Fire: मुंबईत गोरेगावमध्ये पाच मजली इमारतीला भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

मुंबई: मुंबईच्या गोरेगाव(goregaon)परिसरातून मोठी बातमी समोर येत आहे. येथे पाच मजली इमारतीच्या पार्किंगमध्ये गुरूवारी रात्री भयानक आग(fire brokeout) लागली. या भीषण आगीत ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर १४ जण जखमी आहेत. ३० जणांना सुखरूप वाचवण्यात यश मिळाले आहेत.


ही इमारत ग्राऊंड प्लस पाच मजल्यांची होती. इमारतीच्या पार्किंगमध्ये ही आग लागली. यात पार्किंगमधील गाड्या तसेच काही दुकाने जळून खाक झाल्या आहेत.



अग्निशमन दल घटनास्थळी दाखल


आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १०हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग कोणत्या कारणामुळे लागली याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. सध्या येथे कूलिंगचे काम सुरू आहे. स्थानिक पोलीस तसेच अग्निशमन विभागाकडून येथे आग कशी लागली याचा तपास केला जात आहे.


 


कपड्यांनी वाढवली आग


प्राथमिक अनुमानानुसार ही आग इमारतीच्या पार्किंगमध्ये लागली होती. तेथे जुने कपडे असल्याने आगीचा भडका उडाला. पाहता पाहता आग संपूर्ण पार्किंगसह दुसऱ्या मजल्यावर पोहोचली.


Comments
Add Comment

माजी लोकसभाध्यक्षांना 'ब्रह्मभूषण' पुरस्कार जाहीर

मुंबई : माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना 'ब्रह्मभूषण’ २०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा

महापरिनिर्वाण दिनी नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; सत्ताधाऱ्यांची सकारात्मक प्रतिक्रिया

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा

नियोजित कामं सुरळीत पार पडली तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु- मुख्यमंत्री

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित

गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

आतापर्यंत २२ टक्के काम पू्र्ण मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य

Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले - राज्यपाल आचार्य देवव्रत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था -- मुख्यमंत्री