नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(arvind kejriwal) यांच्या निवासस्थानाच्या नूतनीकरण प्रकरणात सीबीआयने(cbi) प्राथमिक तपास सुरू केला आहे. यावरून आम आदमी पक्षाने भाजपवर निशाणा साधला आहे. आपने म्हटले, भाजपने आम आदमी पक्षाला पूर्णपणे संपवण्यासाठी आपली ताकद लावली आहे.
आज संपूर्ण देशात केवळ आम आदमी पक्ष आहे जे शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात चांगले काम करून मत मागत आहे मात्र भाजपला वाटत नाही की गरिबांना चांगले शिक्षण आणि चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात. यामुळे भाजपचे धर्म आणि जातीचे राजकारण हरेल.
याच कारणामुळे देशात सर्वात चांगले शिक्षण आणि आरोग्य मंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना जेलमध्ये टाकले गेले. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घेरण्यासाठी सर्व तपास विभागांना कामाला लावले गेले आहेत. मात्र दिल्लीचे दोन कोटी लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आहे असे पक्षाने म्हटले.
आपने पुढे सांगितले, आतापर्यंत यांनी अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात ५०हून अधिक केस केल्या आहेत आणि तपास केला. यात काहीच निघाले नाही. पुढेही काही हाती लागणार नाही. भाजपने कितीही तपास केला अरविंद केजरीवाल हे आम आदमी पक्षाच्या हितासाठी लढाई लढत राहतील.
पुणे : राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत कोकणात, मध्य महाराष्ट्र,…
पंकजा मुंडेंची लागली वर्णी; आणखी कोणाकोणाला मिळाली संधी? मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election) राज्यात…
झोपेत चालत थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला मुंबई : झोपेत चालण्याच्या सवयीमुळे (sleepwalking) भायखळा येथील…
जाळपोळ आणि तोडफोड करत केले आंदोलन नागपूर : जगभरातील बौद्ध अनुयायांसह (Buddhist followers) तमाम भारतीयांचे…
ताह्मिणी घाटातील धक्कादायक प्रकार पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात.…
AI च्या किमयेने कट रचला आणि मैत्रिणीने चुना लावला मुंबई : हल्ली एआय तंत्रज्ञानामुळे (AI…