Sanjay Singh : AAP खासदार संजय सिंह यांना कोर्टाने पाठवले ED रिमांडवर

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे(AAP) राज्यसभा खासदार संजय सिंह(sanjay singh) यांना राऊज एव्हेन्यू कोर्टाने इडीच्या रिमांडवर गुरूवारी पाठवले. दिल्लीच्या दारू घोटाळा प्रकरणात ईडीने सुनावणीदरम्यान दहा दिवसांची रिमांड मागितली होती. मात्र पाच दिवसांची रिमांड देण्यात आली. अशातच सिंह आता १० ऑक्टोबरपर्यंत केंद्रीय एजन्सीच्या ताब्यात राहतील आणि त्यादरम्यान त्यांची चौकशी केली जाईल.


सिंहला ईडीने बुवारी त्यांच्या नॉर्थ एव्हेन्यूस्थित सरकारी निवासस्थानावरून अनेक तासांच्या छापेमारी आणि चौकशीनंतर अटक केली होती. ईडीचा आरोप आहे की काही डीलर्सना फायदा मिळवून देण्यासाठी लाच घेतली गेली होती.


प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आपचे नेते संजय सिंह यांनी कोर्टात सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक हरत आहेत. याच कारणामुळे हे लोक असे करत आहेत. तर सिंह यांची बाजू मांडणारे वकील मोहित माथुर म्हणाले, कोणत्या आधारावर अटक करण्यात आली ते सांगावे. आम्हाला रिमांड पेपर देण्यात यावे.


त्यानंतर ईडीने सांगितले की पेपर दिले जातील आणि यानंतर लगेचच रिमांड पेपर देण्यात आले.



ईडीने काय म्हटले?


ईडीच्या वकीलांना कोर्टात दावा केला की दोन वेगवेगळे ट्रान्झॅक्शन झाले आहे. यात एकूण २ कोटींची देवाणघेवाण झाली. अरोडा यांच्या विधानानुसार ही देण्याघेण्याची बाब फोनवर स्वीकारण्यात आली. केंद्रीय तपास एजन्सीने रिमांड पेपरमध्ये संजय सिंह यांच्या घरी पैशाची देवाणघेवाण केल्याचे म्हटले आहे. यात सांगितले की पहिल्यांदा १ कोटी आणि दुसऱ्यांदा १ कोटींचा व्यवहार संजय सिंह यांच्या घरी झाला.

Comments
Add Comment

गुप्तचर विभाग RAW चे माजी प्रमुख काय म्हणाले; युद्धात आपण इराणची साथ...

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट गडद होत चाललं आहे. इराण,

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया