Monsoon Updates : मान्सून चालला रजेवर... पुढील आठवड्यात सुरु होणार परतीचा पाऊस

राज्यातील नऊ जिल्ह्यांत पाण्याविना लोकांचे हाल...


मुंबई : मुंबईत यंदा जून महिना उजाडायच्या आतच पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर मात्र काहीसा रेंगाळतच पाऊस बरसत होता. असं असलं तरी मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता पावसाने मिटवली आहे. मात्र राज्यातील काही जिल्हे शेवटपर्यंत पावसाच्या प्रतिक्षेतच राहिले. या आठवड्याच्या शेवटी मान्सून रजेवर जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आधीच चिंतेत असणार्‍या बळीराजाला आता आणखी वर्षभराच्या चिंतेने ग्रासले आहे. राज्यातील नऊ जिल्ह्यांत पावसाने गैरहजेरी लावल्याने तिथे पाण्याविना लोकांचे हाल होत आहेत.


राज्यातून नैऋत्य मान्सून आठवड्याच्या शेवटी माघारी फिरण्यास अनुकूल वातावरण तयार झाले आहे. १० ऑक्टोबरनंतर मान्सून माघारी फिरण्याचा अंदाज व्यक्त हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळेल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. राज्यात एकूण सरासरीच्या ९७ टक्के पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.


दरम्यान, राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट कायम आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. सांगली, सातारा, सोलापूर, हिंगोली, जालना, अकोला, अमरावती, बीड, उस्मानाबाद या ९ जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी नोंदवण्यात आले आहे. याउलट राज्यातील मुंबईसह उपनगरांत, ठाणे, पालघर आणि नांदेडमध्येही सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.



राज्यात या ९ जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट :-


सांगली : दरवर्षी सरासरी ४८६.१ मिमी पावसाची नोंद होते. मात्र यंदा २७२.७ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे सांगलीत यावर्षी ४४ टक्के पावसाची तूट आहे.


सातारा : सरासरी ८४४.६ मिमी पाऊस होत असताना यंदा ५३५.६ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे ३७ टक्के पावसाची तूट आहे.


सोलापूर : सरासरी ४५८.१ मिमी पावसाची नोंद होत असते. मात्र यंदा फक्त ३१९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सोलापुरात ३० टक्के पावसाची तूट आहे.


जालना : सरासरी ५९१.८ मिमी पाऊस होतो. मात्र यंदा ३३ टक्के पावसाची तूट असून ३९८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.


बीड : सरासरी ५५७.४ मिमी पाऊस होत असतो, मात्र यंदा ४३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बीडमध्ये २१ टक्के तूट आहे.


उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये सरासरी ५७९.६ मिमी पावसाची नोंद होत असते. प्रत्यक्षात ४४२.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदा २४ टक्क्यांची तूट आहे.


हिंगोली : ५८३.८ मिमी पावसाची नोंद झाली असून ती सरासरीपेक्षा २३ टक्के कमी आहे.


अकोला : सरासरी ६९४.२ मिमी पाऊस होत असतो. प्रत्यक्षात ५३२.९ मिमी पाऊस झाला आहे. २३ टक्के पावसाची तूट आहे.


अमरावती : सरासरी ८२२.९ मिमी पाऊस होतो. यंदा ६०४.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अमरावतीत २७ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Multi Tunneling Mumbai :मुंबईत उभारणार बोगद्यांचे जाळे ; ४,३९२ कोटींचा खर्च अपेक्षित

मुंबई : मुंबईत सातत्याने पायाभूत सुविधांचे जाळे उभारले जात असले, तरी रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या अद्याप

The Mithi River : मिठी नदीतील भराव संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठीच

मुंबई : मिठी नदीत कंत्राटदाराकडून बांधकामाचा राडारोडा (डेब्रीज) टाकून आणि त्यात चिखल मिसळून भ्रष्टाचार केला जात

Old Building : जुन्या इमारती अतिधोकादायक दाखवण्यामागे सल्लागारांचा खेळ?

मुंबई  : मुंबईतील ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट (संरचनात्मक परीक्षण) करताना, अनेक सल्लागार

Devendra Fadnavis : इंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर

मुंबई : इराण-अमेरिका युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा परिणाम देशातील पेट्रोलियम

Mrinal Tai Gore Flyover Extension : अंधेरी,जोगेश्वरी, गोरेगावकरांचा वेळ वाचणार, मृणालताई गोरे विस्तारीत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव पश्चिम येथील राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोडदरम्यानच्या मृणालताई गोरे

The Fort owners : किल्लेदारांनी बोटीतून केली मिठी नदीची सैर... दाखवला नदीत कचऱ्यासह तीन फुटांपर्यंतचा गाळ

मुंबई : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात असून सत्ताधारी पक्षाकडून प्रत्येक