Assembly election: राजस्थानात विधानसभा निवडणुकीची तारीख बदलली, आता २५ नोव्हेंबरला होणार मतदान

  85

जयपूर: राजस्थानात(rajasthan) होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची(assembly election) तारीख बदलण्यात आली आहे. आधी २३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मात्र आता ही तारीख बदलून २५ नोव्हेंबर करण्यात आली आहे. दरम्यान, मतदान एकाच टप्प्यात होणार आहे. निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबरला असेल.


भारत निवडणूक आयोगाने राजस्थानसह पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली होती. राजस्थानात एकाच टप्प्यात निवडणूक होणार होती. त्यासाठी २३ नोव्हेंबर ही तारीख ठरवण्यात आली होती. मात्र तारखेची घोषणा केल्यानंतरर भारत निवडणूक आयोगाला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनासह विविध मीडिया प्लॅटफॉर्मने निवडणुकीच्या तारखेबाबत आपले मत मांडले होते.



२३ नोव्हेंबरला देवोत्थान एकादशी


२३ नोव्हेंबला देवोत्थान एकादशी आहे. यामुळे मोठ्या संख्येने विवाह समारंभ तसेच मंगलकार्ये आणि धार्मिक उत्सव असतात. अशातच लोकांना असुविधा होईल. वाहनांची कमतरता होईल आणि याचा परिणाम मतदानावरही होऊ शकतो. या कारणामुळे राज्यातील अनेक सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक संघटनांनी आयोगाकडे तारीख बदलण्याबाबत विचारणा केली होती. आयोगाने यावर विचार केला आणि मतदानाच्या तारखेत बदल करत ती २३ नोव्हेंबरच्या जागी २५ नोव्हेंबर केली.



राजस्थानात ५.२५ कोटी मतदार


निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार राजस्थानात ५.२५ कोटी मतदार आहेत. या ठिकाणी २.७३ कोटी पुरुष आणि २.५२ कोटी महिला मतदार आहेत. राजस्थानात कोणाचे सरकार बनणार हे ठवरण्यासाठी २२.०४ मतदांची भूमिका महत्त्वाची असेल जे पहिल्यांदा मतदान करतील.



कोणत्या राज्यात कधी होणार मतदान?


छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबरला मतदान
मिझोरममध्ये ७ नोव्हेंबरला मतदान
तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला मतदान
राजस्थानात २५ नोव्हेंबरला मतदान
मध्य प्रदेशात १७ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान


Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.