बक्सर: दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनल येथून आसामच्या कामाख्यापर्यंत जाणाऱ्या १२५०६ नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसचे(north east express) २१ डबे बुधवारी बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपूर स्टेशनजवळ रुळावरून घसरले. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे तर शेकडो जण जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेचे ६ डबे खूपच वाईट पद्धतीने रूळावरून घसरले. या डब्यांमधील अनेक प्रवासही अद्यापही अडकलेले आहेत. या कारणामुळे प्रवाशांची स्थिती खूपच नाजूक आहे. अपघातानंतर घटनास्थळी बचावकार्य वेगात सुरू आहे.
पाटणा येथून एनडीआरएफची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. बक्सरशिवाय आरा आणि पाटणा येथून डॉक्टरांची टीम अॅम्ब्युलन्ससह रवाना झाली आहे. यातच बक्सरचे खासदार अश्विनी चौबे हे ही घटनास्थळी रवाना झाले आहेत.
या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून अपघातानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाल्याचे दिसून आले. बुधवारी रात्री ९.३५ मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताबाबद बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले, रेल्वे रूळावरून घसरल्याची माहिती मिळताच संबंधित जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी याबाबत चर्चा झाली. ते म्हणाले, बिहार सरकार तत्परतेने पीडित तसेच जखमींच्या बचावकार्यात व्यस्त आहे.
सेवाव्रती: शिबानी जोशी ईशान्य भारतातील सात राज्ये निसर्ग संपन्नतेने नटलेली राज्य; परंतु सीमारेषा जवळ असल्यामुळे…
मुंबई : आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना आणखीन महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीएनजी…
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर या फॉरमॅटला अलविदा म्हटले…
महाराष्ट्रातील १० कॉलेजचा त्यात समावेश मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या…
वॉशिंग्टन : अमेरिकेत आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. वाढती बेरोजगारी आणि आयटीतील एआयचा वाढता यामुळे…
मुंबई: केसगळती(hair fall) ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. थोडेफार केस गळणे ही सामान्य बाब…