नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(arvind kejriwal) यांच्या निवासस्थानाच्या नूतनीकरण प्रकरणात सीबीआयने(cbi) प्राथमिक तपास सुरू केला आहे. यावरून आम आदमी पक्षाने भाजपवर निशाणा साधला आहे. आपने म्हटले, भाजपने आम आदमी पक्षाला पूर्णपणे संपवण्यासाठी आपली ताकद लावली आहे.
आज संपूर्ण देशात केवळ आम आदमी पक्ष आहे जे शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात चांगले काम करून मत मागत आहे मात्र भाजपला वाटत नाही की गरिबांना चांगले शिक्षण आणि चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात. यामुळे भाजपचे धर्म आणि जातीचे राजकारण हरेल.
याच कारणामुळे देशात सर्वात चांगले शिक्षण आणि आरोग्य मंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना जेलमध्ये टाकले गेले. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घेरण्यासाठी सर्व तपास विभागांना कामाला लावले गेले आहेत. मात्र दिल्लीचे दोन कोटी लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आहे असे पक्षाने म्हटले.
आपने पुढे सांगितले, आतापर्यंत यांनी अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात ५०हून अधिक केस केल्या आहेत आणि तपास केला. यात काहीच निघाले नाही. पुढेही काही हाती लागणार नाही. भाजपने कितीही तपास केला अरविंद केजरीवाल हे आम आदमी पक्षाच्या हितासाठी लढाई लढत राहतील.
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…
सध्या आयपीएलचा सीझन रंगात आला आहे. संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून क्रिकेटप्रेमी टीव्ही किंवा मोबाईलसमोर ठाण मांडून…
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसन यांचे मत मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI)…
मुंबई : शिक्षकांसाठी ड्रेसकोड ठरवण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडून पुन्हा एकदा विचाराधीन आहे. प्रत्येक जिल्ह्याला…
काही दिवसांपूर्वी २६/११ चा मुंबई दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा याचं भारतात प्रत्यार्पण झालं. त्यानंतर…