Samruddhi Highway accident : समृद्धी महामार्ग अपघात प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

  299

मुख्यमंत्र्यांनी अपघाताचे कारण सांगत दिले कारवाईचे आदेश


मुंबई : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) काल मध्यरात्री एक भीषण अपघात (Accident) झाला. देवदर्शन करून परतत असलेल्या भाविकांवर काळाचा घाला घातला गेला. हे भाविक सैलानी येथील दर्ग्यावरून परतत होते. त्या दरम्यान समृद्धी महामार्गावरील वैजापूरच्या जांबरगाव टोलनाक्याजवळ ट्रॅव्हल्स बस आणि ट्रक यांच्यात मोठा अपघात झाला. या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला तर २३ जण जखमी झाले आहेत. या घटनेवर शोक व्यक्त करत राज्य सरकार व पंतप्रधान कार्यालयाने मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या अपघाताचे कारण सांगत दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.


आज ठाण्यात मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाबाबत माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आमच्या कॅबिनेटमधील मंत्री दादा भुसे, संदीपान भुमरे, तसेच अतुल सावे, रमेश बोरनारे यांनी आज घटनास्थळी भेट दिली, तसेच जखमींची विचारपूसही केली. या घटनेबाबत मी पोलीस महानिरीक्षकांशी, तिथल्या पोलीस अधीक्षकांशी बोललो. मी त्यांना याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. तसेच जखमींवरील उपचारांचा खर्च आपलं सरकार करेल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.



अपघात नेमका कशामुळे झाला?


या अपघातातील जखमी प्रवाशांनी दावा केला आहे की आरटीओ अधिकाऱ्यांनी एक ट्रक थांबवला होता. हा ट्रक रस्त्याकडेला उभा होता. ट्रकचालक तिथून ट्रक काढत असताना टेम्पो ट्रॅव्हलरने मागून धडक दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील जखमी प्रवाशांच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, अपघाताच्या प्राथमिक पाहणीनुसार, आरटीओने ट्रक थांबवला होता. त्या ट्रकला ही टेम्पो ट्रॅव्हलर गाडी धडकली. यामध्ये आरटीओचे अधिकारी किंवा ट्रकचा चालक जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.



राज्य व पंतप्रधान कार्यालयाकडून मदत जाहीर


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली असून जखमींवर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाने या घटनेची दखल घेत अपघातातील मृतांच्या कुटुबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीद्वारे प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५०,००० रुपयांची मदत जाहीर केली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

उबाठाचे १० ते १५ माजी नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, महिन्याभरात होणार प्रवेश

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उबाठा सेनेला आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. येत्या

बेस्ट तोट्यात जाण्यास तत्कालीन सत्ताधारी उबाठा शिवसेनाच जबाबदार, काँग्रेसचा घरचा आहेर!

काँग्रेसचे माजी आमदार मधु चव्हाण यांचा आरोप भाडेतत्वावरील खासगी बसेस बंद करा मुंबई : बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात

Dadar Kabutar Khana Controversy: कबुतर खानाच्या राड्यानंतर देवेंद्र फडणविसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले "लोकांचे आरोग्य..."

मुंबई: मुंबईतील दादरमधील कबुतरखाना बंद करण्यावरून जैन समाज आज आक्रमक झाल्याचे दिसून आले. मुंबई उच्च

हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात मनसेचा यू टर्न

मुंबई : न्यायालयाच्या आदेशामुळे मुंबईतले कबुतरखाने बंद करण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. तसेच

जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसावर खटला

मुंबई : जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस रेल्वेत गोळीबार आणि हत्या प्रकरणात बडतर्फ कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी

Dadar Kabutar Khana : प्रार्थना संपली... आता प्रतिकार! कबुतरखान्यावर जैन समाज संतप्त, पोलिसांसोबत बाचाबाची

मुंबई : मुंबईतील कबूतरखाना परिसर पुन्हा एकदा तणावाच्या वातावरणात सापडला आहे. जैन समाजाने यापूर्वी जाहीर केलेले