दिल्लीतील ७ पैकी ३ जागा काँग्रेसला देण्यास केजरीवाल तयार - शरद पवार

नवी दिल्ली : एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे(Ncp chief) प्रमुख शरद पवार(sharad pawar) यांनी मोठा खुलासा केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल लोकसभा निवडणुकीत ७ पैकी ३ जागा काँग्रेसला देण्यास तयार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. मुंबईच्या हॉटेल ग्रँड हयातमध्ये झालेल्या चॅनेलच्या मुलाखतीदरम्यान शरद पवार यांनी आपचे खासदार संजय सिंह यांच्याविरोधातील ईडीच्या कारवाईबाबतही विधान केले.


शरद पवार म्हणाले की, संजय सिंह यांच्याविरोधातील ईडीची कारवाई आप आणि काँग्रेसला एकत्र आणेल. ईडीची ही कारवाई ही बदला असल्याचे शरद पवार म्हणाले. तपास विभागाचा वापर त्या नेत्यांना निशाणा बनवण्यासाठी केले जात आहेत जे सरकारनुसार चालत नाहीत.



राज्यातील वातावरण भाजपच्या बाजूने नाही


पवार यांनी यावेळी कर्नाटकात मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या विजयाचा हवाला दिला. राज्यात भाजपसाठी अनुकूल वातावरण नाही. महाराष्ट्राबाबत बोलताना पवार म्हणाले, जर निवडणूक झाली तर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना मिळून राज्यात सरकार बनू शकते.

Comments
Add Comment

Iran Israel War : अमेरिकेच्या 'त्या' दाव्यांना भारताने फेटाळून लावले

अमेरिका इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी भारतीय बंदरे आणि नौदल तळांचा वापर करत असल्याच्या दाव्यांना भारताने

UN मध्ये भारताची दहशतवादाविरोधात कडक भूमिका

- ISIS-अल-कायदाविरुद्ध जागतिक कारवाईचे आवाहन भारताने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाविरोधात अत्यंत कडक भूमिका घेतली

Bihar Politics: बिहारच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणार?, नीतीश कुमार राज्यसभेवर जाणार?

मुंबई: बिहारच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी

भारताच्या सागरी सीमेजवळ पोहोचलं युद्ध

पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमी नवी दिल्ली : हिंदी महासागरात श्रीलंकेच्या

India-Finland Bilateral relations : भारत आणि फिनलँडमधील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दौऱ्यावर असलेल्या फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे

पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली आहेत. देशाचे नागरी विमान