Sikkim Floods : सिक्कीममध्ये निसर्गाचा प्रकोप, २२ जवानांसह ७० जण बेपत्ता

iगंगटोक: सिक्कीमसाठी(sikkim) पुढील २४ तास धोक्याचे आहेत. हवामान विभागाने येथे दोन दिवसांसाठी मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे. इतकंच नव्हे तर बिहार, बंगाल, मेघालय, आसाम आणि झारखंडमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.


सिक्कीमध्ये बुधवारी जो प्रकोप पाहायला मिळाला त्यात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही लष्कराच्या २२ जवानांसह तब्बल ७० लोक बेपत्ता आहे. या बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे. ढगफुटी झाल्याने सिक्कीममध्ये पूर आला.



सिक्कीमध्ये निसर्गाचा कहर


रात्रीच्या अंधारात ढगफुटी झाली आणि सकाळच्या उजेडात सगळीकडे निसर्गाने केलेल्या प्रकोपाच्या खुणा दिसत होत्या. सैलाबच्या समोर जे आले ते वाहू लागले. जिकडे बघाल तिकडे पाणीच पाणी. मिळालेल्या माहितीनुासर ल्होनक तलावावर रात्रीच्या सुमारास ढगफुटी झाली. यानंत लाचेन खोऱ्यातील तीस्ता नदीच्या पातळीत अचानक वाढ झाली. नदीच्या पाण्याची पातळी अचानक १५ ते २० फुटांनी वाढली. यानंतर नदीच्या जवळपास परिसरात पाणी भरू लागले. अनेक घरांमध्ये पाणी भरले.


या नदीलगत लष्कराचा तळही होता. नदीला आलेल्या पुराचा फटका या तळाला बसला. येथील २२ जवान बेपत्ता झाले आहेत. १७ सप्टेंबर आणि २८ सप्टेंबरला घेतल्या गेलेल्या फोटोमध्ये ल्होनक तलावाचे क्षेत्रफळ १६२.७ आणि १६७.४ हेक्टर दिसते. तर या पुरानंतर घेतलेल्या फोटोत दिसत आहे की तलावाचे क्षेत्रफळ अर्ध्यापेक्षा कमी झाले आहे. आता यातील ६०.३ हेक्टर भागात पाणी दिसत आहे. म्हणजेच ल्होनक तलावातील १०५ हेक्टर क्षेत्रातील पाणी वाहून गेले आणि हे पाणी वेगाने सिक्कीच्या खालच्या भागात गेले. यामुळे येथे भयंकर पूर आला आहे.

Comments
Add Comment

Bihar Election 2025 : बुरखा परिधान केलेल्या महिलांना मतदान करता येणार का ?

बिहार : बिहारमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन मतदानाच्या तारखा

केरळच्या सुप्रसिद्ध मंदिरात सोन्याची चोरी, SIT चौकशीचा न्यायालयाचा आदेश

तिरुवनंतपुरम : सबरीमाला मंदिर पर्यटनाच्या दृष्टीने केरळसाठी फार महत्त्वाचे आहे. सोन्याचा गाभारा आणि इतर

ट्रॅफिक का थांबले? पहा आणि कमेंट करुन सांगा... ब्रिजवरून ट्रेन गेली, आणि खालील रस्त्यावरचा 'तो' क्षण; व्हिडिओ व्हायरल

मुंबई: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, जे कधी आश्चर्यचकित करतात, तर कधी हसून पोट दुखवतात. असाच

बिहारमध्ये निवडणुकीचे बिगूल वाजले; मतदानाच्या तारखा जाहीर, कधी लागणार निकाल?

बिहारच्या निवडणुका दोन टप्प्यात, ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान, तर १४ नोव्हेंबर रोजी निकाल ७.४२ कोटी मतदार करणार

सर्वोच्च न्यायालयात घडली धक्कादायक घटना, वकिलाने केला सरन्यायाधीशांवर हल्ला

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक घटना घडली. एका वकिलाने सरन्यायाधीशांवर वस्तू फेकून हल्ला केला. या

बिहार विधानसभा निवडणुकील बिगुल आज वाजणार ?

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाची आज (सोमवार ६ ऑक्टोबर २०२५) संध्याकाळी चार वाजता दिल्लीत विज्ञान भवन येथे पत्रकार