Train Accident: बिहारमध्ये नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसचे २१ डबे रूळावरून घसरले, ४ जणांचा मृत्यू

बक्सर: दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनल येथून आसामच्या कामाख्यापर्यंत जाणाऱ्या १२५०६ नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसचे(north east express) २१ डबे बुधवारी बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपूर स्टेशनजवळ रुळावरून घसरले. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे तर शेकडो जण जखमी झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेचे ६ डबे खूपच वाईट पद्धतीने रूळावरून घसरले. या डब्यांमधील अनेक प्रवासही अद्यापही अडकलेले आहेत. या कारणामुळे प्रवाशांची स्थिती खूपच नाजूक आहे. अपघातानंतर घटनास्थळी बचावकार्य वेगात सुरू आहे.

 





पाटणा येथून एनडीआरएफची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. बक्सरशिवाय आरा आणि पाटणा येथून डॉक्टरांची टीम अॅम्ब्युलन्ससह रवाना झाली आहे. यातच बक्सरचे खासदार अश्विनी चौबे हे ही घटनास्थळी रवाना झाले आहेत.

या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून अपघातानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाल्याचे दिसून आले. बुधवारी रात्री ९.३५ मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताबाबद बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले, रेल्वे रूळावरून घसरल्याची माहिती मिळताच संबंधित जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी याबाबत चर्चा झाली. ते म्हणाले, बिहार सरकार तत्परतेने पीडित तसेच जखमींच्या बचावकार्यात व्यस्त आहे.

 
Comments
Add Comment

IND vs PAK: मैदानावरही ऑपरेशन सिंदूर!' पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानवर विजयानंतर केले खास ट्विट

नवी दिल्ली: भारताने आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून ९व्यांदा विजेतेपद पटकावल्यानंतर

करूर चेंगराचेंगरीत मृतांची संख्या ४० वर, करूर दुर्घटनेतील ४० पैकी ३५ मृतदेहांची ओळख पटली; टीव्हीके पक्षाची उच्च न्यायालयात स्वतंत्र चौकशीची मागणी

चेन्नई : अभिनेता आणि तमिलगा वेट्री कळघम पक्षाचे अध्यक्ष विजय यांच्या करूर येथील प्रचार सभेत झालेल्या भीषण

'मन की बात': मोदींचा स्वदेशी वस्तू वापरण्याचा आग्रह; महिला आणि परंपरांचा गौरव

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या 'मन की बात' या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या १२६ व्या भागात

पंजाब सीमेवर दोन पाकिस्तानी ड्रोन बीएसएफकडून जप्त

पाकिस्तानमधून ड्रग्ज तस्करीसाठी ड्रोनचा वापर चंदीगड : सीमा सुरक्षा दलाने भारत-पाकिस्तान सीमेवर केलेल्या

ऑक्टोबरमध्ये तब्बल २१ दिवस बँका बंद

मुंबई : पुढील महिन्यातील ऑक्टोबरमध्ये देशभरातील वेगवेगळ्या बँका एकूण २१ दिवस बंद राहणार आहेत. आरबीआयच्या

करूर दुर्घटना: विजयकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २० लाख, जखमींना २ लाख मदत जाहीर

तामिळनाडूतील सभेतील चेंगराचेंगरीत ३९ जणांचा मृत्यू; राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात इतक्या मोठ्या प्रमाणात