IND vs AUS: मी आंघोळ करून अर्धा तास आराम करणार होतो मात्र...के एल राहुलने सांगितला मजेदार किस्सा

चेन्नई: विश्वचषक २०२३मध्ये(world cup 2023) टीम इंडियाला(team india) पहिला विजय मिळवून देणाऱ्या केएल राहुलने सामन्यानंतर एक मजेदार किस्सा ऐकवला. प्लेयर ऑफ दी मॅच झालेल्या केएल राहुलने सांगितले की तो ऑस्ट्रेलियाच्या डावानंतर आंघोळ करून काही वेळ आराम करण्याबाबत विचार करत होता मात्र टीम इंडियाचे धडाधड विकेट पडल्याने त्याला पिचवर उतरावे लागले.


ऑस्ट्रेलियाकडून विजयासाठी मिळालेल्या २०० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची अवस्था सुरूवातीला २ धावांवर ३ विकेट अशी झाली होती. रोहित शर्मा, इशान किशन आणि श्रेयस अय्यर शून्यावर बाद झाले होते. त्यानंतर विराट कोहली(८५) आणि केएल राहुल(९७) यांच्यात १६५ धावांची भागीदारी झाली. यामुळे भारताला विजय साकारता आला.


सामन्यानंतर राहुल म्हणाला, मी आंघोळ करून बाहेर निघत होतो आणि विचार करत होतो की अर्धा तास आराम करू मात्र मला फलंदाजीसाठी यावे लागले. विराटने मला फक्त इतकेच सांगितले की येथे थोडा वेळ कसोटी क्रिकेटसारखे खेळावे लागेल. संघासाठी चांगला खेळ करू शकलो यासाठी मी खुश आहे. येथे सुरूवातीला वेगवान गोलंदाजांसाठी थोडी मदत होती. मात्र त्यानंतर दवाने आपली भूमिका निभावली.


 


पिचबाबत काय म्हणाला राहुल?


ही पिच दोन्ही बाजूंना गती देणारी होती. फलंदाजीसाठी चांगली विकेट नव्हती मात्र जास्त अडचणीही येत नव्हत्या. मला वाटते की क्रिकेटसाठी ही चांगली पिच होती.



तीन धावांनी हुकले शतक


केएल राहुलने आपले शतक हुकल्याबाबत सांगितले की मी शेवटच्या बॉलवर चांगले हिट केले होते. मला आधी चौकार आणि त्यानंतर षटकार ठोकत शतक पूर्ण करायचे होते. आशा आहे की पुढील वेळेस मी यशस्वी ठरेन.

Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख