Sanjay Singh : AAP खासदार संजय सिंह यांना कोर्टाने पाठवले ED रिमांडवर

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे(AAP) राज्यसभा खासदार संजय सिंह(sanjay singh) यांना राऊज एव्हेन्यू कोर्टाने इडीच्या रिमांडवर गुरूवारी पाठवले. दिल्लीच्या दारू घोटाळा प्रकरणात ईडीने सुनावणीदरम्यान दहा दिवसांची रिमांड मागितली होती. मात्र पाच दिवसांची रिमांड देण्यात आली. अशातच सिंह आता १० ऑक्टोबरपर्यंत केंद्रीय एजन्सीच्या ताब्यात राहतील आणि त्यादरम्यान त्यांची चौकशी केली जाईल.


सिंहला ईडीने बुवारी त्यांच्या नॉर्थ एव्हेन्यूस्थित सरकारी निवासस्थानावरून अनेक तासांच्या छापेमारी आणि चौकशीनंतर अटक केली होती. ईडीचा आरोप आहे की काही डीलर्सना फायदा मिळवून देण्यासाठी लाच घेतली गेली होती.


प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आपचे नेते संजय सिंह यांनी कोर्टात सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक हरत आहेत. याच कारणामुळे हे लोक असे करत आहेत. तर सिंह यांची बाजू मांडणारे वकील मोहित माथुर म्हणाले, कोणत्या आधारावर अटक करण्यात आली ते सांगावे. आम्हाला रिमांड पेपर देण्यात यावे.


त्यानंतर ईडीने सांगितले की पेपर दिले जातील आणि यानंतर लगेचच रिमांड पेपर देण्यात आले.



ईडीने काय म्हटले?


ईडीच्या वकीलांना कोर्टात दावा केला की दोन वेगवेगळे ट्रान्झॅक्शन झाले आहे. यात एकूण २ कोटींची देवाणघेवाण झाली. अरोडा यांच्या विधानानुसार ही देण्याघेण्याची बाब फोनवर स्वीकारण्यात आली. केंद्रीय तपास एजन्सीने रिमांड पेपरमध्ये संजय सिंह यांच्या घरी पैशाची देवाणघेवाण केल्याचे म्हटले आहे. यात सांगितले की पहिल्यांदा १ कोटी आणि दुसऱ्यांदा १ कोटींचा व्यवहार संजय सिंह यांच्या घरी झाला.

Comments
Add Comment

फॉलोअर्सच्या शर्यतीत मुलांचं बालपण धोक्यात, सुधा मूर्तींची सरकारकडे महत्त्वाची मागणी

नवी दिल्ली : इंटरनेटवर आज असंख्य रील्स आणि व्हिडिओ पाहायला मिळतात ज्यात लहान मुलांचा थेट कंटेंट म्हणून वापर केला

उड्डाणं रद्द, तिकीटदर वाढले; हवाई प्रवासातील गोंधळावर सरकारची मोठी कारवाई

नवी दिल्ली : इंडिगोच्या तांत्रिक आणि व्यवस्थापकीय अडचणींमुळे मागील काही दिवसांपासून देशात मोठे विमान प्रवास

प्रवाशांना विमान रद्दीकरणाची पूर्ण परतफेड मिळणार! इंडिगोचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमान कंपनीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चेक-इन प्रणालीत

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३