Election duty: निवडणूक ड्युटीपासून पळ काढण्यासाठी ५ दिवसांत ५०० अर्ज

ग्वालियर: मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच या ड्युटीपासून पळ काढणाऱ्यांची मोठी रांग लागली आहे. लगेचच प्रशासनाकडे यासाठीचे अर्ज येण्यास सुरूवात झाली आहे. यात एकाहून एक असे बहाणे दिले जात आहे.ज्यामुळे वाचणाऱ्यांचे मात्र मनोरंजन होत आहे.


विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच निवडणूक ड्युटीपासून पळ काढण्यासाठी आता सुट्टीचे अर्ज येऊ लागले आहेत. या अर्जामध्ये ड्युटीपासून पळ काढण्यासाठी अर्जदारांनी जी काही कारणे दिली आहेत ती हसण्यासारखीच आहेत. मध्य प्रदेश इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनमध्ये मॅनेजर पदावर असलेल्या एका अधिकाऱ्याने लिहिले की, माझी अचानक स्मृती निघून जाते. दोन-दोन तास विस्मृतीत जातो. अशातच निवडणूक ड्युटी कशी करता येईल. दरम्यान स हा अर्ज प्रशासनाने मेडिकल बोर्डाकडे पाठवला आहे.



एकाहून एक बहाणे


लष्कर सर्कलच्या एका सरकारी शाळेतील प्रिन्सिपलने निवडणूक ड्युटीपासून पळ काढण्यासाठी दिलेल्या अर्जात लिहिले की, माझ्या हिमोग्लोबिनचा स्तर कमी असतो. हा आकडा कमी जास्त होत असतो. या कारणामुळे ३० ते ४० मिनिटे मी बेशुद्धही होतो. अशातच मी निवडणूक ड्युटी कशी करू शकतो.



५ दिवसांत ५०० अर्ज


९ ऑक्टोबरला निवडणुकीची घोषणा झाली आहे आणि ५ दिवसांत तब्बल ५००हून अधिक असे अर्ज आले आहेत. यात एकूण असे १३० अर्ज आहेत ज्यात निवडणूक ड्युटीपासून पळ काढण्यासाठी अनेक अजबगजब कारणे देण्यात आली आहेत.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी