चेन्नई: आपल्याच मायभूमीवर होत असलेल्या विश्वचषक २०२३(world cup 2023) मध्ये भारताने विजयी सलामी दिली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताने ६ गडी राखत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने दिलेले २०० धावांचे माफक आव्हान भारताने ६ गडी आणि ५२ बॉल राखत पूर्ण केले.
ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेले २०० धावांचे आव्हान पाहिल्यावर भारत हा सामना सहज जिंकेल असे वाटले होते. मात्र सुरूवातीला ऑस्ट्रेलियाने भारताला जबरदस्त धक्के दिले. मात्र त्यानंतर भारतीय संघ सावध झाला. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी डाव सावरत संघाला विजय मिळवून दिला.
लोकेश राहुलचे शतक ३ धावांनी हुकले. त्याने ९७ धावा केल्या. तर विराट कोहलीने ८५ धावा केल्या. दोघांनी चौथ्या विकेटसाठी मोठी भागीदारी रचली. त्यांच्या संयमी खेळीच्या जोरावर भारताला हा सहज वाटणारा विजय साकारता आला. भारताचे पहिले दोन्ही सलामीवीर भोपळा न फोडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यानंतर चौथ्या स्थानावर आलेल्या श्रेयस अय्यरलाही एकही धाव करता आली.
मात्र कोहली आणि लोकेश राहुलने संयम राखत भारताला मोठा विजय साकारून दिला. कोहली ८५ धावांवर बाद झाला. त्यानंतर हार्दिक पांड्या आला. त्याने ११ धावा केल्या.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना केवळ १९९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरने ४१ धावा केल्या. तर स्टीव्हन स्मिथने ४६ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना तितकीशी चांगली कामगिरी करता आली नाही.
प्रश्नपत्रिका तयार करतानाच घेणार 'ही' खास काळजी मुंबई : NEET PG परीक्षा रद्द झाल्यानंतर जवळपास…
यांचा वारीतला सहभाग केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपाच्या माजी खासदारांची विरोधकांवर बोचरी टीका सोलापूर : आषाढी…
आमदार नितेश राणे यांचा रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला कोणाची बुद्धी लहान याबाबत राहुल गांधी आणि…
भोलेबाबा करायचा दुधाची अंघोळ; खीर बनवून वाटला जायचा प्रसाद लखनऊ : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या…
गुंडांच्या साथीने पुण्यात डॉक्टरचे भयानक कृत्य पुणे : पुण्यात सातत्याने चित्रविचित्र गुन्हेगारीच्या घटना (Pune Crime)…
बालहक्क मंडळाकडे वकिलांमार्फत केला सादर पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत…