Bus Accident: तामिळनाडूत बस दरीत कोसळली, ८ जण मृत्यूमुखी

चेन्नई: तामिळनाडूच्या(tamilnadu) निलगिरी जिल्ह्यात कुन्नूरजवळ एक पर्यटकांनी भरलेली बस दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार दोन ड्रायव्हरसह ५९ प्रवासी या बसमधून प्रवास करत होते. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास ही बस दरीत कोसळली. ही बस कुन्नूर येथून तेनकासी येथे जात होते. या बसमधील पर्यटक फिरण्यासाठी उटीला आले होते तेथून ते घरी परतत होते.



असा घडला अपघात


हेअरपिन वळण असलेल्या रस्त्यावर प्रवास करताना अचानक बस दरीत कोसळली, अपघाताची बातमी कळताच स्थानिक अधिकारी तसेच इतरांनी धाव घेतली. ज्या प्रवाशांना वाचवण्यात आले त्यातील ८ जणांना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.



अनेक प्रवासी जखमी, काही गंभीर


या प्रवासात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत तर काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी या घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला तसेच मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना २ लाख रूपयांच्या मदतीची घोषणा केली.



मृतांमध्ये चार महिला, एका अल्पवयीनाचा समावेश


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतांमध्ये चार महिला आणि एका अल्पवयीनाचा समावेश आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे