IND vs AUS: मी आंघोळ करून अर्धा तास आराम करणार होतो मात्र...के एल राहुलने सांगितला मजेदार किस्सा

चेन्नई: विश्वचषक २०२३मध्ये(world cup 2023) टीम इंडियाला(team india) पहिला विजय मिळवून देणाऱ्या केएल राहुलने सामन्यानंतर एक मजेदार किस्सा ऐकवला. प्लेयर ऑफ दी मॅच झालेल्या केएल राहुलने सांगितले की तो ऑस्ट्रेलियाच्या डावानंतर आंघोळ करून काही वेळ आराम करण्याबाबत विचार करत होता मात्र टीम इंडियाचे धडाधड विकेट पडल्याने त्याला पिचवर उतरावे लागले.


ऑस्ट्रेलियाकडून विजयासाठी मिळालेल्या २०० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची अवस्था सुरूवातीला २ धावांवर ३ विकेट अशी झाली होती. रोहित शर्मा, इशान किशन आणि श्रेयस अय्यर शून्यावर बाद झाले होते. त्यानंतर विराट कोहली(८५) आणि केएल राहुल(९७) यांच्यात १६५ धावांची भागीदारी झाली. यामुळे भारताला विजय साकारता आला.


सामन्यानंतर राहुल म्हणाला, मी आंघोळ करून बाहेर निघत होतो आणि विचार करत होतो की अर्धा तास आराम करू मात्र मला फलंदाजीसाठी यावे लागले. विराटने मला फक्त इतकेच सांगितले की येथे थोडा वेळ कसोटी क्रिकेटसारखे खेळावे लागेल. संघासाठी चांगला खेळ करू शकलो यासाठी मी खुश आहे. येथे सुरूवातीला वेगवान गोलंदाजांसाठी थोडी मदत होती. मात्र त्यानंतर दवाने आपली भूमिका निभावली.


 


पिचबाबत काय म्हणाला राहुल?


ही पिच दोन्ही बाजूंना गती देणारी होती. फलंदाजीसाठी चांगली विकेट नव्हती मात्र जास्त अडचणीही येत नव्हत्या. मला वाटते की क्रिकेटसाठी ही चांगली पिच होती.



तीन धावांनी हुकले शतक


केएल राहुलने आपले शतक हुकल्याबाबत सांगितले की मी शेवटच्या बॉलवर चांगले हिट केले होते. मला आधी चौकार आणि त्यानंतर षटकार ठोकत शतक पूर्ण करायचे होते. आशा आहे की पुढील वेळेस मी यशस्वी ठरेन.

Comments
Add Comment

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए