Assembly election: राजस्थानात विधानसभा निवडणुकीची तारीख बदलली, आता २५ नोव्हेंबरला होणार मतदान

जयपूर: राजस्थानात(rajasthan) होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची(assembly election) तारीख बदलण्यात आली आहे. आधी २३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मात्र आता ही तारीख बदलून २५ नोव्हेंबर करण्यात आली आहे. दरम्यान, मतदान एकाच टप्प्यात होणार आहे. निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबरला असेल.


भारत निवडणूक आयोगाने राजस्थानसह पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली होती. राजस्थानात एकाच टप्प्यात निवडणूक होणार होती. त्यासाठी २३ नोव्हेंबर ही तारीख ठरवण्यात आली होती. मात्र तारखेची घोषणा केल्यानंतरर भारत निवडणूक आयोगाला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनासह विविध मीडिया प्लॅटफॉर्मने निवडणुकीच्या तारखेबाबत आपले मत मांडले होते.



२३ नोव्हेंबरला देवोत्थान एकादशी


२३ नोव्हेंबला देवोत्थान एकादशी आहे. यामुळे मोठ्या संख्येने विवाह समारंभ तसेच मंगलकार्ये आणि धार्मिक उत्सव असतात. अशातच लोकांना असुविधा होईल. वाहनांची कमतरता होईल आणि याचा परिणाम मतदानावरही होऊ शकतो. या कारणामुळे राज्यातील अनेक सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक संघटनांनी आयोगाकडे तारीख बदलण्याबाबत विचारणा केली होती. आयोगाने यावर विचार केला आणि मतदानाच्या तारखेत बदल करत ती २३ नोव्हेंबरच्या जागी २५ नोव्हेंबर केली.



राजस्थानात ५.२५ कोटी मतदार


निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार राजस्थानात ५.२५ कोटी मतदार आहेत. या ठिकाणी २.७३ कोटी पुरुष आणि २.५२ कोटी महिला मतदार आहेत. राजस्थानात कोणाचे सरकार बनणार हे ठवरण्यासाठी २२.०४ मतदांची भूमिका महत्त्वाची असेल जे पहिल्यांदा मतदान करतील.



कोणत्या राज्यात कधी होणार मतदान?


छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबरला मतदान
मिझोरममध्ये ७ नोव्हेंबरला मतदान
तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला मतदान
राजस्थानात २५ नोव्हेंबरला मतदान
मध्य प्रदेशात १७ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान


Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने