Women Reservation Bill: नारी शक्ती वंदन कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी

नवी दिल्ली: महिला आरक्षण विधेयकाला(नारी शक्ती वंदन कायदा)(women reservation bill) राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी शुक्रवारी मंजुरी दिली. हे विधेयक २० सप्टेंबरला लोकसभेत आणि २१ सप्टेंबरला राज्यसभेत संमत झाले होते. कोणतेही विधेयक हे संसदेत संमत झाल्यानंतर राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवले जाते ज्यामुळे त्याचे रूपांतर कायद्यात होऊ शकेल. हा कायदा लागू झाल्यानंतर लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळेल.



संसदेच्या विशेष अधिवेशनात संमत झाले होते हे महिला आरक्षण विधेयक


सरकारने नुकतेच १८ ते २२ सप्टेंबरदरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले होते. या दरम्यान दोन ऐतिहासिक निर्णय झाले. जुन्या संसद भवनातून कामकाज हे संसदेच्या नव्या इमारतीत शिफ्ट करण्यात आले आणि दुसरा म्हमजे दोन्ही सदनात महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले.


सरकारने नारी शक्ती वंदन कायदा या नावाने महिला आरक्षण विधेयक १९ सप्टेंबरला लोकसभेत सादर केले होते. सदनात दोन दिवस यावर चर्चा झाली. अधिकतर पक्षांनी या विधेयकास संमती दिली होती. २० सप्टेंबरला लोकसभेत या विधेयकाच्या बाजूने ४५४ मते पडली आणि दोन मते विरोधात पडली.


ही विरोधी मते एमआयएमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन औवेसी आणि त्यांच्या पक्षाच्या एका खासदाराने मत टाकले होते. अखेर लोकसभेत दोन तृतीयांश बहुमताने हे विधेयक संमत झालले. यानंतर हे विधेयक पुढील दिवशी म्हणजेच २१ सप्टेंबरला राज्यसभेत सादर करण्यात आले. येथे या विधेयकास २१४ मते मिळाली तर विरोधात एकही मत मिळाले नाही.

Comments
Add Comment

Day Care Center Viral Video : डेकेअर सेंटरमध्ये चिमुकल्यांवरील अत्याचाराचा आरोप; व्हायरल व्हिडिओनंतर ५ जणांवर गुन्हा दाखल

बंगळुरूमधील धक्कादायक घटना, डेकेअर सेंटरमध्ये चिमुकल्यांना बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल  बंगळुरू :

Indian Warships in Thailand : थायलंडमध्ये भारतीय युद्धनौकांचा संयुक्त सराव; सागरी सुरक्षेसाठी वाढला समन्वय

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी

Hindu religion : धर्मांतरित हिंदूंच्या मनात जर खरी श्रद्धा असेल, तर त्यांना मंदिरात प्रवेश करण्याचा आणि पूजा करण्याचा अधिकार

नवी दिल्ली : जर एखादी व्यक्ती जन्माने हिंदू (Hindu) नसतानाही तिला मंदिरात प्रवेश नाकारला जाऊ शकतो का? याबाबत ती

थायलंडमध्ये भारतीय युद्धनौकांचा संयुक्त सराव; सागरी सुरक्षेसाठी वाढला समन्वय

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी

अरुणाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलन; १४ गावांतील ३१०० हून अधिक नागरिक बाधित

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील लोअर सियांग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या ढगफुटी आणि भूस्खलनामुळे

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.