Fire: लग्नसोहळ्यात भीषण आग, नवरा-नवरीसह १०० जणांचा मृत्यू

Share

बगदाद: उत्तर इराच्या नेवेह प्रतांतील अल हमदानिया जिल्ह्यात मंगळवारी एका लग्नसोहळ्यात लागलेल्या भीषण आगीत(fire breakdown) तब्बल १०० लोकांचा मृ्त्यू झाला आहे. तर १५० जण जखमी झाले. नेवेह प्रांतातील मोसूल शहराच्या बाहेर राजधानी बगदादपासून ३३५ किलोमीटर अंतरावर उत्तर-पश्चिम ठिकाणी ही भयानक दुर्घटना घडली. इराकी वृत्त विभागाच्या माहितीनुसार आगीत होरपळून मृत्यू झालेल्यांमध्ये नवरा-नवरीचाही समावेश आहे.

दरम्यान, आग कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र प्राथमिक रिपोर्टनुसार फटाक्यांमुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे. इराकी वृत्त विभाग नीनाकडून पोस्ट करण्यात आलेल्या फोटोमध्ये अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे काम करत आहेत. याशिवाय सोशल मीडियावर स्थानिक पत्रकारांनी फोटोत इव्हेंट हॉलचे जळलेले अवशेष दिसत आहेत.

 

लग्नाचा सोहळ्यात पसरली शोककळा

नीना वृत्त विभागाच्या रिपोर्टनुसार इराकच्या नागरी सुरक्षा निर्देशालयाच्या माहितीनुसार इमारतीमध्ये ज्वलनशील सामानामुळे आग भडकण्यास मदत मिळाली. अत्यंत ज्वलनशील पदार्थामुळे इमारतीत काही वेळातच आग भडकली.प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार आग स्थानिक वेळेनुसार पावणे अकराच्या सुमारास आग लागली. त्यावेळेस शेकडोजण लग्नसोहळ्यात सेलिब्रेशन करत होते.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

4 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

5 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

6 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

6 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

7 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

7 hours ago