Kalyan Station : धावती ट्रेन पकडणं पडलं चांगलंच महागात... एकाचा मृत्यू तर एक जखमी

  86

कल्याण स्थानकावर नेमकं काय घडलं?


कल्याण : आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वतःची काळजी घेणं विसरुनच जातो. रोज कामावर जायच्या घाईत असणारे लोक उशीर होऊ नये म्हणून कसेही धावत्या ट्रेनमध्ये चढताना दिसतात. तर संध्याकाळी घरी जातानासुद्धा ट्रेनमध्ये बसायला जागा मिळावी म्हणून पुन्हा जीवघेणा प्रवास सुरु होतो. पण असंच घाई करणं दोन प्रवाशांना चांगलंच महागात पडलं आहे. कल्याण स्थानकावर (Kalyan Station) धावती डेक्कन क्वीन एक्स्प्रेस (Deccan Express) पकडण्याच्या नादात दोघांचाही तोल गेल्याने एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीवर सध्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.


डेक्कन क्वीन एक्स्प्रेस खरं तर कल्याण स्थानकावर थांबत नाही. तिथे फक्त तिचा वेग थोडा कमी होतो. यामुळेच काही लोक प्लॅटफॉर्मला थांबून ती धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करतात. मात्र आज ही धावती ट्रेन पकडत असताना दोन ते तीन प्रवाशांचा पाय घसरला अशी इतर प्रवाशांची माहिती आहे.


ही घटना घडताच प्लॅटफॉर्मवर असलेल्या रेल्वे पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. मात्र, यात एकाचा मृत्यू झाला. दरम्यान, जखमीला रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. ही घटना स्थानकात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या