TCSने संपवले वर्क फ्रॉम होम कल्चर, सर्व कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून काम करण्याची सूचना

मुंबई: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने(tata consultancy service) कोरोनाच्या काळात सुरू केलेल्या वर्क फ्रॉम होम कल्चरला संपवले आहे. यासोबतच कंपनीने आपल्या सर्व ६.१४ लाख कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून काम करण्याची सूचना दिली आहे.


कोरोना महामारीनंतर असे पाऊल उचलणारी टीसीएस ही पहिली मोठी आयटी कंपनी आहे. टीसीएसचे एचआर हेड मिलिंद लक्कड यांनी सांगितले की कंपनीच्या मते ऑफिसमध्ये बसून काम केल्याने उत्पादनक्षमता वाढते. यामुळेच सर्व कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येण्यास सांगितले आहे.



तीन वर्षात अनेक नवे कर्मचारी दाखल


लक्कड पुढे म्हणाले, आमचा विश्वास आहे की त्यांना कामावर येण्याची गरज आहे ज्यामुळे नवी वर्कफोर्स टीसीएसच्या मोठ्या वर्कफोर्ससोबत इंटिग्रेड होऊ शकेल. ही एक अशी पद्धत आहे ज्यामुळे ते टीसीएसचे मूल्य तसेच पद्धती समजावून घेऊ शकतील. आम्ही कर्मचाऱ्यांना आठवड्यातील सर्व दिवस येण्यास सांगितले आहे. गेल्या तीन वर्षात कंपनीत अनेक नवीन कर्मचाऱ्यांची भर्ती करण्यात आली. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचे समान मूल्य असले पाहिजे.



इस्त्रायलमध्ये टीसीएसचे २५० कर्मचारी


टीसीएसने सांगितले की इस्त्रायलमध्ये कंपनीचे २५० कर्मचारी आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे त्यांच्या कारभारावर खास फरक पडत नाही आहे. आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात आहोत. आमचे प्रमुख ध्येय ही त्यांची सुरक्षा आहे.

Comments
Add Comment

अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम! भारताचा रशियाकडून तेल खरेदीवर तात्पुरत्या बंदीचा निर्णय

नवी दिल्ली: अमेरिकेने रशियातील दोन प्रमुख तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइल यांच्यावर नव्या आणि कठोर निर्बंधांची

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही

जम्मू काश्मीरमधून राज्यसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने तीन तर भाजपचा एका जागेवर विजय

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागांवर

देशात लवकरच सुरू होणार 'भारत टॅक्सी' सेवा; केंद्र सरकारच्या सहकार विभागाचे मोठे पाऊल

मुंबई : ॲप आधारित टॅक्सी सेवेत ओला आणि उबरसारख्या खाजगी कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी केंद्र

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.

मतदारांसाठी निवडणूक आयोगाचे नवे नियम; गरजेच्या किमान सुविधा देणे बंधनकारक

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे.