जयपूर: राजस्थानात(rajasthan) होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची(assembly election) तारीख बदलण्यात आली आहे. आधी २३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मात्र आता ही तारीख बदलून २५ नोव्हेंबर करण्यात आली आहे. दरम्यान, मतदान एकाच टप्प्यात होणार आहे. निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबरला असेल.
भारत निवडणूक आयोगाने राजस्थानसह पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली होती. राजस्थानात एकाच टप्प्यात निवडणूक होणार होती. त्यासाठी २३ नोव्हेंबर ही तारीख ठरवण्यात आली होती. मात्र तारखेची घोषणा केल्यानंतरर भारत निवडणूक आयोगाला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनासह विविध मीडिया प्लॅटफॉर्मने निवडणुकीच्या तारखेबाबत आपले मत मांडले होते.
२३ नोव्हेंबला देवोत्थान एकादशी आहे. यामुळे मोठ्या संख्येने विवाह समारंभ तसेच मंगलकार्ये आणि धार्मिक उत्सव असतात. अशातच लोकांना असुविधा होईल. वाहनांची कमतरता होईल आणि याचा परिणाम मतदानावरही होऊ शकतो. या कारणामुळे राज्यातील अनेक सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक संघटनांनी आयोगाकडे तारीख बदलण्याबाबत विचारणा केली होती. आयोगाने यावर विचार केला आणि मतदानाच्या तारखेत बदल करत ती २३ नोव्हेंबरच्या जागी २५ नोव्हेंबर केली.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार राजस्थानात ५.२५ कोटी मतदार आहेत. या ठिकाणी २.७३ कोटी पुरुष आणि २.५२ कोटी महिला मतदार आहेत. राजस्थानात कोणाचे सरकार बनणार हे ठवरण्यासाठी २२.०४ मतदांची भूमिका महत्त्वाची असेल जे पहिल्यांदा मतदान करतील.
छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबरला मतदान
मिझोरममध्ये ७ नोव्हेंबरला मतदान
तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला मतदान
राजस्थानात २५ नोव्हेंबरला मतदान
मध्य प्रदेशात १७ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान
नवी दिल्ली : टोमॅटोच्या दरात मोठी (Tomato Price Hike) वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये…
दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आता जवळ येऊ लागली…
आता कंपन्यांना द्यावी लागणार मोठ्या अक्षरात माहिती मुंबई : एफएसएसआयचे (FSSAI) अध्यक्ष अपूर्व चंद्र यांच्या…
वरळीत महिलेला चिरडणारा 'तो' कारचालक शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्याचा लेक कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक :…
परिसरात धुराचे लोट डोंबिवली : डोंबिवलीमधील एमआयडीसी (Dombivali MIDC Fire) परिसरातील अग्नितांडवाच्या घटना सातत्याने वाढत…
DYSP शंकर काळे यांच्या निलंबनाची शक्यता? रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र भूमी म्हणून रायगड…