Team India: वर्ल्डकपमध्ये टीम इंडियावर राहणार अंबे माताची कृपा

  85

मुंबई: आयसीसी वनडे क्रिकेट वर्ल्डकपची सुरूवात होण्यास फक्त काहीच दिवस बाकी आहेत. यावेळेस वर्ल्डकपचे आयोजन ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबरपर्यंत भारतात केले जाणार आहे. क्रिकेटच्या इतिहासात हे पहिल्यांदा होत आहे की भारत एकटाच या वर्ल्डकपचे यजमानपद भूषवत आहे. याआधी १९८७, १९९६ आणि २०११च्या वनडे वर्ल्डकपमध्ये भारताने संयुक्तरित्या याचे यजमानपद भूषवले आहे.


या वर्ल्डकपवर साऱ्या क्रिकेट चाहत्यांच्या नजरा असतील, कारण १२ वर्षानंतर पुन्हा तोच इतिहास रचला जाईल अशी आशा प्रत्येक क्रिकेट चाहत्याला आहे. भारताने २०११मध्ये वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत श्रीलंकेला हरवत खिताब जिंकला होता. आताचा हा वर्ल्डकप सणांदरम्यान येत आहे. यावेळेस वर्ल्डकपदरम्यान नवरात्री, दिवाळीसारखे मोठे सण येत आहेत. भारतीय संघांच्या सामन्यावेळीही सणांसारखाच उत्साह असणार आहे.



नवरात्रीदरम्यान भारताचे दोन सामने


९ दिवस चालणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाची सुरूवात १५ ऑक्टोबरपासून होत आहे. नवरात्रीच्या ठीक एक दिवस आधी भारतीय संघ अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पाकिस्तानचा सामना करणार आहे. नवरात्रीदरम्यान भारतीय संघाचे एकूण दोन सामने रंगतील. १९ ऑक्टोबरला भारताचा सामना बांगaलादेशशी होईल. त्यानंतर २२ ऑक्टोबरला भारताचा न्यूझीलंडशी सामना रंगणार आहे.



छटपुजेच्या दिवशी असणार वर्ल्डकपचा अंतिम सामना


वर्ल्डकपदरम्यान १२ नोव्हेंबरला भारतीय संघाचा सामना नेदरलँडशी होणार आहे. त्या दिवशी दिवाळीचा सण आहे. अशातच भारतीय संघ जिंकल्यास दिवाळीचा आनंद द्विगुणीत होईल. भारतीय संघ जर सेमीफायनलमध्ये पोहोचला तर ते १५ ऑक्टोबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये सामना खेळतील. १५ नोव्हेंबरला भाऊबीज आहे.

Comments
Add Comment

"१८ वर्षापूर्वीचं का उकरून काढलं?" थप्पड कांड व्हिडिओ लिकने भज्जी संतापला

नवी दिल्ली: ललित मोदी यांनी मायकेल क्लास यांच्यासोबत एका पॉडकास्टमध्ये आयपीएल २००८ च्या हंगामात गाजलेल्या

महिला वर्ल्ड कप खेळणारे संघ होणार करोडपती

दुबई : भारतात ३० सप्टेंबरपासून महिला वनडे विश्वचषक सुरु होत आहे. आयसीसीने या स्पर्धेसाठी बक्षीस रकमेची घोषणा

Asia Cup 2025 : भारताचा सलग दुसऱ्या विजयासह सुपर-४ मध्ये प्रवेश; जपानवर मात

पाटणा : भारतीय संघाने आशिया कप हॉकी स्पर्धेच्या सुपर-४ मध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. रंगतदार लढतीत भारतीय

रोहित शर्मासह ६ क्रिकेटपटूंची सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये फिटनेस चाचणी होणार

बंगळुरु : रोहित शर्मा, शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, यशस्वी जयस्वाल, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर

टी-२० विश्वचषक २०२६ साठी महेंद्रसिंग धोनी पुन्हा टीम इंडियाचा 'मेंटॉर'? बीसीसीआयने दिली ऑफर!

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आगामी टी-२० विश्वचषक २०२६ साठी टीम इंडियाच्या मेंटरपदाची

Asia Cup 2025 च्या सामन्यांच्या वेळेत बदल! भारत-पाकिस्तान सामना आता कधी सुरू होणार?

नवी दिल्ली: आगामी आशिया कप २०२५ सुरू होण्याआधीच क्रिकेटप्रेमींसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. या स्पर्धेतील