World cup 2023: भारताची विश्वचषकात विजयी सलामी, ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय

चेन्नई: आपल्याच मायभूमीवर होत असलेल्या विश्वचषक २०२३(world cup 2023) मध्ये भारताने विजयी सलामी दिली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताने ६ गडी राखत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने दिलेले २०० धावांचे माफक आव्हान भारताने ६ गडी आणि ५२ बॉल राखत पूर्ण केले.


ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेले २०० धावांचे आव्हान पाहिल्यावर भारत हा सामना सहज जिंकेल असे वाटले होते. मात्र सुरूवातीला ऑस्ट्रेलियाने भारताला जबरदस्त धक्के दिले. मात्र त्यानंतर भारतीय संघ सावध झाला. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी डाव सावरत संघाला विजय मिळवून दिला.


लोकेश राहुलचे शतक ३ धावांनी हुकले. त्याने ९७ धावा केल्या. तर विराट कोहलीने ८५ धावा केल्या. दोघांनी चौथ्या विकेटसाठी मोठी भागीदारी रचली. त्यांच्या संयमी खेळीच्या जोरावर भारताला हा सहज वाटणारा विजय साकारता आला. भारताचे पहिले दोन्ही सलामीवीर भोपळा न फोडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यानंतर चौथ्या स्थानावर आलेल्या श्रेयस अय्यरलाही एकही धाव करता आली.


मात्र कोहली आणि लोकेश राहुलने संयम राखत भारताला मोठा विजय साकारून दिला. कोहली ८५ धावांवर बाद झाला. त्यानंतर हार्दिक पांड्या आला. त्याने ११ धावा केल्या.


तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना केवळ १९९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरने ४१ धावा केल्या. तर स्टीव्हन स्मिथने ४६ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना तितकीशी चांगली कामगिरी करता आली नाही.

Comments
Add Comment

शुभमन गिलच्या तब्येतीमध्ये सुधारणा, मात्र दुसरा कसोटी सामना खेळणार का?

कोलकाता: कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय

गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?

गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे