Thackeray Group : संसदेच्या विशेष अधिवेशनात अनुपस्थित राहणं ठाकरे गटाच्या खासदारांना भोवणार

  34

चार खासदारांना शिवसेनेकडून मिळणार नोटीस


नेमकं प्रकरण काय?


मुंबई : ठाकरे गट (Thackeray Group) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shidne) यांची शिवसेना यांच्यातील संघर्ष वाढतच चालला आहे. त्यातच आता शिवसेनेकडून ठाकरे गटाच्या चार खासदारांना नोटीस पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. व्हीप नाकारल्याने शिवसेनेच्या प्रतोद भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्याकडून ठाकरे गटाला नोटीस पाठवली जाणार आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) , राजन विचारे (Rajan Vichare), संजय जाधव (Sanjay Jadhav) आणि ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांचा यात समावेश आहे.


शिवसेनेच्या प्रतोद भावना गवळी यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनाकरता १४ सप्टेंबर रोजी एक व्हीप काढला होता. शिवसेना खासदारांनी महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने मतदान करावे असा तो व्हीप होता. परंतु ठाकरे गटाचे चार खासदार अधिवेशनासाठी उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांनी मतदान केलेले नाही. ठाकरे गटाच्या खासदारांनी व्हीप नाकारल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शिवसेनेने यासंदर्भात कायदेशीर बाजू तपासण्यास सुरुवात केली आहे.


महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देण्याच्या कृतीवर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, ओमराजे निंबाळकर, राजन विचारे आणि संजय जाधव यांना नोटीस पाठवून कारवाई केली जाईल, असं शिवसेनेने एका पत्रकाद्वारे सूचित केलं आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अद्याप यासंदर्भात भूमिका जाहीर केलेली नाही.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची