Election: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

मुंबई: राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठीचा(grampanchayat election) कार्यक्रम जाहीर झाला आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ५ नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांनी याबाबतची घोषणा मुंबईत केली.


पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होत आहेत. त्याआधी पार पडणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका सर्वच पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत. नुकताच या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.


निवडणूक आयुक्तांनी निवडणुकीची घोषणा केल्यानंतर संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झालीये. १६ ते २० ऑक्टोबर या कालावधीत नामनिर्देशपत्रे दाखल करण्याची मुदत आहे. या निर्देशपत्रांची छाननी २३ ऑक्टोबरला होणार आहे. दरम्यान २५ ऑक्टोबरपर्यंत हे नामनिर्देशपत्रे मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे.


ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ला सकाळी साडेत सात ते साडेपाच या वेळेत मतदान पार पडणार आहे. तर याची मतमोजणी ६ नोव्हेंबरला होणार आहे.



गडचिरोली, गोंदियात मतदान


नक्षलग्रस्त भाग असलेले गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात मात्र सकाळी साडेसात ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर ७ नोव्हेंबरला या ठिकाणची मतमोजणी केली जाणार आहे.

Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक