Fire: मुंबईत गोरेगावमध्ये पाच मजली इमारतीला भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

  92

मुंबई: मुंबईच्या गोरेगाव(goregaon)परिसरातून मोठी बातमी समोर येत आहे. येथे पाच मजली इमारतीच्या पार्किंगमध्ये गुरूवारी रात्री भयानक आग(fire brokeout) लागली. या भीषण आगीत ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर १४ जण जखमी आहेत. ३० जणांना सुखरूप वाचवण्यात यश मिळाले आहेत.


ही इमारत ग्राऊंड प्लस पाच मजल्यांची होती. इमारतीच्या पार्किंगमध्ये ही आग लागली. यात पार्किंगमधील गाड्या तसेच काही दुकाने जळून खाक झाल्या आहेत.



अग्निशमन दल घटनास्थळी दाखल


आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १०हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग कोणत्या कारणामुळे लागली याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. सध्या येथे कूलिंगचे काम सुरू आहे. स्थानिक पोलीस तसेच अग्निशमन विभागाकडून येथे आग कशी लागली याचा तपास केला जात आहे.


 


कपड्यांनी वाढवली आग


प्राथमिक अनुमानानुसार ही आग इमारतीच्या पार्किंगमध्ये लागली होती. तेथे जुने कपडे असल्याने आगीचा भडका उडाला. पाहता पाहता आग संपूर्ण पार्किंगसह दुसऱ्या मजल्यावर पोहोचली.


Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.