Kalyan Station : धावती ट्रेन पकडणं पडलं चांगलंच महागात... एकाचा मृत्यू तर एक जखमी

कल्याण स्थानकावर नेमकं काय घडलं?


कल्याण : आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वतःची काळजी घेणं विसरुनच जातो. रोज कामावर जायच्या घाईत असणारे लोक उशीर होऊ नये म्हणून कसेही धावत्या ट्रेनमध्ये चढताना दिसतात. तर संध्याकाळी घरी जातानासुद्धा ट्रेनमध्ये बसायला जागा मिळावी म्हणून पुन्हा जीवघेणा प्रवास सुरु होतो. पण असंच घाई करणं दोन प्रवाशांना चांगलंच महागात पडलं आहे. कल्याण स्थानकावर (Kalyan Station) धावती डेक्कन क्वीन एक्स्प्रेस (Deccan Express) पकडण्याच्या नादात दोघांचाही तोल गेल्याने एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीवर सध्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.


डेक्कन क्वीन एक्स्प्रेस खरं तर कल्याण स्थानकावर थांबत नाही. तिथे फक्त तिचा वेग थोडा कमी होतो. यामुळेच काही लोक प्लॅटफॉर्मला थांबून ती धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करतात. मात्र आज ही धावती ट्रेन पकडत असताना दोन ते तीन प्रवाशांचा पाय घसरला अशी इतर प्रवाशांची माहिती आहे.


ही घटना घडताच प्लॅटफॉर्मवर असलेल्या रेल्वे पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. मात्र, यात एकाचा मृत्यू झाला. दरम्यान, जखमीला रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. ही घटना स्थानकात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

राज्यात १५ ऑक्टोबरपासून वादळी पावसाचा अंदाज

मुंबईत पावसाची शक्यता कमी ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होताच नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रातून निरोप घेईल, असा

राज्यातील सरकारी शाळेत मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण

गणित आणि विज्ञान विषयातील प्रत्येक विद्यार्थ्याचे पायाभूत ज्ञान दृढ करण्यावर शासनाने भर दिला आहे. या उद्देशाने

भाजपाचे विकासाचे, याउलट काँग्रेसचे विनाशाचे राजकारण - बावनकुळे

नागपूर : भाजप कार्यकर्त्यांनी नेहमीच जनसेवकाच्या भूमिकेतून विकासाचे राजकारण केले आहे. काँग्रेसने

मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे पर्यटक तरुणी ४० फूट खोल दरीत कोसळली

राजगड : राजगडावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर अचानक मधमाश्यांनी हल्ला केला. त्यामुळे पर्यटकांची पळापळ झाली.

जमीन मोजणी आता होणार केवळ ३० दिवसांत !

सरकारने अधिसूचना जारी केल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील जमीन

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू; पहा आपल्या तालुक्यातील शेतक-यांना काय मिळालं?

२५१ तालुके पूर्णतः तर ३१ तालुके अंशतः आपत्तीग्रस्त म्हणून घोषित शेती, घरे, जनावरे, मत्स्यव्यवसाय, पायाभूत सुविधा