Yuvraj Singh: वर्ल्डकपआधी युवराज सिंहने टीम इंडियाला केले सावधान, दिला हा गुरूमंत्र

नवी दिल्ली: मायदेशात भारतासाठी २०११मधील विश्वचषकात प्लेयर ऑफ दी टूर्नामेंट ठरलेल्या युवराज सिंह(yuvraj singh) भारतीय संघाला गुरूमंत्र दिला आहे. त्यांच्यामते संघातील प्रत्येक सदस्याला आगामी विश्वचषक २०२३ जिंकण्यासाठी दबाव सांभाळावा लागेल. आपल्या शरीराला खेळात झोकून द्यावे लागेल तसेच आपले सर्व काही द्यावे लागेल. भारताने आयसीसी स्पर्धा जिंकून दहा वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. भारताने शेवटचा २०१३मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा खिताब जिंकला होता.



युवराज सिंहने टीम इंडियाला केले सावधान


युवराजने आयएएनएसशी बोलताना सांगितले की आम्हाला आयसीसीची ट्रॉफी जिंकून खूप काळ लोटला आहे. आम्ही २०२१ आणि २०२३मध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे फायनल सामने खेळलो. मला वाटते संघातील काही लोकांचा हा शेवटचा वर्ल्डकप असू शकतो. हा वर्ल्डकप जिंकण्यासाठी प्रत्येकाला आपले शरीर हे झोकून द्यावे लागेल. तसेच सगळे काही पणाला लावावे लागेल.



भारतासाठी धोकादायक ठरू शकतात हे संघ


१९८३ आणि २०११मधील विजेता भारतीय संघ आपल्या वर्ल्डकप अभियानाची सुरूवात ८ ऑक्टोबरला चेन्नईच्या एम ए चिदम्बरम स्टेडियममध्ये पाच वेळा विजेता ऑस्ट्रेलियाविरुद्ध करणार आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे संघ वर्ल्डकपमध्ये भारतासाठी मोठे आव्हान निर्माण करू शकतात.


ऑस्ट्रेलिया नेहमीच एक मजबूत संघ राहिला आहे. त्यांनी याआधी अनेक खिताब जिंकलेत. त्यांच्यात दबावाच्या सामन्यात जिंकण्याची क्षमता आहे. मला असेही वाटते की न्यूझीलंड एक चांगला संघ आहे. तर इंग्लंडचा संघ चांगला एकदिवसीय संघ आहे. द. आफ्रिकेचा संघही चांगली कामगिरी करत आहे.



गोलंदाजांचे योगदान महत्त्वाचे


युवराजच्या मते सामना जिंकण्यासाठी गोलंदाजांची भूमिका निर्णायक ठरेल. यातच स्पिनर महत्त्वाची भूमिका निभावतील.

Comments
Add Comment

वर्ल्डकप जिंकल्यावर हरमनप्रीतने सोशल मीडियातून दिला 'हा' संदेश

नवी मुंबई : भारतीय महिला संघाने आयसीसी महिला वर्ल्ड कप जिंकत इतिहास रचला आणि भारतीय क्रिकेटचा नवा अध्याय लिहिला.

जगज्जेत्या टीमचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांना आवडतो 'हा' पदार्थ

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ वर भारतानं नाव कोरलं. ही किमया साधण्यासाठी टीम इंडियाला प्रेरित करणे आणि

कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनीनंतर हरमनप्रीत कौरने रचला इतिहास

नवी मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ च्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा

ICC Worldcup 2025 : भारताच्या लेकींनी विश्वचषक जिंकून इतिहास घडवला! वर्ल्ड कप जिंकून देशवासियांना दिला 'हा' सर्वात मोठा संदेश

नवी मुंबई : नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्पोर्ट्स ॲकॅडमीच्या (DY Patil Sports Academy) रोषणाईत, २ नोव्हेंबर (रविवार) रोजी भारतीय

ICC Women's Cricket World Cup 2025 : जीत लिया जहां... PM मोदींनी केले अभिनंदन, तर 'मास्टर ब्लास्टर' सचिनला आठवली '१९८३' ची गाथा!

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian Women's Cricket Team) रविवारी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर (Dr. DY Patil Stadium) एक ऐतिहासिक

Rohit Sharma : महिला संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्माचे डोळे पाणावले; 'त्या' भावूक क्षणाचा फोटो होतोय व्हायरल!

नवी मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian Women's Cricket Team) अखेर आपला पहिला वनडे वर्ल्ड कप (First ODI World Cup) जिंकून इतिहास रचला आहे.