Kanjurmarg Dumping ground : कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यासाठी विक्रोळीत शिवसेनेचे आंदोलन

  317

दुर्गंधीने नागरिक त्रस्त


ठाणे : गेल्या काही वर्षांपासून मुंबई कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राऊंड मधून येणार्‍या दुर्गंधीसंदर्भात (Kanjurmarg Dumping ground) स्थानिकांनी वारंवार आंदोलनाची मागणी केली होती. मात्र, अजूनही त्यावर तोडगा काढण्यात आलेला नाही. मुंबई उपनगरातील डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने (Shivsena) कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. शिवसेनेचे नेते अनिल पांगारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे.


आंदोलकांनी डम्पिंग ग्राऊंडच्या समोर असलेला रस्ता म्हणजेच पूर्व द्रुतगती मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे ठाण्याची सर्व वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनिल पांगारे म्हणाले की, या मार्गावर कितीतरी दुर्गंधी येत आहे. गेली कित्येक वर्षे इथे राहणारे लोक ही दुर्गंधी सहन करत आहेत. आजारांना सामोरे जात आहेत. आमचं सरकार हे गोरगरिबांचं आहे, त्यामुळे त्यांनी हे कुठेतरी थांबवलं पाहिजे म्हणून हा रास्ता रोको आणि आंदोलन आम्ही करत आहोत. यामुळे इथे अडवण्यात आलेल्या लोकांनाही कळेल की थोडा वेळ थांबलं तरी किती दुर्गंधी सहन करावी लागते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.


आंदोलकांची ही मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचून आठ ते दहा दिवसांत प्रश्न सोडवला गेला पाहिजे अन्यथा आंदोलन आणखी तीव्र होईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. प्रशासन आणि आंदोलक यांच्यात मात्र अजूनही कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आंदोलनाची दखल घेऊन आठ ते दहा दिवसांत हा प्रश्न सुटणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या