Fire: मुंबईत गोरेगावमध्ये पाच मजली इमारतीला भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

मुंबई: मुंबईच्या गोरेगाव(goregaon)परिसरातून मोठी बातमी समोर येत आहे. येथे पाच मजली इमारतीच्या पार्किंगमध्ये गुरूवारी रात्री भयानक आग(fire brokeout) लागली. या भीषण आगीत ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर १४ जण जखमी आहेत. ३० जणांना सुखरूप वाचवण्यात यश मिळाले आहेत.


ही इमारत ग्राऊंड प्लस पाच मजल्यांची होती. इमारतीच्या पार्किंगमध्ये ही आग लागली. यात पार्किंगमधील गाड्या तसेच काही दुकाने जळून खाक झाल्या आहेत.



अग्निशमन दल घटनास्थळी दाखल


आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १०हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग कोणत्या कारणामुळे लागली याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. सध्या येथे कूलिंगचे काम सुरू आहे. स्थानिक पोलीस तसेच अग्निशमन विभागाकडून येथे आग कशी लागली याचा तपास केला जात आहे.


 


कपड्यांनी वाढवली आग


प्राथमिक अनुमानानुसार ही आग इमारतीच्या पार्किंगमध्ये लागली होती. तेथे जुने कपडे असल्याने आगीचा भडका उडाला. पाहता पाहता आग संपूर्ण पार्किंगसह दुसऱ्या मजल्यावर पोहोचली.


Comments
Add Comment

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात

गोरेगाव संतोषनगरमध्ये दोन गटात हाणामारी,महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर चालवला गेला 'बुलडोझर'

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी घडलेल्या हिंदू आणि मुस्लिम गटांतील हाणामारीच्या घटनेनंतर

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि