Election duty: निवडणूक ड्युटीपासून पळ काढण्यासाठी ५ दिवसांत ५०० अर्ज

ग्वालियर: मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच या ड्युटीपासून पळ काढणाऱ्यांची मोठी रांग लागली आहे. लगेचच प्रशासनाकडे यासाठीचे अर्ज येण्यास सुरूवात झाली आहे. यात एकाहून एक असे बहाणे दिले जात आहे.ज्यामुळे वाचणाऱ्यांचे मात्र मनोरंजन होत आहे.


विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच निवडणूक ड्युटीपासून पळ काढण्यासाठी आता सुट्टीचे अर्ज येऊ लागले आहेत. या अर्जामध्ये ड्युटीपासून पळ काढण्यासाठी अर्जदारांनी जी काही कारणे दिली आहेत ती हसण्यासारखीच आहेत. मध्य प्रदेश इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनमध्ये मॅनेजर पदावर असलेल्या एका अधिकाऱ्याने लिहिले की, माझी अचानक स्मृती निघून जाते. दोन-दोन तास विस्मृतीत जातो. अशातच निवडणूक ड्युटी कशी करता येईल. दरम्यान स हा अर्ज प्रशासनाने मेडिकल बोर्डाकडे पाठवला आहे.



एकाहून एक बहाणे


लष्कर सर्कलच्या एका सरकारी शाळेतील प्रिन्सिपलने निवडणूक ड्युटीपासून पळ काढण्यासाठी दिलेल्या अर्जात लिहिले की, माझ्या हिमोग्लोबिनचा स्तर कमी असतो. हा आकडा कमी जास्त होत असतो. या कारणामुळे ३० ते ४० मिनिटे मी बेशुद्धही होतो. अशातच मी निवडणूक ड्युटी कशी करू शकतो.



५ दिवसांत ५०० अर्ज


९ ऑक्टोबरला निवडणुकीची घोषणा झाली आहे आणि ५ दिवसांत तब्बल ५००हून अधिक असे अर्ज आले आहेत. यात एकूण असे १३० अर्ज आहेत ज्यात निवडणूक ड्युटीपासून पळ काढण्यासाठी अनेक अजबगजब कारणे देण्यात आली आहेत.

Comments
Add Comment

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक

Doctor Death News : युवा डॉक्टरांचे स्वप्न भंगले; भरधाव कारची ट्रकला धडक, वेगामुळे झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (३ डिसेंबर २०२५) रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी आणि

८७ बेकायदेशीर 'लोन ॲप'वर कारवाई : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि अवैध ऑनलाइन कर्ज व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी बांधकामात मशि‍दीचा अडथळा

कोलकाता: सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असणाऱ्या कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ

रेल्वेचा नवीन नियम लागू; आता खिडकीवर तिकीट खरेदी करताना सुद्धा लागणार 'ओटीपी'

मुंबई: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंगच्या