटलं आहे की, ‘सीएसएमआयए (CSMIA) ने सर्व महत्त्वाच्या विभागांच्या सहकार्याने देखभालीचं काम सुरळीतपणे पूर्ण करण्यासाठी प्रभावीपणे उड्डाणे निर्धारित केली आहेत. सीएसएमआयएला प्रवाशांकडून सहकार्य आणि पाठिंबा अपेक्षित आहे.”
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…