World cup 2023: भारताची विश्वचषकात विजयी सलामी, ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय

चेन्नई: आपल्याच मायभूमीवर होत असलेल्या विश्वचषक २०२३(world cup 2023) मध्ये भारताने विजयी सलामी दिली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताने ६ गडी राखत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने दिलेले २०० धावांचे माफक आव्हान भारताने ६ गडी आणि ५२ बॉल राखत पूर्ण केले.


ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेले २०० धावांचे आव्हान पाहिल्यावर भारत हा सामना सहज जिंकेल असे वाटले होते. मात्र सुरूवातीला ऑस्ट्रेलियाने भारताला जबरदस्त धक्के दिले. मात्र त्यानंतर भारतीय संघ सावध झाला. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी डाव सावरत संघाला विजय मिळवून दिला.


लोकेश राहुलचे शतक ३ धावांनी हुकले. त्याने ९७ धावा केल्या. तर विराट कोहलीने ८५ धावा केल्या. दोघांनी चौथ्या विकेटसाठी मोठी भागीदारी रचली. त्यांच्या संयमी खेळीच्या जोरावर भारताला हा सहज वाटणारा विजय साकारता आला. भारताचे पहिले दोन्ही सलामीवीर भोपळा न फोडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यानंतर चौथ्या स्थानावर आलेल्या श्रेयस अय्यरलाही एकही धाव करता आली.


मात्र कोहली आणि लोकेश राहुलने संयम राखत भारताला मोठा विजय साकारून दिला. कोहली ८५ धावांवर बाद झाला. त्यानंतर हार्दिक पांड्या आला. त्याने ११ धावा केल्या.


तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना केवळ १९९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरने ४१ धावा केल्या. तर स्टीव्हन स्मिथने ४६ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना तितकीशी चांगली कामगिरी करता आली नाही.

Comments
Add Comment

Shreyas Iyer Health Update : 'स्टार बॅट्समन' श्रेयस अय्यरकडून मोठी अपडेट! गंभीर दुखापतीनंतर ICU मधून भावनिक पोस्ट, चाहत्यांना दिलासा!

मुंबई : टीम इंडियाचा स्टार फलंदाज (Star Batsman) श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या एका गंभीर दुखापतीमुळे रुग्णालयात उपचार घेत आहे.

हरमनप्रीत कौर आणि तो ऐतिहासिक विक्रम: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी 'त्या' १७१ धावांची चर्चा!

नवी दिल्ली : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या

WC Semi-Final: पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचली दक्षिण आफ्रिका, इंग्लंडला १२५ धावांनी हरवले

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द : दुसरा सामना ३१ ऑक्टोबरला!

ऑस्ट्रेलिया : मनुका ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा पहिला टी२० सामना अखेर सततच्या

टी२० मध्ये पुन्हा पावसाचे विघ्न: २० ऐवजी १८ षटकांचा सामना !

कॅनबेरा : कॅनबेरातील मनुका ओव्हल स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत–ऑस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात पुन्हा एकदा

भारताला मोठा धक्का: दुखापतीमुळे नितीश कुमार रेड्डी तीन T20 सामन्यांमधून बाहेर!

कॅनबेरा : भारतीय क्रिकेट संघासाठी धोक्याची घंटा वाजवणारी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने बुधवारी दिलेल्या