Sikkim Flood: सिक्कीम जलप्रलयात १९ जणांचा मृत्यू, ३ हजाराहून अधिक पर्यटक अडकले

गंगटोक: सिक्कीमधील(sikkim) ल्होनक तलावावर ढगफुटी झाल्याने तीस्ता नदीला आलेल्या पुरामुळे तब्बल १९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १०३ जण बेपत्ता आहेत. अधिकाऱ्यांनी गुरूवारी ही माहिती दिली. लष्कर आणि एनडीआरएफची टीम तीस्ता नदीच्या जलग्रहण क्षेत्रात तसे उत्तर बंगालच्या खालच्या भागात दुसऱ्या दिवशीही बेपत्ता लोकांचा शोध घेत आहे.


सिक्कीमचे मुख्य सचिव व्ही बी पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर सिक्कीममध्ये ल्होनक तलावावरील ढगफुटीनंतर बुधवारी अचानक आलेल्या पुरामध्ये आतापर्यंत १९ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. २२ जवानांसह १०३ जण बेपत्ता आहेत.



१८ मृतदेहांची ओळख पटली


शेराजील राज्य पश्चिम बंगाल सरकारने आपल्या विधानात म्हटले की १८ मृतदेहांपैकी चार जण लष्कराचे जवान होते. दरम्यान, हे स्पष्ट नाही की त्या बेपत्ता २२ जवानांमध्येच यांचा समावेश होता. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जखमी झालेल्या २६ लोकांना सिक्कीमधील विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.



३ हजाराहून अधिक पर्यटक अडकले


पाठक यांच्या माहितीनुसार उत्तर सिक्कीमधील लाचेन, लाचुंग आणि आसपासच्या क्षेत्रात अडकलेले पर्यटक सुरक्षित आहेत. परदेशी नागरिकांसह ३ हजाराहून अधिक पर्यटक सिक्कीमच्या विविध भागांमध्ये अडकले आहेत.

Comments
Add Comment

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर

राष्ट्रपतींनी हेलिकॉप्टर 'प्रचंड'मधून केले उड्डाण

जैसलमेर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजस्थानमधील जैसलमेर येथून स्वदेशी विकसित लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर

WhatsApp लॉगिन फेल, मेसेज मिळेनात! मेसेजिंग अॅपमध्ये तांत्रिक बिघाडामुळे कामं ठप्प

WhatsApp वेब वापरकर्त्यांना त्यांच्या खात्यात लॉग-इन करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. Downdetector या संकेतस्थळावर या

Yogi Adityanath : सिंगापूर - जापान दौऱ्यात योगी आदित्यनाथ यांनी केले ₹९०,००० कोटींचे सामंजस्य करार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सिंगापूर आणि जपानचा चार दिवसांचा दौरा पूर्ण केला. दोन्ही

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान

फ्लाइट तिकीट रद्द करण्यावर आता शुल्क लागणार नाही; डीजीसीएने केला रिफंड नियमांमध्ये मोठा बदल

नवी दिल्ली :  विमान प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आता विमान प्रवाशांना प्रवासी बुकिंगच्या ४८ तासांच्या