मुंबई: राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठीचा(grampanchayat election) कार्यक्रम जाहीर झाला आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ५ नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांनी याबाबतची घोषणा मुंबईत केली.
पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होत आहेत. त्याआधी पार पडणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका सर्वच पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत. नुकताच या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
निवडणूक आयुक्तांनी निवडणुकीची घोषणा केल्यानंतर संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झालीये. १६ ते २० ऑक्टोबर या कालावधीत नामनिर्देशपत्रे दाखल करण्याची मुदत आहे. या निर्देशपत्रांची छाननी २३ ऑक्टोबरला होणार आहे. दरम्यान २५ ऑक्टोबरपर्यंत हे नामनिर्देशपत्रे मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ला सकाळी साडेत सात ते साडेपाच या वेळेत मतदान पार पडणार आहे. तर याची मतमोजणी ६ नोव्हेंबरला होणार आहे.
नक्षलग्रस्त भाग असलेले गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात मात्र सकाळी साडेसात ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर ७ नोव्हेंबरला या ठिकाणची मतमोजणी केली जाणार आहे.
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…