Sikkim Flood: सिक्कीम जलप्रलयात १९ जणांचा मृत्यू, ३ हजाराहून अधिक पर्यटक अडकले

गंगटोक: सिक्कीमधील(sikkim) ल्होनक तलावावर ढगफुटी झाल्याने तीस्ता नदीला आलेल्या पुरामुळे तब्बल १९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १०३ जण बेपत्ता आहेत. अधिकाऱ्यांनी गुरूवारी ही माहिती दिली. लष्कर आणि एनडीआरएफची टीम तीस्ता नदीच्या जलग्रहण क्षेत्रात तसे उत्तर बंगालच्या खालच्या भागात दुसऱ्या दिवशीही बेपत्ता लोकांचा शोध घेत आहे.


सिक्कीमचे मुख्य सचिव व्ही बी पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर सिक्कीममध्ये ल्होनक तलावावरील ढगफुटीनंतर बुधवारी अचानक आलेल्या पुरामध्ये आतापर्यंत १९ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. २२ जवानांसह १०३ जण बेपत्ता आहेत.



१८ मृतदेहांची ओळख पटली


शेराजील राज्य पश्चिम बंगाल सरकारने आपल्या विधानात म्हटले की १८ मृतदेहांपैकी चार जण लष्कराचे जवान होते. दरम्यान, हे स्पष्ट नाही की त्या बेपत्ता २२ जवानांमध्येच यांचा समावेश होता. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जखमी झालेल्या २६ लोकांना सिक्कीमधील विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.



३ हजाराहून अधिक पर्यटक अडकले


पाठक यांच्या माहितीनुसार उत्तर सिक्कीमधील लाचेन, लाचुंग आणि आसपासच्या क्षेत्रात अडकलेले पर्यटक सुरक्षित आहेत. परदेशी नागरिकांसह ३ हजाराहून अधिक पर्यटक सिक्कीमच्या विविध भागांमध्ये अडकले आहेत.

Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू