Ram mandir: अखेर प्रतीक्षा संपली, अयोध्येत पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणार श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा

नवी दिल्ली: अयोध्येत भगवान राम मंदिराचे(ram mandir) निर्मिती कार्य वेगात सुरू आहे. अशातच मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की तीन मजल्याच्या राम मंदिराच्या भूतलाची निर्मिती डिसेंबरच्या अखेरीपर्यंत पूर्ण होईल आणि प्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला रंगेल.


राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास जी महाराज यांनी सांगितले की १५ जानेवारी ते २४ जानेवारीला अनुष्ठान असेल. आमच्याकडून पीएमओला पत्र लिहिले आणि त्यावर उत्तरही आले. आता हे ठरले आहे की २२ तारखेला पंतप्रधान मोदी अयोध्येला जातील तर प्राणप्रतिष्ठा २२ तारखेला होईल. या कार्यक्रमासाठी आणखी लोकांनाही बोलावण्यात आले आहे.



असे असेल राम मंदिर


नृपेंद्र मिश्राने सांगितले की एक उपकरणावर डिझाइन करण्याचे काम सुरू आहे ज्याची स्थापना मंदिराच्या शिखरावर केली जाणार आहे. ज्यामुळे दर वर्षी राम नवमीच्या दिवशी गर्भगृहात देवतेच्या माथ्यावर सूर्य किरणे क्षणभरासाठी पडतील. हे बंगळुरूमध्ये बनवले जात आहे आणि त्याच्या डिझाईनची देखरेख वैज्ञानिक करत आहेत.



न्यायालयाने २०१९ मध्ये मंदिर निर्माणाला दाखवला होता हिरवा झेंडा


सर्वोच्च न्यायालयाने २०१९च्या निर्णयादरम्यान अयोध्येतील वादग्रस्त जागेवर एका ट्रस्टद्वारे राम मंदिर निर्मितीचा मार्ग सुकर केला होता.

Comments
Add Comment

आनंदाची बातमी, ९४ हजार मेट्रिक टन LPG घेऊन दोन टँकर भारताकडे रवाना

नवी दिल्ली : मागील एक महिन्यापासून पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे

कुर्दिस्तानमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ला; अमेरिका-इराण तणाव पुन्हा तीव्र

वॉशिंग्टन : पश्चिम आशियातील संपूर्ण प्रदेशात सध्या परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. अशातच इराकच्या

Lock Down in Pakistan : पाकिस्तानची दयनीय अवस्था, युद्धामुळे लागले 'लॉकडाउन'; शहबाज सरकारचा निर्णय

इस्लामाबाद : इराण अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे अनेक देशांची तेलवाहू, गॅस वाहू जहाजे

Maan ki Baat, Narendra Modi : "मन की बात"मधून पंतप्रधानांचे ऊर्जा संकटावरील अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन

नवी दिल्ली : जागतिक संघर्ष आणि ऊर्जा संकटावर चिंता व्यक्त करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात'

भरधाव वेगाने येत थारने तीन जणांना उडवले; धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद

नवी दिल्ली: गुरुग्राममध्ये एक मोठा अपघात झाला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या थार कारने तिघांना चिरडले. तिघांचाही

आयआरजीसीचा मोठा दावा; इराणने अमेरिकेचे एफ-१६ लढाऊ विमान पाडले

नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणने अमेरिकेचे लष्करी तळ आणि त्यांची एफ-१६ लढाऊ