Thackeray Group : संसदेच्या विशेष अधिवेशनात अनुपस्थित राहणं ठाकरे गटाच्या खासदारांना भोवणार

चार खासदारांना शिवसेनेकडून मिळणार नोटीस


नेमकं प्रकरण काय?


मुंबई : ठाकरे गट (Thackeray Group) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shidne) यांची शिवसेना यांच्यातील संघर्ष वाढतच चालला आहे. त्यातच आता शिवसेनेकडून ठाकरे गटाच्या चार खासदारांना नोटीस पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. व्हीप नाकारल्याने शिवसेनेच्या प्रतोद भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्याकडून ठाकरे गटाला नोटीस पाठवली जाणार आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) , राजन विचारे (Rajan Vichare), संजय जाधव (Sanjay Jadhav) आणि ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांचा यात समावेश आहे.


शिवसेनेच्या प्रतोद भावना गवळी यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनाकरता १४ सप्टेंबर रोजी एक व्हीप काढला होता. शिवसेना खासदारांनी महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने मतदान करावे असा तो व्हीप होता. परंतु ठाकरे गटाचे चार खासदार अधिवेशनासाठी उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांनी मतदान केलेले नाही. ठाकरे गटाच्या खासदारांनी व्हीप नाकारल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शिवसेनेने यासंदर्भात कायदेशीर बाजू तपासण्यास सुरुवात केली आहे.


महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देण्याच्या कृतीवर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, ओमराजे निंबाळकर, राजन विचारे आणि संजय जाधव यांना नोटीस पाठवून कारवाई केली जाईल, असं शिवसेनेने एका पत्रकाद्वारे सूचित केलं आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अद्याप यासंदर्भात भूमिका जाहीर केलेली नाही.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.

नारळासाठी ४५ रुपयांची फोडणी; आवक घटल्याने मुंबईकरांना भुर्दंड

मुंबई : सण, उत्सव कालावधीत नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईकरांना सध्या या नारळासाठी ४५ ते ५० रुपये मोजावे

नरिमन पॉइंट ते वसईपर्यंत १० मार्गांवर होणार जलवाहतूक

मुंबई : महामुंबईत १० मार्गांवर जलवाहतूक सुरू होणार आहे. याद्वारे नव्या विमानतळाला चार मार्ग जोडले जाणार आहेत.

काय चाललंय काय ? एका महिन्यात तीन वेळा बंद पडली मोनोरेल

मुंबई : मध्य मुंबई आणि पूर्वेकडील उपनगरे यांना जोडणारी मोनोरेल ही वेगाने आरामदायी प्रवास करण्यासाठी सुरू

महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांनी 'या' भाषेत घेतली शपथ

मुंबई : आचार्य देवव्रत यांनी सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी राजभवनात झालेल्या सोहळ्यात राज्यपालपदाची शपथ