चहा ५ रुपये, समोसा १२ रुपये, थाळी ७१ रुपये; निवडणूक खर्चासाठी आयोगाचे मेन्यू कार्ड तयार

  126

नवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणुकीची रंगीत तालिम समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election) धुरळा उडाला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवार कोणत्याही थराला जातात, अगदी शेकडो कोटी रुपये खर्च करण्याची तयारी ठेवतात. त्यांच्या खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी निवडणूक आयोगाने (Election Commission) चंगच बांधल्याचे दिसून येते.


एकीकडे काँग्रेस, भाजपसह सर्वच राज्यांनी या विधानसभा जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगानेही चांगलीच तयारी सुरू केली. निवडणूक आयोग आता उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेऊन आहे. त्याचाच एक भाग म्हणून आयोगाने उमेदवारांच्या खर्चासाठी मेन्यू कार्ड आणि रेट कार्ड जारी केले आहे. त्यामध्ये चहा ५ रुपये, कॉफी १३ रुपये, समोसा १२ रुपये तर रसगुल्ले आणि द्राक्षे-केळ्यांच्याही किमती निवडणूक आयोगाने निर्धारित केली आहे. त्यानुसार उमेदवारांनी आयोगाला त्यांच्या खर्चाचा हिशोब द्यायचा आहे.


निवडणूक आयोगाने प्रचारात वापरण्यात येणाऱ्या साहित्यांची किंमत निर्धारित केली आहे. त्यानुसार एक रेट कार्ड तयार केले असून त्या माध्यमातून उमेदवारांच्या खर्चाची नोंद केली जाणार आहे. जिल्हा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून उमेदवारांच्या या खर्चाची नोंद केली जाणार आहे. त्यामध्ये एक प्लॅस्टिक खुर्ची ५ रुपये, पाईपची खुर्ची ३ रुपये, व्हीआयपी खुर्ची १०५ रुपये, लाकडी टेबल ५३ रुपये, ट्यूबलाईट १० रुपये, हॅलोजन लाईट ५०० व्हॅट ४२ रुपये आणि १००० व्हॅट ७४ रुपये, सोफा ६३० रुपये असा खर्च नोंदवला जाणार आहे.


निवडणूक आयोगाने उमेदवारांकडून कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या खाण्या-पिण्यावर करण्यात येणाऱ्या खर्चावरही निर्बंध आणले आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाने मेन्यू कार्डच जारी केले आहे. त्यामध्ये केळी २१ रुपये डझन, द्राक्षे ८४ रुपये किलो, आरओ पाणी २० रुपये लिटर, कोल्ड ड्रिंक आणि आईसक्रीम एमआरपी किमतीने, उसाचा रस १० रुपये ग्लास, आणि जेवणाची थाळी ७१ रुपये प्लेट तर रसगुल्ला प्रति किलोसाठी २१० रुपये खर्च लावण्यात येणार आहे.


या व्यतिरिक्त गाडी भाड्याची किंमतही निवडणूक आयोगाने निर्धारित केली आहे. मिनी २० सीटर गाडीसाठी रोज ६३०० रुपये भाडे, ३५ सीटर बससाठी ८४०० रुपये भाडे, टेम्पो १२६० रुपये, व्हिडीओ व्हॅन ५२५० रुपये, ड्रायव्हर मजुरी ६३० रुपये या हिशोबाने खर्च लावण्यात येणार आहे.


उमेदवाराने केलेल्या खर्चाचा हिशोब निवडणूक आयोगाला देणे बंधनकारक आहे. गेल्या निवडणुकीवेळी ज्या उमेदवाराने खर्च दिला नाही त्याच्यावर आयोगाने कारवाई केली आहे. अशा ४६ नेत्यांना निवडणूक लढण्यास बंदी घालण्यात आली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

पंतप्रधान आज कर्नाटकात, नागपूर-पुणेसह तीन वंदे भारत एक्सप्रेसना दाखवणार हिरवा झेंडा

बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १० ऑगस्ट रोजी कर्नाटकला भेट देणार आहेत. ते सकाळी ११ वाजता बेंगळूरु इथल्या

उत्तरकाशीच्या धारली आणि हर्षील गावाची परिस्थिती अजूनही बिकट! २५० लोकं अजूनही अडकलेले

उत्तरकाशी: उत्तरकाशीच्या धारली गावात झालेल्या आपत्तीनंतर परिस्थिती अजूनही गंभीर आहे. धारलीकडे जाणारे सर्व

भारत निवडणूक आयोगाकडून मोठी कारवाई! महाराष्ट्रातील ९ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

मुंबई: भारत निवडणूक आयोगाने (ECI) निवडणूक व्यवस्था पारदर्शक करण्याच्या मोहिमेअंतर्गत कारवाई करत ३३४ नोंदणीकृत

अयोध्येत श्रीराम तर बिहारमध्ये सीताधाम; अमित शाहांच्या हस्ते सीतेच्या मंदिरासाठी पायाभरणी

सीतामढ़ी : बिहारच्या सीतामढ़ी येथील पुनौरा धाम येथे माता जानकीच्या भव्य मंदिराचा शिलान्यास झाला. हा केवळ

निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना सडेतोड उत्तर

निवडणूक आयोगाने काढली राहुल गांधींच्या आरोपांतील हवा नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते राहुल गांधी

ट्रम्पचा टॅरिफ बॉम्ब अमेरिकेवरच आदळला! भारताबरोबरच या २ देशांनीही दिला दणका

टॅरिफमुळे अमेरिकेच्या लढाऊ विमानांचा करार अडचणीत नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी