Sanjay Singh : AAP खासदार संजय सिंह यांना कोर्टाने पाठवले ED रिमांडवर

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे(AAP) राज्यसभा खासदार संजय सिंह(sanjay singh) यांना राऊज एव्हेन्यू कोर्टाने इडीच्या रिमांडवर गुरूवारी पाठवले. दिल्लीच्या दारू घोटाळा प्रकरणात ईडीने सुनावणीदरम्यान दहा दिवसांची रिमांड मागितली होती. मात्र पाच दिवसांची रिमांड देण्यात आली. अशातच सिंह आता १० ऑक्टोबरपर्यंत केंद्रीय एजन्सीच्या ताब्यात राहतील आणि त्यादरम्यान त्यांची चौकशी केली जाईल.


सिंहला ईडीने बुवारी त्यांच्या नॉर्थ एव्हेन्यूस्थित सरकारी निवासस्थानावरून अनेक तासांच्या छापेमारी आणि चौकशीनंतर अटक केली होती. ईडीचा आरोप आहे की काही डीलर्सना फायदा मिळवून देण्यासाठी लाच घेतली गेली होती.


प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आपचे नेते संजय सिंह यांनी कोर्टात सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक हरत आहेत. याच कारणामुळे हे लोक असे करत आहेत. तर सिंह यांची बाजू मांडणारे वकील मोहित माथुर म्हणाले, कोणत्या आधारावर अटक करण्यात आली ते सांगावे. आम्हाला रिमांड पेपर देण्यात यावे.


त्यानंतर ईडीने सांगितले की पेपर दिले जातील आणि यानंतर लगेचच रिमांड पेपर देण्यात आले.



ईडीने काय म्हटले?


ईडीच्या वकीलांना कोर्टात दावा केला की दोन वेगवेगळे ट्रान्झॅक्शन झाले आहे. यात एकूण २ कोटींची देवाणघेवाण झाली. अरोडा यांच्या विधानानुसार ही देण्याघेण्याची बाब फोनवर स्वीकारण्यात आली. केंद्रीय तपास एजन्सीने रिमांड पेपरमध्ये संजय सिंह यांच्या घरी पैशाची देवाणघेवाण केल्याचे म्हटले आहे. यात सांगितले की पहिल्यांदा १ कोटी आणि दुसऱ्यांदा १ कोटींचा व्यवहार संजय सिंह यांच्या घरी झाला.

Comments
Add Comment

स्मशानभूमीत जळत्या चितेशेजारी मुलांचा अभ्यास

अनोख्या शाळेची देशभरात चर्चा बिहार : सर्वसाधारणपणे शाळा म्हटलं की वर्ग येतात, कॅन्टीन असतं, मुलांना खेळायला

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याकडून भाजप, आरएसएसचे कौतुक!

जुना फोटो शेअर करत म्हणाले, ‘हीच संघटनेची शक्ती…’ नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार

देशात मल्टी-डोअर न्यायालये असावीत, विवादांची सुनावणी नको, ते सोडवावेत

गोव्यात 'मध्यस्थी' विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न पणजी : मध्यस्थता कायद्याच्या दुर्बळतेचे लक्षण नाही, तर तो

रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात बदल; आधार लिंक अनिवार्य

सणासुदीच्या काळात दलालांच्या गैरप्रकारांना आळा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची कन्फर्म तिकिटे मिळवणे म्हणजे जणू

गिग वर्करचा बुधवारी देशव्यापी संप

ऑनलाइन डिलिव्हरी सेवांवर परिणाम होण्याची शक्यता नवी दिल्ली : नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी केलेल्या

नीट-जेईईत फसवणुकीला आळा बसणार

२०२६ पासून ‘चेहरेपट्टीची ओळख’ बंधनकारक नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक महत्त्वाच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश