IND vs AUS: मी आंघोळ करून अर्धा तास आराम करणार होतो मात्र...के एल राहुलने सांगितला मजेदार किस्सा

  139

चेन्नई: विश्वचषक २०२३मध्ये(world cup 2023) टीम इंडियाला(team india) पहिला विजय मिळवून देणाऱ्या केएल राहुलने सामन्यानंतर एक मजेदार किस्सा ऐकवला. प्लेयर ऑफ दी मॅच झालेल्या केएल राहुलने सांगितले की तो ऑस्ट्रेलियाच्या डावानंतर आंघोळ करून काही वेळ आराम करण्याबाबत विचार करत होता मात्र टीम इंडियाचे धडाधड विकेट पडल्याने त्याला पिचवर उतरावे लागले.


ऑस्ट्रेलियाकडून विजयासाठी मिळालेल्या २०० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची अवस्था सुरूवातीला २ धावांवर ३ विकेट अशी झाली होती. रोहित शर्मा, इशान किशन आणि श्रेयस अय्यर शून्यावर बाद झाले होते. त्यानंतर विराट कोहली(८५) आणि केएल राहुल(९७) यांच्यात १६५ धावांची भागीदारी झाली. यामुळे भारताला विजय साकारता आला.


सामन्यानंतर राहुल म्हणाला, मी आंघोळ करून बाहेर निघत होतो आणि विचार करत होतो की अर्धा तास आराम करू मात्र मला फलंदाजीसाठी यावे लागले. विराटने मला फक्त इतकेच सांगितले की येथे थोडा वेळ कसोटी क्रिकेटसारखे खेळावे लागेल. संघासाठी चांगला खेळ करू शकलो यासाठी मी खुश आहे. येथे सुरूवातीला वेगवान गोलंदाजांसाठी थोडी मदत होती. मात्र त्यानंतर दवाने आपली भूमिका निभावली.


 


पिचबाबत काय म्हणाला राहुल?


ही पिच दोन्ही बाजूंना गती देणारी होती. फलंदाजीसाठी चांगली विकेट नव्हती मात्र जास्त अडचणीही येत नव्हत्या. मला वाटते की क्रिकेटसाठी ही चांगली पिच होती.



तीन धावांनी हुकले शतक


केएल राहुलने आपले शतक हुकल्याबाबत सांगितले की मी शेवटच्या बॉलवर चांगले हिट केले होते. मला आधी चौकार आणि त्यानंतर षटकार ठोकत शतक पूर्ण करायचे होते. आशा आहे की पुढील वेळेस मी यशस्वी ठरेन.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार