'मेरी मिट्टी मेरा देश' अंतगत नेहरोली येथे कलश संकलन सोहळा संपन्न

  280

वाडा(वार्ताहर)- पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) यांच्या संकल्पनेतून आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत मेरी मिट्टी मेरा(meri mitti mera desh) देश उपक्रम देशभर राबवला जात असून त्या अनुषंगाने वाडा तालुक्यातील प्रत्येक गावातील माती कलशामध्ये भरून नेहरोली येथे संकलित करण्याचा भव्य सोहळा मंगळवारी पार पडला.


नेहरोली नाक्या पासून नेहरोली जिल्हा परिषद शाळेपर्यंत अमृत कलशाची मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर नाचत मान्यवर पाहुण्यांचे स्वागत केले.शारदा विद्यालयातील शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यांवर लेझीम नाच करत पाहुण्यांचे मनोरंजन केले.वाडा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ यांच्या सूचनेनुसार पार पडला.


आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत मेरी मिट्टी मेरा देश अभियान राबविणे,तालुका पंचायत समिती स्तरावरील माती कलशाचे संकलन जिल्हा परिषद शाळा नेहरोली येथे करणे आणि अमृतवाटीका तयार करण्यासाठी वाडा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


हा माती कलश संकलन करण्यासाठी वाडा पंचायत समिती सभापती अस्मिता लहांगे, जिल्हा परिषद सदस्य भक्ती वलटे, पंचायत समिती सदस्य, माजी उपसभापती अमोल पाटील, माजी सभापकल रघुनाथ माळी, गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ, सामाजिक कार्यकर्त्या मंदाताई कांबळे यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत अमृतकलश संकलन सोहळ्या प्रसंगी सरपंच संजना गिंभल, उपसरपंच प्रथमेश भाई ठाकरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

Comments
Add Comment

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर १६ जुलैला होणार सुनावणी

नवी दिल्ली : शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने सर्वोच्च न्यायालयात पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सुरू

विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आड लपून राजकारण करु नये

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी - उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई : शेतकरी

चंद्रपूरातील नाल्याच्या संरक्षण भिंतीचे प्रकरण विधानसभेत गाजले!

मुंबई: चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात हवेली गार्डन ते आकाशवाणी रोडवरील नाल्याच्या संरक्षण भिंतीच्या

कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दरवर्षी करतात सहा हजाराहून अधिक वारकऱ्यांची सेवा

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा, विठ्ठल मळ्यात जपलीय परंपरा..! १६ वर्षांची परंपरा; ४० दिंड्यांतील सहा हजार

Prasad Tamdar Baba : अंग चोळून अंघोळ अन् शरीरसंबंध; भोंदूबाबा प्रसादचे हायटेक कारनामे उघड

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील भोंदूबाबाच्या कारनाम्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. मोबाईलच्या

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या