'मेरी मिट्टी मेरा देश' अंतगत नेहरोली येथे कलश संकलन सोहळा संपन्न

वाडा(वार्ताहर)- पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) यांच्या संकल्पनेतून आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत मेरी मिट्टी मेरा(meri mitti mera desh) देश उपक्रम देशभर राबवला जात असून त्या अनुषंगाने वाडा तालुक्यातील प्रत्येक गावातील माती कलशामध्ये भरून नेहरोली येथे संकलित करण्याचा भव्य सोहळा मंगळवारी पार पडला.


नेहरोली नाक्या पासून नेहरोली जिल्हा परिषद शाळेपर्यंत अमृत कलशाची मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर नाचत मान्यवर पाहुण्यांचे स्वागत केले.शारदा विद्यालयातील शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यांवर लेझीम नाच करत पाहुण्यांचे मनोरंजन केले.वाडा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ यांच्या सूचनेनुसार पार पडला.


आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत मेरी मिट्टी मेरा देश अभियान राबविणे,तालुका पंचायत समिती स्तरावरील माती कलशाचे संकलन जिल्हा परिषद शाळा नेहरोली येथे करणे आणि अमृतवाटीका तयार करण्यासाठी वाडा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


हा माती कलश संकलन करण्यासाठी वाडा पंचायत समिती सभापती अस्मिता लहांगे, जिल्हा परिषद सदस्य भक्ती वलटे, पंचायत समिती सदस्य, माजी उपसभापती अमोल पाटील, माजी सभापकल रघुनाथ माळी, गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ, सामाजिक कार्यकर्त्या मंदाताई कांबळे यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत अमृतकलश संकलन सोहळ्या प्रसंगी सरपंच संजना गिंभल, उपसरपंच प्रथमेश भाई ठाकरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे

Governor Jishnu Dev Verma : विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी

Dhule Accident : परतीचा प्रवास अर्ध्यावरच ! नाशिकच्या कुटुंबाचा धुळ्यात भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू , ५ गंभीर

Dhule Mumbai Agra Highway accident : नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे