Sikkim Floods : सिक्कीममध्ये निसर्गाचा प्रकोप, २२ जवानांसह ७० जण बेपत्ता

iगंगटोक: सिक्कीमसाठी(sikkim) पुढील २४ तास धोक्याचे आहेत. हवामान विभागाने येथे दोन दिवसांसाठी मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे. इतकंच नव्हे तर बिहार, बंगाल, मेघालय, आसाम आणि झारखंडमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.


सिक्कीमध्ये बुधवारी जो प्रकोप पाहायला मिळाला त्यात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही लष्कराच्या २२ जवानांसह तब्बल ७० लोक बेपत्ता आहे. या बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे. ढगफुटी झाल्याने सिक्कीममध्ये पूर आला.



सिक्कीमध्ये निसर्गाचा कहर


रात्रीच्या अंधारात ढगफुटी झाली आणि सकाळच्या उजेडात सगळीकडे निसर्गाने केलेल्या प्रकोपाच्या खुणा दिसत होत्या. सैलाबच्या समोर जे आले ते वाहू लागले. जिकडे बघाल तिकडे पाणीच पाणी. मिळालेल्या माहितीनुासर ल्होनक तलावावर रात्रीच्या सुमारास ढगफुटी झाली. यानंत लाचेन खोऱ्यातील तीस्ता नदीच्या पातळीत अचानक वाढ झाली. नदीच्या पाण्याची पातळी अचानक १५ ते २० फुटांनी वाढली. यानंतर नदीच्या जवळपास परिसरात पाणी भरू लागले. अनेक घरांमध्ये पाणी भरले.


या नदीलगत लष्कराचा तळही होता. नदीला आलेल्या पुराचा फटका या तळाला बसला. येथील २२ जवान बेपत्ता झाले आहेत. १७ सप्टेंबर आणि २८ सप्टेंबरला घेतल्या गेलेल्या फोटोमध्ये ल्होनक तलावाचे क्षेत्रफळ १६२.७ आणि १६७.४ हेक्टर दिसते. तर या पुरानंतर घेतलेल्या फोटोत दिसत आहे की तलावाचे क्षेत्रफळ अर्ध्यापेक्षा कमी झाले आहे. आता यातील ६०.३ हेक्टर भागात पाणी दिसत आहे. म्हणजेच ल्होनक तलावातील १०५ हेक्टर क्षेत्रातील पाणी वाहून गेले आणि हे पाणी वेगाने सिक्कीच्या खालच्या भागात गेले. यामुळे येथे भयंकर पूर आला आहे.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च