Train Accident: बिहारमध्ये नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसचे २१ डबे रूळावरून घसरले, ४ जणांचा मृत्यू

बक्सर: दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनल येथून आसामच्या कामाख्यापर्यंत जाणाऱ्या १२५०६ नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसचे(north east express) २१ डबे बुधवारी बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपूर स्टेशनजवळ रुळावरून घसरले. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे तर शेकडो जण जखमी झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेचे ६ डबे खूपच वाईट पद्धतीने रूळावरून घसरले. या डब्यांमधील अनेक प्रवासही अद्यापही अडकलेले आहेत. या कारणामुळे प्रवाशांची स्थिती खूपच नाजूक आहे. अपघातानंतर घटनास्थळी बचावकार्य वेगात सुरू आहे.

 





पाटणा येथून एनडीआरएफची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. बक्सरशिवाय आरा आणि पाटणा येथून डॉक्टरांची टीम अॅम्ब्युलन्ससह रवाना झाली आहे. यातच बक्सरचे खासदार अश्विनी चौबे हे ही घटनास्थळी रवाना झाले आहेत.

या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून अपघातानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाल्याचे दिसून आले. बुधवारी रात्री ९.३५ मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताबाबद बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले, रेल्वे रूळावरून घसरल्याची माहिती मिळताच संबंधित जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी याबाबत चर्चा झाली. ते म्हणाले, बिहार सरकार तत्परतेने पीडित तसेच जखमींच्या बचावकार्यात व्यस्त आहे.

 
Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने