India vs Australia World Cup 2023: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाला एक चूक पडली महागात

चेन्नई: आयसीसी वनडे विश्वचषक २०२३मध्ये(world cup 2023) भारतीय संघाने आपल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला ६ विकेट राखून हरवले. चेन्नईच्या एम ए चिदम्बरम स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेला हा सामना खूपच रोमांचक ठरला होता. एक वेळ अशी आली होती की जेव्हा भारतीय चाहत्यांचा श्वास रोखला गेला होता.


सामन्यात टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने २०० धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले होते. याच्या प्रत्युत्तरात रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने सुरूवातीला २ धावांवर आपले ३ विकेट गमावले होते.



ऑस्ट्रेलियाची एक चूक आणि....


यानंतर विराट कोहली आणि केएल राहुलने मोर्चा सांभाळला. मात्र पुन्हा एकदा अशी वेळ आली की ऑस्ट्रेलियाकडे सामन्यावर पकड मिळवण्याची संधी होती. मात्र ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूची चूक झाली आणि त्यांच्या हातून संधी गेली आणि सामनाही गेला.


 


डावातील ८व्या ओव्हरमध्ये जोश हेझलवूडने गोलंदाजी केली होती. याआधी त्याने २ विकेट घेतल्या होत्या. त्यावेळेस भारताची धावसंख्या ३ बाद २० इतकी होती. या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर कोहलीने हवेत शॉट मारण्याचा प्रयत्न केला मात्र बॉल हवेतच सर्कलच्या आत राहिला.



कोहलीला मिळाले जीवनदान


कोहलीचा कॅच पकडण्यासाठी विकेटकीपर अॅलेक्स कॅली आणि मिचेल मार्श धावले. मात्र दोघांमध्ये गोंधळ झाला आणि यातच बॉल खाली आल्यानंतर मार्शच्या हातातून निसटला. ही चूक ऑस्ट्रेलियाच्या संघाला खूपच भारी पडली. मिचेल मार्श आपली ही चूक कधीच विसरणार नाही.


कोहलीचा कॅच सुटला तेव्हा तो १२ धावांवर खेळत होता. त्यानंतर त्याने सामन्यात ११६ बॉल खेळत ८५ धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला विजय साकारता आला. याशिवाय केएल राहुलने ११५ बॉलमध्ये ९७ धावांची खेळी केली. यामुळे भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय साकारता आला.

Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या