Monsoon Updates : मान्सून चालला रजेवर... पुढील आठवड्यात सुरु होणार परतीचा पाऊस

राज्यातील नऊ जिल्ह्यांत पाण्याविना लोकांचे हाल...


मुंबई : मुंबईत यंदा जून महिना उजाडायच्या आतच पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर मात्र काहीसा रेंगाळतच पाऊस बरसत होता. असं असलं तरी मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता पावसाने मिटवली आहे. मात्र राज्यातील काही जिल्हे शेवटपर्यंत पावसाच्या प्रतिक्षेतच राहिले. या आठवड्याच्या शेवटी मान्सून रजेवर जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आधीच चिंतेत असणार्‍या बळीराजाला आता आणखी वर्षभराच्या चिंतेने ग्रासले आहे. राज्यातील नऊ जिल्ह्यांत पावसाने गैरहजेरी लावल्याने तिथे पाण्याविना लोकांचे हाल होत आहेत.


राज्यातून नैऋत्य मान्सून आठवड्याच्या शेवटी माघारी फिरण्यास अनुकूल वातावरण तयार झाले आहे. १० ऑक्टोबरनंतर मान्सून माघारी फिरण्याचा अंदाज व्यक्त हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळेल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. राज्यात एकूण सरासरीच्या ९७ टक्के पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.


दरम्यान, राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट कायम आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. सांगली, सातारा, सोलापूर, हिंगोली, जालना, अकोला, अमरावती, बीड, उस्मानाबाद या ९ जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी नोंदवण्यात आले आहे. याउलट राज्यातील मुंबईसह उपनगरांत, ठाणे, पालघर आणि नांदेडमध्येही सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.



राज्यात या ९ जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट :-


सांगली : दरवर्षी सरासरी ४८६.१ मिमी पावसाची नोंद होते. मात्र यंदा २७२.७ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे सांगलीत यावर्षी ४४ टक्के पावसाची तूट आहे.


सातारा : सरासरी ८४४.६ मिमी पाऊस होत असताना यंदा ५३५.६ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे ३७ टक्के पावसाची तूट आहे.


सोलापूर : सरासरी ४५८.१ मिमी पावसाची नोंद होत असते. मात्र यंदा फक्त ३१९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सोलापुरात ३० टक्के पावसाची तूट आहे.


जालना : सरासरी ५९१.८ मिमी पाऊस होतो. मात्र यंदा ३३ टक्के पावसाची तूट असून ३९८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.


बीड : सरासरी ५५७.४ मिमी पाऊस होत असतो, मात्र यंदा ४३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बीडमध्ये २१ टक्के तूट आहे.


उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये सरासरी ५७९.६ मिमी पावसाची नोंद होत असते. प्रत्यक्षात ४४२.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदा २४ टक्क्यांची तूट आहे.


हिंगोली : ५८३.८ मिमी पावसाची नोंद झाली असून ती सरासरीपेक्षा २३ टक्के कमी आहे.


अकोला : सरासरी ६९४.२ मिमी पाऊस होत असतो. प्रत्यक्षात ५३२.९ मिमी पाऊस झाला आहे. २३ टक्के पावसाची तूट आहे.


अमरावती : सरासरी ८२२.९ मिमी पाऊस होतो. यंदा ६०४.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अमरावतीत २७ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Prajakta Lavangare : गृहनिर्माण संस्थांमध्ये कंपोस्ट खत निर्मितीला चालना द्या

अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांचे निर्देश मुंबई : स्रोतांच्या ठिकाणीच कचऱ्यावर प्रक्रिया

Ganesh Naik : महाराष्ट्राच्या वनहद्दीत पाच वर्षांत साडेतीन लाख झाडांवर कुऱ्हाड

सव्वा लाख झाडे सागवानाची; बेकायदेशीर वृक्षतोड रोखण्याचे मोठे आव्हान मुंबई : निसर्गसंपन्न महाराष्ट्राच्या

Deputy Chief Minister Eknath Shinde : टीईटी पेपरफुटीतील सूत्रधारांवर मकोका लावावा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, : टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून, या प्रकरणातील मुख्य

Mumbai Metro One : मुंबई मेट्रोत महिला सुरक्षा रक्षकाची सतर्कता; प्रवाशाकडून गांज्याची ९ पाकिटे जप्त, आरोपी अटकेत

मुंबई : मुंबई मेट्रो वनच्या (Mumbai Metro One) सुरक्षा व्यवस्थेने पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. एअरपोर्ट

TET Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तिघांना अटक, परीक्षा पुढे ढकलल्याने लाखो उमेदवारांमध्ये संताप

मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२६ च्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या संशयावरून राज्यभरात खळबळ उडाली असून या

Ketan Agrawal Murder Case : क्रिकेटचं मैदान ते हत्येचा कट; २००० कॉल्स, २३८ तास संवाद अन् सिया-चेतनच्या अफेअरची 'इनसाईड स्टोरी' उघड!

पुणे : पुण्याजवळील लोहगड किल्ल्याच्या भयावह दरीत केतन अग्रवाल (Ketan Agrawal) या तरुणाला ढकलून दिलेल्या प्रकरणाचा तपास