Earthquake: दिल्ली-NCRमध्ये भूकंपाचे झटके, हरियाणाच्या फरीदाबादमध्ये होते केंद्र

नवी दिल्ली: दिल्ली-NCRमध्ये रविवारी भूकंपाचे(earthquake) तीव्र झटके बसले. दिल्लीसह नोएडा आणि गाझियाबादमध्ये रविवारी भूकंपाचे धक्के जाणवले. हरयाणाच्या अनेक भागांमध्येही भूकंप आला. याआधी ३ ऑक्टोबरला राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे झटके जाणवले. भूकंपाची तीव्रता इतकी जास्त होती की लोक आपल्या घरातून निघून रस्त्यावर आले. दरम्यान, या भूकंपामुळे कोणाचेही नुकसान झाल्याची बातमी नाही.


नॅशनल सेंटर फॉर सीस्मोॉलॉजीच्या माहितीनुसार दिल्ली-एनसीआरमध्ये आलेल्या भूकंपाची तीव्रता ३.१ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचे झटके संध्याकाळी ४ वाजून ८ मिनिटांनी जाणवले होते. भूकंपाचा केंद्र हरयाणाच्या फरीदाबाद येथे होते. रविवारी सुट्टी असल्याने लोक आपल्या घरातच होते. मात्र जसे भूकंपाचे धक्के जाणवले तसे लोक बाहेर पळत सुटले.


 


याआधी ३ ऑक्टोबरला नेपाळमध्ये ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आणल्यानंतर दिल्ली एनसीआर तसेच उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले होते. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने म्हटले होते भूकंपाचे केंद्रबिंदू काठमांडूपासून ७०० किमी पश्चिममध्ये बाझांग जिल्ह्याच्या तालकोट भागात दुपारी २.४० वाजता दाखल केला होता.



दिल्लीत ४ अथवा ४.५ तीव्रतेचे भूकंप


दिल्ली क्षेत्रामध्ये ४ अथवा ४.५ तीव्रतेचे भूकंप येणे ही सामान्य बाब आहे. गेल्या १०० वर्षात दिल्लीमध्ये साधारण २५ ते ३० असे भूकंप आले आहेत. यात काही खास नुकसान झालेले नाही. अशातच दिल्ली-एनसीआरमध्ये ५ च्या तीव्रतेपेक्षा कमी भूकंप आल्यास दिल्ली-एनसीआरवाल्यांना जास्त चिंता करण्याची गरज नाही.

Comments
Add Comment

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११