Fire: लग्नसोहळ्यात भीषण आग, नवरा-नवरीसह १०० जणांचा मृत्यू

  49

बगदाद: उत्तर इराच्या नेवेह प्रतांतील अल हमदानिया जिल्ह्यात मंगळवारी एका लग्नसोहळ्यात लागलेल्या भीषण आगीत(fire breakdown) तब्बल १०० लोकांचा मृ्त्यू झाला आहे. तर १५० जण जखमी झाले. नेवेह प्रांतातील मोसूल शहराच्या बाहेर राजधानी बगदादपासून ३३५ किलोमीटर अंतरावर उत्तर-पश्चिम ठिकाणी ही भयानक दुर्घटना घडली. इराकी वृत्त विभागाच्या माहितीनुसार आगीत होरपळून मृत्यू झालेल्यांमध्ये नवरा-नवरीचाही समावेश आहे.


दरम्यान, आग कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र प्राथमिक रिपोर्टनुसार फटाक्यांमुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे. इराकी वृत्त विभाग नीनाकडून पोस्ट करण्यात आलेल्या फोटोमध्ये अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे काम करत आहेत. याशिवाय सोशल मीडियावर स्थानिक पत्रकारांनी फोटोत इव्हेंट हॉलचे जळलेले अवशेष दिसत आहेत.


 


लग्नाचा सोहळ्यात पसरली शोककळा


नीना वृत्त विभागाच्या रिपोर्टनुसार इराकच्या नागरी सुरक्षा निर्देशालयाच्या माहितीनुसार इमारतीमध्ये ज्वलनशील सामानामुळे आग भडकण्यास मदत मिळाली. अत्यंत ज्वलनशील पदार्थामुळे इमारतीत काही वेळातच आग भडकली.प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार आग स्थानिक वेळेनुसार पावणे अकराच्या सुमारास आग लागली. त्यावेळेस शेकडोजण लग्नसोहळ्यात सेलिब्रेशन करत होते.

Comments
Add Comment

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Russia Ukraine War: रशियाचा युक्रेनवर ४० क्षेपणास्त्रे आणि ४०० ड्रोनचा भयंकर हल्ला!

रशियाचा युक्रेनवर ड्रोन, क्रूझ आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वर्षाव कीव्ह: रशियाने शुक्रवारी सकाळी

बांगलादेशमध्ये एप्रिल २०२६मध्ये होणार निवडणूक, मुहम्मद युनूस यांनी केली घोषणा

ढाका: बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद यूनुस यांनी देशातील पुढील राष्ट्रीय निवडणुकीची

या ठिकाणी पाच रुपयांचा पार्ले जी बिस्किटांचा पुडा २३०० रुपयांत मिळतो

गाझा : पार्ले जी बिस्कीट एक लोकप्रिय ब्रँड आहे. भारतात मागील अनेक दशकांपासून पार्ले जी बिस्किटांची विक्री सुरू

विनाश ७ जून नंतर अटळ, बाबा वेंगाचे भाकीत

बल्गेरिया : बल्गेरिया येथील बाबा वेंगा यांनी केलेली भविष्यवाणी या नावाने एक भाकीत व्हायर होत आहे. या भाकितानुसार

Shashi Tharoor : 'भारताला कोणत्याही तिसऱ्या पक्षाची गरज नाही', राहुल गांधींच्या विधानावर थरूर यांची प्रतिक्रिया

राहुल गांधींच्या ‘सरेंडर’ विधानाशी शशी थरूर असहमत वॉशिंग्टन : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान