IND vs AUS: मी आंघोळ करून अर्धा तास आराम करणार होतो मात्र...के एल राहुलने सांगितला मजेदार किस्सा

चेन्नई: विश्वचषक २०२३मध्ये(world cup 2023) टीम इंडियाला(team india) पहिला विजय मिळवून देणाऱ्या केएल राहुलने सामन्यानंतर एक मजेदार किस्सा ऐकवला. प्लेयर ऑफ दी मॅच झालेल्या केएल राहुलने सांगितले की तो ऑस्ट्रेलियाच्या डावानंतर आंघोळ करून काही वेळ आराम करण्याबाबत विचार करत होता मात्र टीम इंडियाचे धडाधड विकेट पडल्याने त्याला पिचवर उतरावे लागले.


ऑस्ट्रेलियाकडून विजयासाठी मिळालेल्या २०० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची अवस्था सुरूवातीला २ धावांवर ३ विकेट अशी झाली होती. रोहित शर्मा, इशान किशन आणि श्रेयस अय्यर शून्यावर बाद झाले होते. त्यानंतर विराट कोहली(८५) आणि केएल राहुल(९७) यांच्यात १६५ धावांची भागीदारी झाली. यामुळे भारताला विजय साकारता आला.


सामन्यानंतर राहुल म्हणाला, मी आंघोळ करून बाहेर निघत होतो आणि विचार करत होतो की अर्धा तास आराम करू मात्र मला फलंदाजीसाठी यावे लागले. विराटने मला फक्त इतकेच सांगितले की येथे थोडा वेळ कसोटी क्रिकेटसारखे खेळावे लागेल. संघासाठी चांगला खेळ करू शकलो यासाठी मी खुश आहे. येथे सुरूवातीला वेगवान गोलंदाजांसाठी थोडी मदत होती. मात्र त्यानंतर दवाने आपली भूमिका निभावली.


 


पिचबाबत काय म्हणाला राहुल?


ही पिच दोन्ही बाजूंना गती देणारी होती. फलंदाजीसाठी चांगली विकेट नव्हती मात्र जास्त अडचणीही येत नव्हत्या. मला वाटते की क्रिकेटसाठी ही चांगली पिच होती.



तीन धावांनी हुकले शतक


केएल राहुलने आपले शतक हुकल्याबाबत सांगितले की मी शेवटच्या बॉलवर चांगले हिट केले होते. मला आधी चौकार आणि त्यानंतर षटकार ठोकत शतक पूर्ण करायचे होते. आशा आहे की पुढील वेळेस मी यशस्वी ठरेन.

Comments
Add Comment

Jasprit Bumrah : आयसीसी टी-२० क्रमवारी जसप्रीत बुमराहची टॉप ५ मध्ये नोंद

मुंबई : भारताने ८ मार्च रोजी टी२० विश्वचषक जिंकल्यापासून एकही टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही आणि

Gudi Padwa 2026 : सचिन तेंडुलकर, सूर्यकुमार आणि अजिंक्य रहाणेने यांच्यासह अनेक खेळाडूंनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर, नुकताच भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणारा सूर्यकुमार यादव, माजी फिरकी गोलंदाज

SRH IPL 2026 : ईशान किशन आणि अभिषेक शर्मावर हैदराबाद संघाने टाकली मोठी जबाबदारी

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या आधी, सनरायझर्स हैदराबादने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारताच्या नुकत्याच

खेळाडूंची ‘A+’ श्रेणीच रद्द? BCCIचा मोठा निर्णय; बुमराह- जडेजाच्या मानधनात होणार घट

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय २०२५-२६ हंगामासाठी क्रिकेटपटूंच्या वार्षिक करार आणि मानधन

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील

Chinnaswamy Stadium IPL 2026 : चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचे सामने आयोजित करण्यास हिरवा कंदील

आयपीएल २०२६ दरम्यान बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सामने आयोजित करण्यातील