मुंबई: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने(tata consultancy service) कोरोनाच्या काळात सुरू केलेल्या वर्क फ्रॉम होम कल्चरला संपवले आहे. यासोबतच कंपनीने आपल्या सर्व ६.१४ लाख कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून काम करण्याची सूचना दिली आहे.
कोरोना महामारीनंतर असे पाऊल उचलणारी टीसीएस ही पहिली मोठी आयटी कंपनी आहे. टीसीएसचे एचआर हेड मिलिंद लक्कड यांनी सांगितले की कंपनीच्या मते ऑफिसमध्ये बसून काम केल्याने उत्पादनक्षमता वाढते. यामुळेच सर्व कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येण्यास सांगितले आहे.
लक्कड पुढे म्हणाले, आमचा विश्वास आहे की त्यांना कामावर येण्याची गरज आहे ज्यामुळे नवी वर्कफोर्स टीसीएसच्या मोठ्या वर्कफोर्ससोबत इंटिग्रेड होऊ शकेल. ही एक अशी पद्धत आहे ज्यामुळे ते टीसीएसचे मूल्य तसेच पद्धती समजावून घेऊ शकतील. आम्ही कर्मचाऱ्यांना आठवड्यातील सर्व दिवस येण्यास सांगितले आहे. गेल्या तीन वर्षात कंपनीत अनेक नवीन कर्मचाऱ्यांची भर्ती करण्यात आली. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचे समान मूल्य असले पाहिजे.
टीसीएसने सांगितले की इस्त्रायलमध्ये कंपनीचे २५० कर्मचारी आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे त्यांच्या कारभारावर खास फरक पडत नाही आहे. आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात आहोत. आमचे प्रमुख ध्येय ही त्यांची सुरक्षा आहे.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…