TCSने संपवले वर्क फ्रॉम होम कल्चर, सर्व कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून काम करण्याची सूचना

मुंबई: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने(tata consultancy service) कोरोनाच्या काळात सुरू केलेल्या वर्क फ्रॉम होम कल्चरला संपवले आहे. यासोबतच कंपनीने आपल्या सर्व ६.१४ लाख कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून काम करण्याची सूचना दिली आहे.


कोरोना महामारीनंतर असे पाऊल उचलणारी टीसीएस ही पहिली मोठी आयटी कंपनी आहे. टीसीएसचे एचआर हेड मिलिंद लक्कड यांनी सांगितले की कंपनीच्या मते ऑफिसमध्ये बसून काम केल्याने उत्पादनक्षमता वाढते. यामुळेच सर्व कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येण्यास सांगितले आहे.



तीन वर्षात अनेक नवे कर्मचारी दाखल


लक्कड पुढे म्हणाले, आमचा विश्वास आहे की त्यांना कामावर येण्याची गरज आहे ज्यामुळे नवी वर्कफोर्स टीसीएसच्या मोठ्या वर्कफोर्ससोबत इंटिग्रेड होऊ शकेल. ही एक अशी पद्धत आहे ज्यामुळे ते टीसीएसचे मूल्य तसेच पद्धती समजावून घेऊ शकतील. आम्ही कर्मचाऱ्यांना आठवड्यातील सर्व दिवस येण्यास सांगितले आहे. गेल्या तीन वर्षात कंपनीत अनेक नवीन कर्मचाऱ्यांची भर्ती करण्यात आली. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचे समान मूल्य असले पाहिजे.



इस्त्रायलमध्ये टीसीएसचे २५० कर्मचारी


टीसीएसने सांगितले की इस्त्रायलमध्ये कंपनीचे २५० कर्मचारी आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे त्यांच्या कारभारावर खास फरक पडत नाही आहे. आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात आहोत. आमचे प्रमुख ध्येय ही त्यांची सुरक्षा आहे.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी