Sikkim Floods : सिक्कीममध्ये निसर्गाचा प्रकोप, २२ जवानांसह ७० जण बेपत्ता

iगंगटोक: सिक्कीमसाठी(sikkim) पुढील २४ तास धोक्याचे आहेत. हवामान विभागाने येथे दोन दिवसांसाठी मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे. इतकंच नव्हे तर बिहार, बंगाल, मेघालय, आसाम आणि झारखंडमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.


सिक्कीमध्ये बुधवारी जो प्रकोप पाहायला मिळाला त्यात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही लष्कराच्या २२ जवानांसह तब्बल ७० लोक बेपत्ता आहे. या बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे. ढगफुटी झाल्याने सिक्कीममध्ये पूर आला.



सिक्कीमध्ये निसर्गाचा कहर


रात्रीच्या अंधारात ढगफुटी झाली आणि सकाळच्या उजेडात सगळीकडे निसर्गाने केलेल्या प्रकोपाच्या खुणा दिसत होत्या. सैलाबच्या समोर जे आले ते वाहू लागले. जिकडे बघाल तिकडे पाणीच पाणी. मिळालेल्या माहितीनुासर ल्होनक तलावावर रात्रीच्या सुमारास ढगफुटी झाली. यानंत लाचेन खोऱ्यातील तीस्ता नदीच्या पातळीत अचानक वाढ झाली. नदीच्या पाण्याची पातळी अचानक १५ ते २० फुटांनी वाढली. यानंतर नदीच्या जवळपास परिसरात पाणी भरू लागले. अनेक घरांमध्ये पाणी भरले.


या नदीलगत लष्कराचा तळही होता. नदीला आलेल्या पुराचा फटका या तळाला बसला. येथील २२ जवान बेपत्ता झाले आहेत. १७ सप्टेंबर आणि २८ सप्टेंबरला घेतल्या गेलेल्या फोटोमध्ये ल्होनक तलावाचे क्षेत्रफळ १६२.७ आणि १६७.४ हेक्टर दिसते. तर या पुरानंतर घेतलेल्या फोटोत दिसत आहे की तलावाचे क्षेत्रफळ अर्ध्यापेक्षा कमी झाले आहे. आता यातील ६०.३ हेक्टर भागात पाणी दिसत आहे. म्हणजेच ल्होनक तलावातील १०५ हेक्टर क्षेत्रातील पाणी वाहून गेले आणि हे पाणी वेगाने सिक्कीच्या खालच्या भागात गेले. यामुळे येथे भयंकर पूर आला आहे.

Comments
Add Comment

Rahul Gandhi : "मतदान वेळी आक्षेप घेतला नाही आणि आता २५ लाख बोगस मतदारांचा आरोप!" राहुल गांधींच्या आरोपांवर आयोगाचं थेट आव्हान!

मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी महाराष्ट्राप्रमाणेच (Maharashtra) हरियाणा विधानसभा निवडणुकीतही (Haryana Assembly

‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या मारवाडी मानसिकता थांबवू शकते’

आयसीएआर-सेंट्रल अॅरिड झोन रिसर्चचे संचालक डॉ. तंवर यांचे भाष्य जोधपूर : ऐतिहासिकदृष्ट्या राजस्थान आणि

‘वंदे भारत’साठी जोधपूरमध्ये पहिला देखभाल डेपो

मेंटेनन्सचा विषय निकाली; दिल्ली, मुंबई, बंगळूरुमध्येही होणार उभारणी जोधपूर  : जलद गतीने धावणारी वंदे भारत

सिग्नल ओव्हरशूट! छत्तीसगडमध्ये झालेल्या रेल्वेच्या भीषण अपघाताचे कारण आले समोर

छत्तीसगड: छत्तीसगडमधील बिलासपूर येथे काल (४ नोव्हेंबर) सायंकाळी मेमू ट्रेनचा आणि मालगाडीचा भीषण अपघात झाला. हा

बिहारमध्ये कमळ फुलणार!

ओपनियन पोलच्या अंदाजानुसार एनडीएचे बिहारमध्ये सरकार नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा ६

मतदार यादी पुनरिक्षणविरोधात 'इंडिया'ची देशव्यापी आंदोलनाची योजना

नवी दिल्ली : 'इंडिया' आघाडीने निवडणूक आयोगाच्या मतदार यादीतील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर)