Asian Games cricket 2023 : आशियाई स्पर्धेत अफगाणविरुद्धच्या क्रिकेट सामन्यात भारताला सुवर्णपदक

पावसामुळे सामना झाला होता रदद; 'असा' झाला विजय...


हांगझोऊ : आज सकाळी भारतीय महिला कबड्डी संघाने दमदार सुरुवात करत सुवर्णपदक पटकावले. यामुळे भारताची पदकसंख्या १०० झाली. यातच आजच्या दिवशी आशियाई क्रीडा स्पर्धांमधून (Asian Games 2023) आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट सामन्यात (Cricket Match) भारताने सुवर्णपदक पटकावले आहे. तर, अफगाणिस्तानला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे. यामुळे भारताच्या सुवर्णपदकांची आतापर्यंतची एकूण संख्या २८ झाली आहे. तर ३५ रौप्य आणि ४० ब्राँझ पदकांसह भारताची एकूण पदकसंख्या १०३ झाली आहे.


अफगाणिस्तान विरुद्ध भारत (Afganistan Vs. India) हा सामना सुरु असताना अचानक पाऊस सुरु झाला. त्यामुळे सामना मधेच थांबवावा लागला. हांगझोऊमध्ये अजूनही पाऊस सुरु आहे. त्यामुळे पुन्हा सामना सुरु करण्याची शक्यता फार कमी होती. म्हणून हा सामना रद्द करण्यात आला. आशियाई खेळांच्या नियमांनुसार, पावसामुळे सामना रद्द झाला, तर उच्च रँकिंग संघाला विजेता घोषित केलं जातं. या नियमानुसार, भारतीय संघ क्रमवारीत अफगाणिस्तानच्या पुढे असल्यामुळे भारताला सुवर्णपदक जाहीर करण्यात आलं.


भारताने आजच्या दिवसांत सहा सुवर्णपदकांची कमाई केली आहे. सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीने बॅडमिंटन पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत विजय मिळवत सुवर्ण पदकावर नाव कोरलं. योथी सुरेखा हिने महिलांच्या कंपाऊंड तिरंदाजीत सुवर्णपदक पटकावले, तर ओजस प्रवीण देवतळे याने पुरुषांच्या कंपाउंड तिरंदाजीत सुवर्णपदक जिंकले. महिला कबड्डी संघानेही अंतिम फेरीत चायनीज तैपेईचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले, तर कबड्डी पुरुषांच्या अंतिम फेरीत भारताने इराणचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. यानंतर क्रिकेटमध्ये सुवर्ण पटकावत भारताने आज सहा सुवर्णपदकांची कमाई केली आहे. यानंतर आता वर्ल्डकप देखील भारतच जिंकणार अशा आशयाचे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

India Population : अधिक मुले जन्माला घाला, सरकारकडून मिळणार आर्थिक मदत; पण वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणार नवे प्रश्न

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू (N. Chandrababu Naidu) यांनी राज्यातील घटता जन्मदर रोखण्यासाठी

Sasaram-Patna Passenger Train Catches Fire : सासाराम-पाटणा पॅसेंजरच्या डब्याला पहाटे भीषण आग, प्लॅटफॉर्मवर उडाली एकच धावपळ!

बिहार : बिहारमधील सासाराम जंक्शन रेल्वे स्थानकावर आज पहाटे एक मोठी दुर्घटना टळली. सासारामहून पाटण्याकडे

ICEYE भारतात उपग्रह उत्पादन सुरू करणार

नवी दिल्ली : अंतराळ-आधारित गुप्तचर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी 'आय-साय' (ICEYE) पुढील एका वर्षात भारतात आपले

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे