Sanjay Singh : AAP खासदार संजय सिंह यांना कोर्टाने पाठवले ED रिमांडवर

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे(AAP) राज्यसभा खासदार संजय सिंह(sanjay singh) यांना राऊज एव्हेन्यू कोर्टाने इडीच्या रिमांडवर गुरूवारी पाठवले. दिल्लीच्या दारू घोटाळा प्रकरणात ईडीने सुनावणीदरम्यान दहा दिवसांची रिमांड मागितली होती. मात्र पाच दिवसांची रिमांड देण्यात आली. अशातच सिंह आता १० ऑक्टोबरपर्यंत केंद्रीय एजन्सीच्या ताब्यात राहतील आणि त्यादरम्यान त्यांची चौकशी केली जाईल.


सिंहला ईडीने बुवारी त्यांच्या नॉर्थ एव्हेन्यूस्थित सरकारी निवासस्थानावरून अनेक तासांच्या छापेमारी आणि चौकशीनंतर अटक केली होती. ईडीचा आरोप आहे की काही डीलर्सना फायदा मिळवून देण्यासाठी लाच घेतली गेली होती.


प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आपचे नेते संजय सिंह यांनी कोर्टात सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक हरत आहेत. याच कारणामुळे हे लोक असे करत आहेत. तर सिंह यांची बाजू मांडणारे वकील मोहित माथुर म्हणाले, कोणत्या आधारावर अटक करण्यात आली ते सांगावे. आम्हाला रिमांड पेपर देण्यात यावे.


त्यानंतर ईडीने सांगितले की पेपर दिले जातील आणि यानंतर लगेचच रिमांड पेपर देण्यात आले.



ईडीने काय म्हटले?


ईडीच्या वकीलांना कोर्टात दावा केला की दोन वेगवेगळे ट्रान्झॅक्शन झाले आहे. यात एकूण २ कोटींची देवाणघेवाण झाली. अरोडा यांच्या विधानानुसार ही देण्याघेण्याची बाब फोनवर स्वीकारण्यात आली. केंद्रीय तपास एजन्सीने रिमांड पेपरमध्ये संजय सिंह यांच्या घरी पैशाची देवाणघेवाण केल्याचे म्हटले आहे. यात सांगितले की पहिल्यांदा १ कोटी आणि दुसऱ्यांदा १ कोटींचा व्यवहार संजय सिंह यांच्या घरी झाला.

Comments
Add Comment

नोव्हेंबरपासून देशात सुरू होणार नवे नियम, जाणून घ्या सविस्तर!

नवी दिल्ली: ऑक्टोबर महिना काहीच दिवसात संपणार असून येणाऱ्या नवीन महिन्यापासून देशभरात आधारकार्डपासून

१ नोव्हेंबरपासून जीएसटी नोंदणी आणखी सोपी होणार

नवी दिल्ली :  केंद्र सरकारने १ नोव्हेंबरपासून वस्तू आणि सेवा कर नोंदणी आणखी सोपी करण्यासाठी नवी प्रणाली सुरू

जयंत नारळीकर यांना मरणोत्तर ‘विज्ञान रत्न’

नवी दिल्ली : विज्ञान, तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाधारित नवोन्मेषाच्या विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट आणि

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी