इस्त्रायल-हमास यांच्यात युद्ध सुरूच, ९७० जणांचा मृत्यू

Share

गाझा: फिलिस्तानचे(palestine) दहशतवादी हमासने(hamas) शनिवारी ७ ऑक्टोबरला इस्त्राईलवर(israel) जोरदार हल्ला केला. त्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासविरुद्ध युद्धाची घोषणा केली. हमासचे दहशतवादी आणि इस्त्राईलचे लष्कर यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धात दोन्ही बाजूंचे तब्बल ९७०हून अधिक लोक मारले गेले आहेत.

बीबीसीच्या माहितीनुसार हमासच्या हल्ल्यात इस्त्राईलमधील ६०० लोकांचा मृत्यू झाला तर दोन हजाराहून अधिक जण जखमी आहेत. याशिवाय १०० लोकांना किडनॅप करण्यात आले आहे. तर दुसरीकडे इस्त्राईलच्या लष्कराच्या हल्ल्यात फिलिस्तानचे ३७० लोक मारले गेले आणि २२००हून अधिक जण जखमी झालेत.

इस्त्राईलच्या लष्कराच्या कारवाईनंतर दहशतवादी हमासने युद्धाची तीव्रता अधिकच वाढवली आहे. हमासने दावा केला की त्यांनी दक्षिण इस्त्राईलचे शहर स्टेरोटच्या दिशेने १०० रॉकेट्स टाकले. रॉकेट हल्ल्यात काही जणांना दुखापती झाल्या.

कधी झाली हल्ल्याची सुरूवात?

हमासच्या हल्ल्यानंतर शनिवारी सकाळी ६ वाजून ३५ मिनिटांनी मध्य आणि दक्षिण इस्त्राईलमध्ये सायरन वाजला. हमासकडून इस्त्राईलवर हजारो रॉकेट टाकण्यास सुरूवात केली. सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी इस्त्राईलच्या सुरक्षा दलाने सांगितले की हमासच्या युद्धखोरांनी गाझा येथून दक्षिण इस्त्राईलमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर यरूशलममध्येही सायनर वाजला.सकाळी ८ वाजून २३ मिनिटांनी दक्षिण इस्त्राईलमध्ये लोकांना ताब्यात घेण्यात आले आणि एकामागोमाग एक रॉकेट सोडण्यात आले. यानंतर इस्त्राईलने युद्धासाठी अलर्ट जारी केली.

सकाळी १० वाजून ३४ मिनिटांनी इस्त्राईलने हमासविरुद्ध युद्धाची घोषणा केली आणि १० वाजून ४६ मिनिटांनी गाझावर हल्ला केला. यानंतर इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पहिले विधान केले की आम्ही युद्धात आहोत.

Recent Posts

Hair Tips: पावसात केस भिजल्यास लगेच करा हे काम, नाहीतर होईल त्रास

मुंबई: पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. या मोसमात प्रत्येकाला आपले आरोग्य, त्वचा तसेच केसांची काळजी घेतली…

54 mins ago

टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत काही चाहते आजारी तर काही झाले जखमी

मुंबई: वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष काही क्रिकेट चाहत्यांसाठी मात्र भारी ठरला. खरंतर, भारतीय…

2 hours ago

Team india: बीसीसीआयकडून टीम इंडियाला १२५ कोटींचे बक्षीस

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…

10 hours ago

Indian player: विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंसाठी शिंदे सरकारकडून बक्षीस जाहीर

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…

11 hours ago

Shubh: शुभ काम करण्याआधी का खातात दही-साखर, हे खरंच शुभ असतं का?

मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…

11 hours ago

नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अखेर १२ वर्षानंतर कार्यान्वीत

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…

11 hours ago