Nitesh Rane : काही शेंबडे शिवाजी पार्कवर काँग्रेसचे गुणगान गाणार!

आम्हाला शिव्याशाप देणारे हे चायनीज मॉडेल हिंदुत्ववादी


संजय राऊत तुम्ही गजनी चित्रपटाच्या हिरोप्रमाणे अंगावर लिहा की...


आमदार नितेश राणे यांची सणसणीत टीका


मुंबई : आजचा सामनाचा अग्रलेख वाचल्यानंतर हे स्पष्ट झालं आहे की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) यांचा राजकीय लव्ह जिहाद झालेला आहे. याचं कारण असं की, नवरात्रीच्या काळात गरबा आणि दांडियाचं आयोजन करणार्‍या आयोजकांना जेव्हा आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने आवाहन केलं की, आतमध्ये खेळण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी येणारे लोक हिंदूच आहेत यासाठी आधारकार्ड तपासा आणि मगच त्यांना आत पाठवा. यावर जे 'हिंदूद्वेषी' आहेत ते बोलले, अशी सणसणीत टीका भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली. आजच्या पत्रकार परिषदेत हिंदूंचा द्वेष करणार्‍या उबाठाच्या नेत्यांना नितेश राणे यांनी चांगलेच फटकारले.


नितेश राणे म्हणाले, हिंदूद्वेषींचा मालक मविआच्या काळात मुख्यमंत्री असताना सर्वांत जास्त हिंदू सणांवरच निर्बंध आणले गेले. पण महायुतीच्या काळात आम्ही हिंदूंची बाजू घेऊन मोठ्या प्रमाणावर हिंदू सण साजरे करत असू तर आम्हाला शिव्याशाप देणारे हे चायनीज मॉडेल हिंदुत्ववादी आहेत. ते औरंगजेबाच्या विरोधात बोलत नाहीत, सनातन धर्माचा अपमान झाला तरी यांनी हिंदूंची बाजू घेतली नाही. जे काम हमास पॅलेस्टाईनमध्ये करत आहे, तीच भूमिका काँग्रेस आपल्या देशामध्ये बजावत असतानाही त्या काँग्रेसला कधी खडे बोल ऐकवताना यांना आपण ऐकलं नाही. जे दोन ओवेसी बंधू सतत हिंदूंविषयी गरळ ओकतात त्यांची थोबाडं बंद करण्याची यांच्यात हिंमत नाही आणि कोणी हिंदूंची बाजू घेत असेल तर लगेच यांना मिरच्या झोंबतात, अशी टीका नितेश राणे यांनी केली.



गजनी चित्रपटाच्या हिरोप्रमाणे अंगावर लिहा की...


आज सकाळी राम मंदिराविषयी बोलताना हे आम्ही त्या ठिकाण होतो, आम्ही हे केलं, ते केलं असे दाखले देत होते. या गजनी झालेल्या संजय राजाराम राऊतला मी सांगेन की गजनी चित्रपटात आमिर खान जसं अंगावर लिहून ठेवतो तसं अंगावर लिहा की राम मंदिराचं जेव्हा आंदोलन झालं तेव्हा संजय राऊत लोकप्रभामध्ये बसून राम जन्मभूमीच्या आंदोलनाच्या पूर्ण विरोधात लेख लिहित होता. माझ्याकडे ते लेख आहेत. ते त्याच्या शरीरावर चिकटवून मी त्याला मुंबईभर फिरायला लावू शकतो.



राम जन्मभूमी आंदोलनावेळी तुम्ही गोधडी ओली करायचं काम करायचे


उद्धव ठाकरे तर राम जन्मभूमी आंदोलनावेळी घरात बसून कॅमेरा साफ करायचे, त्यामुळे त्यांचा आणि राम जन्मभूमीचा काही संबंधच नाही. असे लोक जेव्हा आदरणीय पंतप्रधान मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह यांना विचारतात की तुम्ही नेमकं काय केलं, तेव्हा लक्षात घ्या की राम जन्मभूमी आंदोलनावेळी तुम्ही गोधडी ओली करायचं काम करायचे, अशी जहरी टीका नितेश राणे यांनी केली.



काही शेंबडे लोक एकत्र येऊन शिवाजी पार्कवर काँग्रेसचे गुणगान गाणार


ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क देण्यात आले यावर नितेश राणे म्हणाले की, काही शेंबडे लोक एकत्र येऊन काँग्रेसचे गुणगान गाणार असतील, हमासने पॅलेस्टाईनमध्ये किती चांगलं काम केलं हे बोलण्यासाठी उद्धव ठाकरे तिथे येऊन भाषण देणार असतील तर अशा शेंबड्या लोकांना थोडं बोलू द्यावं म्हणून महानगरपालिकेने त्यांना परवानगी दिली असेल, त्यात काही मोठी गोष्ट नाही. अशा कितीतरी मित्रमंडळांच्या सभा मुंबईमध्ये सगळीकडे होतच असतात.



राणे साहेबांना देखील दोनदा मारण्याचा प्रयत्न करण्यात आला


शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंनी जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा गौप्यसेफोट केला. यावर नितेश राणे म्हणाले की, हा गौप्यसेफोट नाही तर ते खरंच आहे. नारायण राणे साहेबांनी देखील जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा त्यांना मारण्याचा दोनदा प्रयत्न करण्यात आला. हे राणे साहेबांनी देखील वारंवार सांगितलं आहे आणि आम्हीही सांगत आहोत. उद्धव ठाकरे हा माणूसच असा आहे, त्याच्याबद्दल महाराष्ट्राच्या लोकांनी का सहानुभूती दाखवावी, हा मोठा प्रश्न आहे, असं नितेश राणे म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री