चेन्नई: तामिळनाडूच्या(tamilnadu) निलगिरी जिल्ह्यात कुन्नूरजवळ एक पर्यटकांनी भरलेली बस दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार दोन ड्रायव्हरसह ५९ प्रवासी या बसमधून प्रवास करत होते. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास ही बस दरीत कोसळली. ही बस कुन्नूर येथून तेनकासी येथे जात होते. या बसमधील पर्यटक फिरण्यासाठी उटीला आले होते तेथून ते घरी परतत होते.
हेअरपिन वळण असलेल्या रस्त्यावर प्रवास करताना अचानक बस दरीत कोसळली, अपघाताची बातमी कळताच स्थानिक अधिकारी तसेच इतरांनी धाव घेतली. ज्या प्रवाशांना वाचवण्यात आले त्यातील ८ जणांना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.
या प्रवासात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत तर काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी या घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला तसेच मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना २ लाख रूपयांच्या मदतीची घोषणा केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतांमध्ये चार महिला आणि एका अल्पवयीनाचा समावेश आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…