Sikkim Flood: सिक्कीम जलप्रलयात १९ जणांचा मृत्यू, ३ हजाराहून अधिक पर्यटक अडकले

गंगटोक: सिक्कीमधील(sikkim) ल्होनक तलावावर ढगफुटी झाल्याने तीस्ता नदीला आलेल्या पुरामुळे तब्बल १९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १०३ जण बेपत्ता आहेत. अधिकाऱ्यांनी गुरूवारी ही माहिती दिली. लष्कर आणि एनडीआरएफची टीम तीस्ता नदीच्या जलग्रहण क्षेत्रात तसे उत्तर बंगालच्या खालच्या भागात दुसऱ्या दिवशीही बेपत्ता लोकांचा शोध घेत आहे.


सिक्कीमचे मुख्य सचिव व्ही बी पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर सिक्कीममध्ये ल्होनक तलावावरील ढगफुटीनंतर बुधवारी अचानक आलेल्या पुरामध्ये आतापर्यंत १९ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. २२ जवानांसह १०३ जण बेपत्ता आहेत.



१८ मृतदेहांची ओळख पटली


शेराजील राज्य पश्चिम बंगाल सरकारने आपल्या विधानात म्हटले की १८ मृतदेहांपैकी चार जण लष्कराचे जवान होते. दरम्यान, हे स्पष्ट नाही की त्या बेपत्ता २२ जवानांमध्येच यांचा समावेश होता. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जखमी झालेल्या २६ लोकांना सिक्कीमधील विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.



३ हजाराहून अधिक पर्यटक अडकले


पाठक यांच्या माहितीनुसार उत्तर सिक्कीमधील लाचेन, लाचुंग आणि आसपासच्या क्षेत्रात अडकलेले पर्यटक सुरक्षित आहेत. परदेशी नागरिकांसह ३ हजाराहून अधिक पर्यटक सिक्कीमच्या विविध भागांमध्ये अडकले आहेत.

Comments
Add Comment

रेल्वेचा नवीन नियम लागू; आता खिडकीवर तिकीट खरेदी करताना सुद्धा लागणार 'ओटीपी'

मुंबई: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंगच्या

धक्कादायक! सौंदर्याच्या ईर्ष्येतून तरुणीने केली चार लहानग्यांची हत्या, विकृत मानसिकतेमुळे पोटच्या मुलीचाही केला नाही विचार

पानीपत: हरियाणातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.या प्रकरणात एका महिलेने केलेली कृती ऐकताच जगात किती

छत्तीसगडच्या बस्तर भागात जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक! १५ नक्षलवादी ठार तर ३ जवान शहीद

छत्तीसगड: छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तर विभागातील बीजापूर-दंतेवाडा सीमेवर भारतीय सुरक्षा दल आणि

Barmati Couple Car Accident Tirupati : तिरुपती दर्शनाहून परतणाऱ्यांवर दु:खाचा डोंगर! बारामतीमधील दांपत्याच्या कारला ट्रक धडकला अन्...

बारामती : गेल्या काही दिवसांत देवदर्शनासाठी निघालेल्या किंवा परतणाऱ्या भाविकांच्या अपघाताच्या दुर्दैवी घटना

महाराष्ट्राचे सुपुत्र वेदमूर्ती देवव्रत रेखेंना 'दण्डक्रम विक्रमादित्य' ही मानाच्या पदवी पात्र! पंतप्रधानांनी केले कौतुक

वाराणसी: अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र देवव्रत महेश रेखे यांनी २०० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडून काढला आहे. दोन

Woman Injured : पाणीपुरीमुळे जबडा अडकला अन् थेट निखळला; डॉक्टरांनाही करावी लागली शस्त्रक्रिया, 'ही' बातमी वाचून तुम्हीही थबकाल!

दिबियापूर : पाणीपुरी हे सर्वांचेच आवडते खाद्य आहे, विशेषतः महिलांसाठी तो एक 'विक पॉईंट' असतो. पाणीपुरीच्या गाडीवर