Bus Accident: तामिळनाडूत बस दरीत कोसळली, ८ जण मृत्यूमुखी

  29

चेन्नई: तामिळनाडूच्या(tamilnadu) निलगिरी जिल्ह्यात कुन्नूरजवळ एक पर्यटकांनी भरलेली बस दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार दोन ड्रायव्हरसह ५९ प्रवासी या बसमधून प्रवास करत होते. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास ही बस दरीत कोसळली. ही बस कुन्नूर येथून तेनकासी येथे जात होते. या बसमधील पर्यटक फिरण्यासाठी उटीला आले होते तेथून ते घरी परतत होते.



असा घडला अपघात


हेअरपिन वळण असलेल्या रस्त्यावर प्रवास करताना अचानक बस दरीत कोसळली, अपघाताची बातमी कळताच स्थानिक अधिकारी तसेच इतरांनी धाव घेतली. ज्या प्रवाशांना वाचवण्यात आले त्यातील ८ जणांना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.



अनेक प्रवासी जखमी, काही गंभीर


या प्रवासात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत तर काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी या घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला तसेच मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना २ लाख रूपयांच्या मदतीची घोषणा केली.



मृतांमध्ये चार महिला, एका अल्पवयीनाचा समावेश


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतांमध्ये चार महिला आणि एका अल्पवयीनाचा समावेश आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या