Bus Accident: तामिळनाडूत बस दरीत कोसळली, ८ जण मृत्यूमुखी

  19

चेन्नई: तामिळनाडूच्या(tamilnadu) निलगिरी जिल्ह्यात कुन्नूरजवळ एक पर्यटकांनी भरलेली बस दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार दोन ड्रायव्हरसह ५९ प्रवासी या बसमधून प्रवास करत होते. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास ही बस दरीत कोसळली. ही बस कुन्नूर येथून तेनकासी येथे जात होते. या बसमधील पर्यटक फिरण्यासाठी उटीला आले होते तेथून ते घरी परतत होते.



असा घडला अपघात


हेअरपिन वळण असलेल्या रस्त्यावर प्रवास करताना अचानक बस दरीत कोसळली, अपघाताची बातमी कळताच स्थानिक अधिकारी तसेच इतरांनी धाव घेतली. ज्या प्रवाशांना वाचवण्यात आले त्यातील ८ जणांना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.



अनेक प्रवासी जखमी, काही गंभीर


या प्रवासात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत तर काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी या घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला तसेच मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना २ लाख रूपयांच्या मदतीची घोषणा केली.



मृतांमध्ये चार महिला, एका अल्पवयीनाचा समावेश


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतांमध्ये चार महिला आणि एका अल्पवयीनाचा समावेश आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Comments
Add Comment

भारतातील २७ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर

जागतिक बँकेच्या नव्या अहवालातील माहिती मोदींच्या विविध योजनांचे यश, महाराष्ट्राचा मोठा वाटा नवी दिल्ली :

सोनिया गांधी सिमल्याच्या रुग्णालयात

सिमला : काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना सिमला येथील इंदिरा गांधी

Kedarnath Helicopter Video : केदारनाथकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरची महामार्गावर आपत्कालीन लँडिंग; व्हिडिओ पाहा

रुद्रप्रयाग : केदारनाथ धामकडे जाणाऱ्या खाजगी हेलिकॉप्टरने गुप्तकाशी जि. रुद्रप्रयाग येथे तांत्रिक बिघाडामुळे

Mahua Moitra Ties The Knot : दोन नेते जर्मनीत भेटले अन् गुपचूप विवाहबंधनात अडकले

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिवांगी वर्मा आणि ७० वर्षीय अभिनेता गोविंद नामदेव यांचा विवाह जोरदार चर्चेत

Gangatok : उत्तर सिक्किममधील हवाई बचाव मोहीम पूर्ण; ७६ सैनिकांना वाचवण्यात यश

गंगटोक : उत्तर सिक्किममधील छातेन येथून सुरु असलेली हवाई बचाव मोहीम आज शनिवारी सकाळी एमआय-१७ हेलिकॉप्टरच्या

काँग्रेस काळजी नक्षलवाद्यांची, भाजपाकडे केली शस्त्रसंधीची मागणी

नवी दिल्ली : भारताला नक्षलवादमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या नेतृत्वात देशव्यापी मोहीम सुरू आहे. सर्व