सैफसोबत लग्नाआधी करीनाला दिला होता हा इशारा मात्र तिने कोणाचेच ऐकले नाही आणि....

मुंबई: करीना कपूर(kareena kapoor) बॉलिवूडमध्ये अव्वल अभिनेत्रींपैकी एक आहे. वयाच्या ४३व्या वर्षीही ती लहानमोठ्या नव्हे तर मुख्य भूमिकेत दिसत आहे. नुकतेच तिने ओटीटीवर आपले पदार्पण केले. जानेजांमध्ये ती दिसली यात तिला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली.


करीना आपल्या प्रोफेशनल लाईफपेक्षा नेहमी पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत असते. तिने आपल्या आयुष्यात अनेक बोल्ड निर्णय घेतले आहेत. यातीलच एक म्हणजे सैफ अली खानशी घेतलेला लग्नाचा निर्णय.


सैफ आणि तिच्या वयात तब्बल १० वर्षांचे अंतर आहे. सैफ ५३ वर्षांचा आहे तर ती सैफपेक्षा १० वर्षांनी वहान आहे. सैफसोबत वयाचेच अंतर नाही तिने जेव्हा त्याच्याशी लग्न केले तेव्हा सैफ घटस्फोटित तसेच दोन मुलांचा बाप होता. २०१२मध्ये करीनाने सैफशी लग्नगाठ बांधली होती.



सैफशी लग्नाआधी करीनाला मिळाला होता इशारा


जेव्हा करीनाने सैफशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिच्या कुटुंबियांना याचा काही प्रॉब्लेम नव्हता. मात्र करीनाच्या काही शुभचिंतकांनी तिला इशारा दिला होता. करीनाच्या जवळच्या लोकांचे म्हणणे होते की घटस्फोटित आणि दोन मुलांचा बाप असलेल्या सैफशी लग्न केल्यानंतर करीनाचे करिअर संपून जाईल. करीना त्यांच्या या बोलण्याने हैराण झाली होती आणि यावर तिने प्रतिक्रिया देताना म्हटले होते की जे होईल ते बघेन.



लग्नाला झाली ११ वर्षे


करीनाने त्यावेळेस कोणाचेच ऐकले नाही आणि सैफशी लग्न केले. आता दोघांच्या लग्नाला ११ वर्षे झाली आहे आणि दोघांना दोन मुलेही आहेत. सैफचे पहिले लग्न अमृता सिंह हिच्याशी झाले होते. या दोघांना दोन मुलेही आहेत. १३ वर्षानंतर हे लग्न मोडले आणि मुलांची कस्टडी अमृताला मिळाली होती. घटस्फोटानंतर सैफने करीनाशी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला तर अमृताने सिंगल मदर बनत मुलांचे संगोपन केले मात्र दुसरे लग्न केले नाही.

Comments
Add Comment

'मी कट्टर भाजप समर्थक', गंधार जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित अभिनेत्री निवेदिता सराफ यांचे विधान चर्चेत!

ठाणे: बालदिनाचे औचित्य साधून प्रख्यात अभिनेत्री निवेदिता सराफ यांना यंदाचा गंधार जीवन गौरव पुरस्काराने

बिग बॉस विजेती तेजस्वी प्रकाश आता उद्योजिका; करणार 'हा' व्यवसाय

मुंबई : बिग बॉस १५ ची विजेती आणि नागीण मालिकेतून घराघरात पोहोचलेली तेजस्वी प्रकाश आता केवळ अभिनयावर अवलंबून न

राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा

मुंबई : आता आणखी एक सेलिब्रिटी जोडपं म्हणजेच अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा यांनीही पॅरेंट्स

‘राम-लीला’ला १२ वर्षे: रणवीर सिंगच्या उत्कटतेने आणि रूपांतराने घडवलेला आयकॉनिक ‘राम’

मुंबई : रणवीर सिंगने साकारलेल्या ‘राम’ या अविस्मरणीय पात्राने प्रेम, अभिनय आणि सिनेमातील तीव्रतेची नव्याने

‘इंडियन आयडॉल’मध्ये अंशिकाच्या परफॉर्मन्सवर शिबानी अख्तरची दाद, म्हणाल्या “रॉक ऑनचा सिक्वेल झाला तर तूच राहशील बँडची लीडर!”

मुंबई : ‘इंडियन आयडॉल’च्या ताज्या विकेंड एपिसोडमध्ये प्रेक्षकांना संगीत, भावना आणि प्रेरणेचा एक सुंदर मेळ

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी अफवा: IFTDA अध्यक्ष अशोक पंडित यांची पापाराझींविरोधात तक्रार

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या आरोग्याविषयी गेल्या काही दिवसांत पसरलेल्या अफवांनी