Election: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

मुंबई: राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठीचा(grampanchayat election) कार्यक्रम जाहीर झाला आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ५ नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांनी याबाबतची घोषणा मुंबईत केली.


पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होत आहेत. त्याआधी पार पडणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका सर्वच पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत. नुकताच या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.


निवडणूक आयुक्तांनी निवडणुकीची घोषणा केल्यानंतर संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झालीये. १६ ते २० ऑक्टोबर या कालावधीत नामनिर्देशपत्रे दाखल करण्याची मुदत आहे. या निर्देशपत्रांची छाननी २३ ऑक्टोबरला होणार आहे. दरम्यान २५ ऑक्टोबरपर्यंत हे नामनिर्देशपत्रे मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे.


ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ला सकाळी साडेत सात ते साडेपाच या वेळेत मतदान पार पडणार आहे. तर याची मतमोजणी ६ नोव्हेंबरला होणार आहे.



गडचिरोली, गोंदियात मतदान


नक्षलग्रस्त भाग असलेले गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात मात्र सकाळी साडेसात ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर ७ नोव्हेंबरला या ठिकाणची मतमोजणी केली जाणार आहे.

Comments
Add Comment

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग