Tree plantation campaign : पन्नास कोटी वृक्षलागवड मोहिमेचा बोजवारा

‘झाडे दाखवा दहा हजार मिळवा’ : आदिवासी क्रांती सेनेचे आवाहन


मुरबाड : शासनाच्या वनविभागाने राबविण्यात आलेल्या पन्नास कोटी वृक्षलागवड योजनेचा (tree plantation campaign) मुरबाड तालुक्यात बोजवारा उडाला असून चारही वनपरिक्षेत्रातील लावलेल्या झाडांच्या जागी ओसाड उघडे बोडके माळरान दिसून येत आहे. त्यामुळे जंगलावरच आपली उपजीविका करणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी काम करणाऱ्या आदिवासी क्रांती सेनेने ‘झाडे दाखवा दहा हजार मिळवा’, असे आवाहन करून तीन वर्षांपूर्वी वृक्षलागवड केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.


येथे वनविभागाचे चार वनपरिक्षेत्र असून मुरबाड पुर्व, मुरबाड पश्चिम, टोकावडे उत्तर व टोकावडे दक्षिण या चार वनपरिक्षेत्राअंतर्गत शेकडो हेक्टर वनजमिन येते. या चार वनपरिक्षेत्रात गेल्या २०१६-२०१९ या तीन वर्षांच्या कालावधीत पन्नास कोटी वृक्षलागवड योजनेतून मित्रवृक्ष लागवडीच उद्दिष्ट राबविण्यात आले होते. यात सागवान, ऐन, खैर, आवळा, जांभूळ या वृक्षाच्या लागवडीसाठी बाहेरून रोपे मागवून त्यांच्या लागवडीसाठी खड्डे खोदणे, मजूर लावून लागवड करणे, त्यांची देखभाल, त्यांना उन्हाळी संरक्षण, वेळोवेळी पाणी देण्यासाठी, त्यांची राखण करणे, निगा राखणे यासाठी राखणदार ठेवणे, लावलेल्या रोपांना खत, औषध फवारणी आणि वृक्ष संवर्धनासाठी महाराष्ट्र वनविभागाने या चारही वनविभागांना सतत तीन वर्षे निधी उपलब्ध करून दिला होता.


सन २०१६-२०१९ या तीन वर्षांत लागवड केलेली रोपे किमान चार ते सहा फुटांची व्हायला हवी होती; परंतु ज्या ठिकाणी लागवड केली ती जागा आजही उजाड असल्याने दर वर्षी त्याच खड्ड्यांमध्ये तीच रोपे लावण्याचे कागदावरील उद्दिष्ट साध्य झाले. मात्र जंगल वाढलेच नाही. मूळचे वाढलेले नैसर्गिक जंगल याच वनविभागाच्या संगनमताने जंगलतोड करणाऱ्यांना पाठिशी घालीत जंगल संपत्ती संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्थानिक आदिवासी आरोप करताना दिसत आहेत. तालुक्यातील कोणत्याही वनविभागाच्या वनपरिक्षेत्रात ही वृक्षलागवड केलेली व झाडे अस्तित्वात असलेली किमान एका एकरात जगवलेली झाडे दाखवा व दहा हजार रुपये मिळवा, असे आव्हान आदिवासी क्रांती सेनेने केले असून फक्त खड्डे करून वृक्षलागवड योजनेचा बोजवारा करणाऱ्या व बदली घेऊन पसार होणाऱ्या वनअधिकाऱ्यांच्या सखोल चौकशीची मागणी अदिवासी क्रांती सेनेने वनविभागाकडे केली आहे.


वृक्षलागवड उद्दिष्ट आता उरले नसल्याने नव्या लागवडीसाठी शासन निधी देत नाही. तालुक्यातील बारवी धरणाचा वनपट्टा, माळशेज घाटातील वनसंपदा, भिमाशंकर अभयारण्यातील मिल्हे, देहरी, खोपिवली, जायगाव तसेच पाटगांव, पठार, हरिश्चंद्रगड परिसर. गोरखगड, सिद्धगड हे जंगल लाकूडतोड्यांपासून जपले असते तरी वनसंपदा टिकवून ठेवता आली असती.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Nashik : नाशिक-नांदुरी रस्त्याच्या रुंदीकरण कामाची पाहणी, गुणवत्ता निकषांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश

Nashik : सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या (Simhastha Kumbh Mela 2027) पार्श्वभूमीवर नाशिक–नांदुरी रस्त्याच्या (Nashik-Nanduri road) सुरू असलेल्या

Monsoon Health Tips : पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचंय? ‘हे’ सोपे उपाय करा; आरोग्य राहील एकदम फिट!

मुंबई : पावसाळा सुरू झाला की वातावरण आल्हाददायक होतं, पण त्याचबरोबर सर्दी, खोकला, ताप, पोटाचे विकार, त्वचेचे संसर्ग

Jalgaon : स्मार्ट मीटरनंतरही वीज चोरी ? जळगावात महावितरणकडून दोघांविरोधात गुन्हे दाखल

Jalgaon : स्मार्ट मीटरमुळे थकबाकीपोटी वीजपुरवठा आपोआप खंडित होत असतानाही अनधिकृतपणे वीज जोडणी करून वीज वापर

Jalgaon : रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या विक्रेत्यांना दणका ! भुसावळ विभागाची मोठी कारवाई

Jalgaon : रेल्वे स्थानकांवर (Railway Station) प्रवाशांकडून पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ आणि पेयांसाठी निर्धारित दरापेक्षा

Deep Amavasya : दीप अमावस्येला कशी करावी दिव्यांची पूजा ? सविस्तर जाणून घ्या...

मुंबई : हिंदू पुराणानुसार, आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 'दीप अमावस्येला' घरातील सर्व दिव्यांची पूजा

Best Outfits For Beach Trip : समुद्रकिनारी स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसण्यासाठी ‘हे’ आउटफिट्स नक्की ट्राय करा

मुंबई : समुद्रकिनारी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर कपड्यांची निवडही तितकीच महत्त्वाची ठरते. बीचवर उन्हं,