World Cup 2023: सगळं काही विसरा, वर्ल्डकपवर लक्ष द्या...

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा(Indian cricket team) कर्णधार रोहित शर्माने(rohit sharma) आयसीसी क्रिकेट विश्वचषकाआधी मोठे विधान केले आहे. कॅप्टन डेच्या निमित्ताने रोहितने सांगितले की आता ही वेळ आपले लक्ष्य केंद्रित करण्याची आहे. टीम इंडियासमोर सगळ्यात मोठे आव्हान हे आपल्या घरातच वर्ल्डकप जिंकणे हे आहे.


भारतीय संघाने दोन वेळा विश्वचषक जिंकला आहे. भारतीय संघाच्या नजरा तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्यावर असतील. आयसीसीच्या १३व्या वनडे वर्ल्डकपचे आयोजन ५ ऑक्टोबरपासून होत आहे. स्पर्धेत १० संघ भाग घेणार आहेत. ४६ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत ४८ सामने खेळवले जातील.


भारताने २०११मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात वनडे वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर २०१५मध्ये ऑस्ट्रेलिया आणि २०१९मध्ये इंग्लंडने आपल्या धरतीवर खिताब जिंकला होता. आता भारतीय संघ आपल्या मायभूमीत खिताब जिंकण्यासाठी प्रयत्न करेल. रोहित शर्माचा हा शेवटचा वनडे वर्ल्डकप असू शकतो.



सर्वकाही विसरून लक्ष केंद्रित करण्याची गरज


रोहितने आयसीसीकडून अहमदाबाद येथे आयोजित कॅप्टन डेच्या निमित्ताने सांगितले, मला माहीत आहे की काय पणाला लागले आहे. जे खेळाडू संघाचा भाग आहेत त्यांनाही ही माहिती आहे की काय पणाला लागले आहे ते. आमच्यासाठी आता सर्व काही विसरून आपल्या लक्ष्यावर ध्यान केंद्रित करण्याची गरज आहे. रोहितच्या मते संघाने एकावेळेस एका सामन्यावर लक्ष केंद्रित करावे कारण वर्ल्डकपची स्पर्धा ही लांबलचक आहे.



मोठ्या अवधीत चालणारी स्पर्धा


रोहित पुढे म्हणाला, गेल्या तीन विश्वचषकात यजमान देशाने खिताब जिंकला आहे. मोठ्या कालावधीत चालणारी ही स्पर्धा आहे. त्यामुळे एकदम पुढचा विचार करून चालणार नाही. आमच्यासाठी हे महत्त्वाचे आहे की आम्ही प्रयत्न करावा आणि आपल्या लक्ष्यावर ध्यान केंद्रित करावे.

Comments
Add Comment

BCCI कडून विश्वविजेत्या टीम इंडियाला १३१ कोटींचं बक्षिस , परंतु प्रत्यक्षात एवढे पैसे मिळणार

मुंबई: टी२० विश्वचषक २०२६ मधील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर बीसीसीआयकडून बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला

T20 World Cup 2026 : आयसीसी 'टीम ऑफ द टूर्नामेंट'मध्ये चार भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश

आयसीसीने टी-२० साठी सर्वोत्तम संघ निवडला असून या संघात चार भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. संजू

आयसीसी आणि बीसीसीआय कडून खेळाडूंसाठी बक्षिसांचा पेटारा अखेर खुलला

अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियम येथे रंगलेल्या ICC Men's T20 World Cup च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर दणदणीत विजय

Sri Lanka Cricket Team : विश्वचषकासाठी श्रीलंकेची जोरदार तयारी; प्रशिक्षकपदी केली 'या' महान खेळाडूची नियुक्ती

श्रीलंका क्रिकेटने दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांना नवीन मुख्य प्रशिक्षक

Indian Cricket Team : जागतिक क्रिकेटमध्ये भारताचाच दबदबा, दोन वर्षात सात ट्रॉफींवर कब्जा

गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेट संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. ज्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे

विश्वविजेत्या भारतीय संघाच्या अभिनंदनाचा ठराव विधिमंडळात

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि बुमराहच्या कामगिरीचे केले कौतुक मुंबई : भारतीय